शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

गाढी नदीतील ५०० टन गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:13 IST

चिंचपाडा परिसरातील रहिवाशांना दिलासा : अतिवृष्टीत किनाऱ्यालगतच्या गावांना धोका

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल परिसरातून वाहणाºया गाढी नदीतील गाळ काढण्यात येत आहे. चिंचपाडा परिसरात गेल्या १५ दिवसांत जेसीबीच्या साहाय्याने नदीतील ५०० टन गाळ काढण्यात आला. पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी आजूबाजूच्या गावांत शिरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे चिंचपाडा येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

पनवेल तालुक्यातून कासाडी, गाढी, काळुंद्रे आणि पाताळगंगा या चार नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची मानली जाते. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणाºया नदीकिनारी ग्रामीण तसेच शहरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. माथेरानमध्ये पडलेला पावसाचे सर्वच पाणी गाढी नदीला मिळते. अनेकदा अतिवृष्टीमुळे नदी धोक्याची पातळी ओलांडते. लोकवस्ती जवळच असल्याने नदीपात्रात अतिक्रमण तसेच कचरा, डेब्रिज मोठ्या प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे नदीपात्र लहान झाले आहे. त्यामुळे थोड्या पावसानेही किनाºयालगतच्य गावांत पाणी शिरते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जेएनपीटी महामार्गाच्या रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी गाढी नदीवरही पूल बांधण्यात आला आहे. नदीतील गाळ काढण्यात येत आहे. यासाठी अशोका ठेकेदार कंपनीकडून काम केले जात आहे.च्पंधरा दिवसांत गाढी नदीतून जेसीबीच्या साहाय्याने ५०० पेक्षा जास्त टन गाळ काढण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.च्गाळ काढल्याने नदीपात्र मोठे झाले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बाहेर ओसंडून जवळ असलेल्या गावात पाणी शिरण्याची भीती कमी झाली आहे.