शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

६४५ ग्रामीण डाक कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:20 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजही डाक सेवा आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. डाक सेवेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांनी विविध

अलिबाग : माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजही डाक सेवा आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. डाक सेवेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २२ मेपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. रायगड जिल्ह्यातील २४८ डाक कार्यालयातील ६४५ कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने सरकारचे तब्बल २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बेमुदत संपामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे विविध डाक कर्मचारी संघटना मागण्यांवर ठाम राहण्याच्या पवित्र्यात असल्याने सरकारच्या नुकसानीचा आकडा हा वाढतच जाणार आहे.आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेसह अन्य चार संघटनांनी अलिबागच्या मुख्य डाक कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन त्यांनी डाक अधिक्षक यांना दिले.इंटरनेटच्या मायाजालामुळे जग जवळ आले आहे. चुटकीसरशी कामे होत असल्याने वेळेचीही बचत होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग विविध संस्था, कंपन्या, बँका, सरकारी, निम सरकारी आस्थापनांनी केला. त्याचप्रमाणे डाक विभागानेही तो अंगीकारुन सकारात्मक बदलांचा आपल्या सेवेत समावेश केला. ई-मनी आॅर्डर, मनी ट्रान्सफर, साधे पत्र, रजिस्टर, पार्सल वाटप, मनी आॅर्डर, आरडी, एसबी, टीडी, एसएसए अशा विविध सेवा डाक विभागामार्फत दिल्या जातात.समान काम समान वेतन, सातवा वेतन आयोग, निवृत्त न्यायाधीश कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी संपूर्ण देशभरातील डाक कर्मचारी संपावर गेले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये २४८ डाक कार्यालये आहेत. त्यामध्ये ६४५ कर्मचारी काम करतात. मात्र सर्वच कर्मचारी २२ मेपासून संपावर गेले असल्याने तब्बल २५० कोटी रुपयांचे सरकारचे नुकसान झाले आहे.२०१६ पासून सरकार डाक कर्मचाºयांच्या तोंडाला पाने पुसत आहे. नुसती आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्याचा सातत्याने प्रयत्न सरकारकडून होत असल्याने कर्मचाºयांमध्ये असंतोष खदखदत आहे. निवृत्त न्यायाधीश कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात यासह अन्य मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सचिव दिनेश शहापूरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उन्हाळा, पावसाळा असो अथवा हिवाळा असो डाक कर्मचारी इमानेइतबारे आपली सेवा नागरिकांना देत असतात. महागाई सातत्याने वाढत आहे मात्र त्याप्रमाणात वेतन वाढ होत नाही. सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला. त्याची अंमलबजावणी केली नाही. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा सरकार विरोधातील राग असाच धगधगत राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. आंदोलकांच्या कठोर पवित्र्यामुळे आंदोलन मागे घेण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. तर दुसरीकडे सरकार यामधून तोडगा काढत नसल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.डाक कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उपसल्याने ग्रामीण भागातील डाकसेवा पुरती कोलमडून पडली आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने यातून लवकर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.