शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

रायगड जिल्ह्यात ७५ टक्के लसीकरण पूर्ण, कोरोनाकाळातील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:46 IST

Raigad News : रायगड जिल्ह्यात कोरोना महामारी काळ सुरू असतानाही बालकांना आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

- निखिल म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना महामारी काळ सुरू असतानाही बालकांना आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. आरोग्य प्रशासनाकडे लसीचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना महामारी सुरू असताना एकही मुलगा लसीपासून वंचित राहिलेला नाही.

शून्य ते पाच वर्षीय बालकांना तसेच दहा वर्षे, सोळा वर्षे मुलांना कोणत्याही आजाराने धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक लस दिली जाते. यामध्ये बीसीजी, हिपॅटायटिस-बी, ओपीव्ही ३, रोटा व्हायरस लस, गोवर, व्हिटॅमिन ए, पेंटा ३, डीपीटी, टीडी, मसल्स पहिला, दुसरा डोस, प्रतिबंधात्मक इंफॅट्स, विटा १, टीडीटी या लसी दिल्या जातात. ग्रामीण भागासह शहरातील बालके आणि मुलांना या लसी वयोमानानुसार दिल्या जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये बीसीजी (७४ टक्के), पेंटा ३ (८० टक्के), ओपीव्ही ३ (७९ टक्के), विटा १ (६९ टक्के), मसल्स पहिला डोस (८७ टक्के), फुल्ली प्रोटेक्ट इंफॅट्स (७९ टक्के), डीपीटी बी (८९ टक्के), ओपीव्ही बी (८९ टक्के), मसल्स दुसरा डोस (८५ टक्के), डीपीटी ५ वर्षे बालक (७७ टक्के), टीडी १० वर्षे मुले (२८ टक्के), टीटीडी १६ वर्षे मुले (२७ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.कोरोना काळातही कोणीही बालक आणि मुले ही लसीपासून वंचित राहिलेली नाहीत. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत लागणाऱ्या लसीचा आणि औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तसेच इतर आजारांबाबतही औषधसाठा मुबलक असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांनी दिली. २०२०-२१ या वर्षाचे लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेने पूर्ण केले आहे. कोरोना महामारी मार्च महिन्यापासून सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा या आजारावर मात करण्यासाठी झटत आहे. असे असले तरी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण अभियानात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कमी पडलेली नाही. जिल्ह्यातील कोणतेही बालक आणि मूल कोरोना काळात लसीकरणापासून वंचित राहिलेले नाही. कोरोनाबाधित क्षेत्रातील बालकांना आणि मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात बोलावून त्यांचे लसीकरण केले असल्याची माहिती लसीकरण विभागाच्या परिचारिका विजया भोसले पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्य