शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दर तासाला ५७६ वाहने कोकणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:24 IST

कोकणवासीय चाकरमान्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होत आहे.

अलिबाग : कोकणवासीय चाकरमान्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होत आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताकरिता कोकणातील आपापल्या गावी पोहोचणाºया चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढली आहे.सोमवारी रात्री तासाला ५७६ वाहने या मार्गावरून मार्गस्थ झाली. तर, सहा तासांत एकूण तीन हजार ४५६ विविध प्रकारच्या वाहनांतून एक लाखापेक्षा अधिक चाकरमानी गणेशभक्त कोकणात रवाना झाल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.राज्य परिवहन मंडळाच्या नियोजनानुसार, सोमवारी ३५५ एसटी कोकणात रवाना झाल्या. त्यामधून एकूण १७ हजार ७५० गणेशभक्तांनी प्रवास केला.या वाहतुक नियंत्रणासाठी रायगड पोलीस दलास साहाय्य करण्याकरिता विनामोबदला काम करण्याकरिता १४० पोलीस मित्र २४ तास कार्यरत आहेत. ते पळस्पे ते कशेडी या टप्प्यात पेण, वडखळ, वाकण, पाली, कोलाड, माणगाव, लोणेरे, महाड आणि पोलादपूर येथे मार्गदर्शन करत आहेत.दरम्यान कोकणवासीयांनी एसटीलाच अधिक पसंती दिल्याचे आरक्षित एसटी संख्येवरून दिसून येते असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले. सेनापती बापट मार्गावरून मुंबईतील जादा एसटी कोकणाकडे रवाना झाल्या. त्यावेळी मंत्री रावते यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. मुंबईतील गणपती विशेष फेºया मंगळवारी मार्गस्थ करण्यात आल्या.>चार दिवसांत एक हजार चाकरमान्यांनी घेतले टोल फ्री पासठाणे : कोकणात जाणाºया चाकरमान्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात टोल फ्री पास घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. मागील चार दिवसांत जवळपास एक हजार चाकरमान्यांनी हे पास घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांतून प्रवास टाळण्यासाठी चाकरमान्यांनी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे टोल फ्री पास घेऊन वेळ आणि इंधन खर्चून कोकण गाठण्याची तयारी के ल्याचे बोलले जात आहे. ंशनिवारपासून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील मध्यवर्ती जेल व मर्फी कार्यालयात त्यांच्या वाटपास सुरुवात झाली आहे. त्यातच पहिला शनिवार असतानासुद्धा या दिवशी दोन्ही कार्यालयांतून २२० पासचे वाटप झाले होते. मात्र, रविवारची सुटी असताना अवघे ५० पास गेले होते. तसेच सोमवारी काँग्रेस पक्षाने ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या दिवशी जवळपास ४९० पासचे वाटप झाले. मंगळवारीही टोल फ्री पाससाठी आरटीओत गर्दी झाली होती. दुपारी साडेतीनपर्यंत २५० पास वाटप झाले. तर सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत पास वितरित होणार असल्याने आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाण्या-येण्याचा दुहेरी पास असल्याचे ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक म्हणाले.