शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

रायगड जिल्ह्यात ७५ टक्के लसीकरण पूर्ण, कोरोनाकाळातील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:46 IST

Raigad News : रायगड जिल्ह्यात कोरोना महामारी काळ सुरू असतानाही बालकांना आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

- निखिल म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना महामारी काळ सुरू असतानाही बालकांना आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. आरोग्य प्रशासनाकडे लसीचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना महामारी सुरू असताना एकही मुलगा लसीपासून वंचित राहिलेला नाही.

शून्य ते पाच वर्षीय बालकांना तसेच दहा वर्षे, सोळा वर्षे मुलांना कोणत्याही आजाराने धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक लस दिली जाते. यामध्ये बीसीजी, हिपॅटायटिस-बी, ओपीव्ही ३, रोटा व्हायरस लस, गोवर, व्हिटॅमिन ए, पेंटा ३, डीपीटी, टीडी, मसल्स पहिला, दुसरा डोस, प्रतिबंधात्मक इंफॅट्स, विटा १, टीडीटी या लसी दिल्या जातात. ग्रामीण भागासह शहरातील बालके आणि मुलांना या लसी वयोमानानुसार दिल्या जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये बीसीजी (७४ टक्के), पेंटा ३ (८० टक्के), ओपीव्ही ३ (७९ टक्के), विटा १ (६९ टक्के), मसल्स पहिला डोस (८७ टक्के), फुल्ली प्रोटेक्ट इंफॅट्स (७९ टक्के), डीपीटी बी (८९ टक्के), ओपीव्ही बी (८९ टक्के), मसल्स दुसरा डोस (८५ टक्के), डीपीटी ५ वर्षे बालक (७७ टक्के), टीडी १० वर्षे मुले (२८ टक्के), टीटीडी १६ वर्षे मुले (२७ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.कोरोना काळातही कोणीही बालक आणि मुले ही लसीपासून वंचित राहिलेली नाहीत. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत लागणाऱ्या लसीचा आणि औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तसेच इतर आजारांबाबतही औषधसाठा मुबलक असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांनी दिली. २०२०-२१ या वर्षाचे लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेने पूर्ण केले आहे. कोरोना महामारी मार्च महिन्यापासून सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा या आजारावर मात करण्यासाठी झटत आहे. असे असले तरी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण अभियानात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कमी पडलेली नाही. जिल्ह्यातील कोणतेही बालक आणि मूल कोरोना काळात लसीकरणापासून वंचित राहिलेले नाही. कोरोनाबाधित क्षेत्रातील बालकांना आणि मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात बोलावून त्यांचे लसीकरण केले असल्याची माहिती लसीकरण विभागाच्या परिचारिका विजया भोसले पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्य