शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

जिल्ह्यात ६२ वर्षांत ३२ अपक्ष उमेदवारांनी लढवली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 00:10 IST

रायगड मतदारसंघ : १९७१ सालापासून अपक्ष लढवण्याची परंपरा

- आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकीत जिंकून येण्याची प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते. मात्र, विजयी हा एकच उमेदवार होतो. काहींना निवडणूक लढवण्याची ऊर्मी असते, तर काहींना राजकीय पक्ष तिकीट नाकारतात म्हणून ते अपक्ष लढतात. पूर्वीचा कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदार संघात १९५२ ते २०१४ सालापर्यंत एकूण ३२ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. १९७१ सालापासून अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवण्याची परंपरा सुरू झाली होती. १९८४ साली काँग्रेससोबत फारकत घेतलेले बॅ.ए.आर.अंतुले हे एकमेव अपक्ष उमेदवार आहेत. ज्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चारीमुंड्या चित करत त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती.

पूर्वी एका विचारधारेसाठी अथवा काही राजकीय डावपेचांसाठी अपक्षांनी निवडणूक लढल्याचा इतिहास आहे. १९५२ साली कुलाबा लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि शेकाप हे दोनच प्रमुख राजकीय पक्ष होते. १९५७, १९६२ सालापर्यंत हीच परंपरा कायम होती. मात्र, १९६७ साली काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी जनसंघाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.

१९७१ साली अंबाजी तुकाराम पाटील यांनी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर काँग्रेसचे शंकर सावंत, शेकापचे दत्तात्रेय नारायण पाटील या प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान होेते. त्यानंतर १९७७ साली शेकाप आणि काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती. १९८० सालीच्या लोकसभा निवडणुकीत रतिलाल लल्लुदास शहा यांच्या रूपाने पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार लाभला. त्या वेळी काँग्रेस, शेकाप आणि जनता पार्टी या उमेदवाराचे आव्हान होते. १९८४ साली काँग्रेसचे बॅ.ए.आर. अंतुले यांचे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत पटले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी कृष्णा गायकवाड, विलास तुपे हे अपक्ष तर काँग्रेसकडून अंबाजी पाटील आणि शेकापचे दिनकर पाटील निवडणूक लढले होते. त्यामध्ये अपक्ष असणाऱ्या बॅ.ए.आर.अंतुले यांनी सर्वच उमेदवारांना धूळ चारली होती. बॅ.अंतुले हे निवडून आलेले एकमेव अपक्ष उमेदवार ठरले होते. त्यांच्यानंतर कोणत्याच अपक्षाला निवडणूक जिंकता आलेली नाही. बॅ.अंतुले यांची राजकीय ताकद होती हे काही वेगळे सांगायची गरज नाही.

१९८९ साली विश्वनाथ बाप्पये यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर १९९१ साली सहा अपक्षांनी आपले राजकीय नशीब आजमावले होते. १९९६ साली तर अपक्ष उमेदवारांनी चांगलीच कमाल केली. तब्बल १२ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून प्रतिस्पर्धी उमेदवारांना चक्रावून सोडले होते. १९९८ साली एक, १९९९ साली दोन, २००४ साली एकच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २००९ साली नव्याने अस्तित्वात आलेल्या रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. प्रवीण मधुकर ठाकूर, डॉ.सिद्धार्थ पाटील, सुनील नाईक असे तीन अपक्ष उमेदवार होते.

यंदा १२ अपक्ष रिंगणातच्२०१९ सालच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल १२ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.च्८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात त्यावरच अपक्ष उमेदवारांची संख्या कळणार आहे.

टॅग्स :raigad-pcरायगड