शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६२ वर्षांत ३२ अपक्ष उमेदवारांनी लढवली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 00:10 IST

रायगड मतदारसंघ : १९७१ सालापासून अपक्ष लढवण्याची परंपरा

- आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकीत जिंकून येण्याची प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते. मात्र, विजयी हा एकच उमेदवार होतो. काहींना निवडणूक लढवण्याची ऊर्मी असते, तर काहींना राजकीय पक्ष तिकीट नाकारतात म्हणून ते अपक्ष लढतात. पूर्वीचा कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदार संघात १९५२ ते २०१४ सालापर्यंत एकूण ३२ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. १९७१ सालापासून अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवण्याची परंपरा सुरू झाली होती. १९८४ साली काँग्रेससोबत फारकत घेतलेले बॅ.ए.आर.अंतुले हे एकमेव अपक्ष उमेदवार आहेत. ज्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चारीमुंड्या चित करत त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती.

पूर्वी एका विचारधारेसाठी अथवा काही राजकीय डावपेचांसाठी अपक्षांनी निवडणूक लढल्याचा इतिहास आहे. १९५२ साली कुलाबा लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि शेकाप हे दोनच प्रमुख राजकीय पक्ष होते. १९५७, १९६२ सालापर्यंत हीच परंपरा कायम होती. मात्र, १९६७ साली काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी जनसंघाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.

१९७१ साली अंबाजी तुकाराम पाटील यांनी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर काँग्रेसचे शंकर सावंत, शेकापचे दत्तात्रेय नारायण पाटील या प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान होेते. त्यानंतर १९७७ साली शेकाप आणि काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती. १९८० सालीच्या लोकसभा निवडणुकीत रतिलाल लल्लुदास शहा यांच्या रूपाने पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार लाभला. त्या वेळी काँग्रेस, शेकाप आणि जनता पार्टी या उमेदवाराचे आव्हान होते. १९८४ साली काँग्रेसचे बॅ.ए.आर. अंतुले यांचे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत पटले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी कृष्णा गायकवाड, विलास तुपे हे अपक्ष तर काँग्रेसकडून अंबाजी पाटील आणि शेकापचे दिनकर पाटील निवडणूक लढले होते. त्यामध्ये अपक्ष असणाऱ्या बॅ.ए.आर.अंतुले यांनी सर्वच उमेदवारांना धूळ चारली होती. बॅ.अंतुले हे निवडून आलेले एकमेव अपक्ष उमेदवार ठरले होते. त्यांच्यानंतर कोणत्याच अपक्षाला निवडणूक जिंकता आलेली नाही. बॅ.अंतुले यांची राजकीय ताकद होती हे काही वेगळे सांगायची गरज नाही.

१९८९ साली विश्वनाथ बाप्पये यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर १९९१ साली सहा अपक्षांनी आपले राजकीय नशीब आजमावले होते. १९९६ साली तर अपक्ष उमेदवारांनी चांगलीच कमाल केली. तब्बल १२ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून प्रतिस्पर्धी उमेदवारांना चक्रावून सोडले होते. १९९८ साली एक, १९९९ साली दोन, २००४ साली एकच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २००९ साली नव्याने अस्तित्वात आलेल्या रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. प्रवीण मधुकर ठाकूर, डॉ.सिद्धार्थ पाटील, सुनील नाईक असे तीन अपक्ष उमेदवार होते.

यंदा १२ अपक्ष रिंगणातच्२०१९ सालच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल १२ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.च्८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात त्यावरच अपक्ष उमेदवारांची संख्या कळणार आहे.

टॅग्स :raigad-pcरायगड