शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

महाड तालुक्यात ४३ शाळा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:20 IST

दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पडून: मुलांसह शिक्षकांचा जीव धोक्यात; निधीच खर्च केला जात नाही

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील ४३ प्राथमिक शाळांमधील मुलांचे शिक्षण आणि जीव धोक्यात आल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून, त्यांच्या दुरुस्तीकडे रायगड जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शिक्षणामुळेच मुलांचे भवितव्य घडते, पण दुर्गम आणि डोंगरी भागात वसलेल्या महाड तालुक्यातील वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. पूर्वी गाव तिथे शाळा अशी गावांची ओळख होती. मात्र, वाहतुकीच्या साधनांमुळे खेडी शहरांना जोडली गेली आणि सोयी-सुविधा गावांपर्यंत पोहोचू लागल्या. परिणामी गावामध्ये वयोवृद्धांशिवाय कोणतीही तरुण पिढी दिसत नसली तरी महाड तालुक्यातील अनेक खेड्यातील गाव अबाधित आहे. अशा गावांमध्ये उभारलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारती आजही अस्तित्वात असून, त्या ठिकाणी आजही शिक्षण घेतले जात आहे. मात्र, अशा शाळांकडे रायगड जि. प. ने दुर्लक्ष केले आहे.इमारती धोकादायक बनल्यामुळे जीव मुठीत घेऊन मुले शिक्षण घेत आहेत, तर शिक्षकांनाही भीतीच्या छायेत शिक्षण द्यावे लागत आहे.तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट झाली असून, काही शाळांची दुरुस्ती झाली असली तरी आज ४३ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जि. प. कडे पडून आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील याकडे दुर्लक्ष करून असल्याने दुरुस्ती निधी खर्च केला जात नाही. यातील अनेक इमारतींनी शंभरी गाठली आहे. गतवर्षी शिरवली प्राथ.शाळेची भिंत कोसळली. मात्र, दुरुस्ती झालीच नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक शाळा गळक्या असून, भरपावसामध्ये गळक्या छताखाली मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे, तरीही जि. प.कडून दुर्लक्ष होत आहे.गावकरी मुलांच्या शिक्षणासाठी लोकवर्गणीतून पैसा जमा करत डागडुजी करत आहे. शिक्षण समितीकडे पुरेसा निधी नसल्याने डागडुजी करू शकत नाही. सध्या सर्व शिक्षा अभियान बंद पडल्यामुळे या शाळांची दुरुस्ती रखडली आहे. २०१७-१८ वर्षातील दुरुस्तीचे प्रस्ताव महाड शिक्षण विभागाकडून जि. प. कडे पाठविण्यात आले आहे. मात्र, ते तसेच पडून आहेत. नगरभुवन, वाकी, कातिवडे, गावडी, साकडी, कोंडिवते, कोलोसे, वाकी बु., मांडले, रेवतले उर्दू, किये, ब्रिजघर, कसबे, शिवथर यासह अन्य गावातील शाळांचा दुरुस्ती प्रस्ताव प्रलंबित आहे.सध्या तालुक्यातील ४३ शाळा धोकादायक स्थितीत असून यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणाचा, तसेच त्यांच्या जीवाचा विचार करून जुन्या कौलारू इमारतींची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. महाड शिक्षण विभागाकडून पाठविलेल्या प्रस्तावावर जि. प. ने तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीला मंजुरी द्यावी, अशी मागणी सामान्य नागरिक तसेच पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.सर्व शिक्षा अभियानामधील शाळा धूळखाततालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या चार भिंती आणि कौलारू प्रकारातील शाळा मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींमध्ये वर्ग भरविणे धोकादायक बनले आहे. पावसाळ्यात या इमारतींना गळती लागते,तर दुसरीकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील बहुतांश शाळा दुरुस्त करण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी नवीन इमारती तयार केल्या आहेत.परंतु पावसाच्या जोराने नवीन इमारतींचे स्लॅब गळके झाले, तर काही ठिकाणी इमारतीमधील स्लॅबचे छत शाळा सुरू असताना मुलांच्या अंगावर कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. मात्र, याविरोधात अधिकारी वा लोकप्रतिनिधी एक शब्दही काढत नाहीत. परिणामी याचे भोग शालेय मुलांना भोगावे लागत आहे.महाड तालुक्यातील जवळपास ४३ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही.- अरुणा यादव,गटशिक्षण अधिकारी, महाडप्रस्तावामधील काही शाळा सर्व शिक्षा अभियानामध्ये दुरुस्तीसाठी आहेत, तर जि.प. निधीतून फक्त २५ शाळांची दुरुस्ती करता येते. जिल्हा नियोजनामध्ये शाळा दुरुस्तीसाठी वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शाळांना दुरुस्ती मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. निधी उपलब्ध होताच दुरुस्ती तातडीने करण्यात येईल.- अदिती तटकरे, अध्यक्ष,रायगड जि. प.

टॅग्स :SchoolशाळाRaigadरायगडStudentविद्यार्थी