शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वादळामुळे ३२ टक्के बागायत क्षेत्र बाधित; मुरूडमध्ये ७९४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:04 IST

नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट

मुरूड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील २५०३ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ७९४ हेक्टर भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याने मुरूड तालुक्यातील नारळ, सुपारी, आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकसानीच्या मानाने शासनाने केलेली मदत कमीच असल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट दिसत आहे.

नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट पाहावी लागणार आहे. उंच माडाची झाडे एकावर एक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नारळाचे बहुतांशी झाप पडल्याने फळधारणा होण्यासाठी झापांची जाळी तयार होईपर्यंत थांबावे लागणार आहे. माडी व्यवसाय करणाऱ्यांवरदेखील संक्रांत आली असून दहापैकी २ ते ३ झाडे माडी काढण्यायोग्य राहिली आहेत. माडी काढताना आधारासाठी माडावर पुरेसे झाप नसतील तर माडी निघत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील कित्ते भंडारी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा माडीचा असून वेगाने सुटलेल्या वाºयाने माडाचे झाप उडून गेल्याने झाड बोडके झाले व परिणामत: या झाडांनी आता माडी देणे बंद केल्याने या भागात माडीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे निसर्ग चक्रीवादळामुळे नारळ व सुपारीची अनेक झाडे पडल्याने या भागात नारळांचा तुटवडा निर्माण झाला असून, चढ्या किमतीने आता नारळांची विक्री होताना दिसत आहे. तर सुपारीचीसुद्धा अनेक झाडे पडल्याने सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे.

२० टक्के आंबा बागायत लागवड ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने या बागांचे मोठे नुकसान झाले. तौलनिकदृष्ट्या सुपारीचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद आहे. नवीन बागायत तयार व्हायला किमान १० वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे प्रशासकीय पातळीवर केले. मात्र आंब्याला हेक्टरी ५० हजार, नारळास प्रति झाडास २५० रु पये तर सुपारीस ५० रु पये इतकी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. २५९० शेतकºयांना अनुदान स्वरूपात वाटप करण्यात आले. खरे पाहता आंब्यापासून सरासरी १० हजार, नारळापासून २ हजार तर सुपारीपासून १ हजार रु. वार्षिक उत्पन्न मिळते. बागायतदारांच्या एकूण क्षेत्रापैकी ३२ टक्के क्षेत्र चक्रीवादळामुळे बाधित झाले असून बळीराजाला नवीन लागवड केल्यानंतर किमान १० वर्षे उत्पन्न मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जाते.

सुपारीच्या रोपांची टंचाई

च्कोकणात अत्यल्प भूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रति गुंठा १२ ते १३ सुपारीची लागवड केली जाते. सुपारी पिकाचे वादळात अतोनात नुकसान झाले. नवीन लागवडीसाठी साहजिकच धावाधाव सुरू झाली. च्जिल्ह्यातील वेश्वी, आवास, रोहा व श्रीवर्धन या शासकीय रोपवाटिकांमध्ये रोपांचा तुटवडा आल्याने कृषी खात्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुपारीची रोपे मागवावी लागली. रोपे विनामूल्य असली तरी वाहतूक खर्चापोटी प्रति रोपास ८ रुपये शेतकºयांना चुकवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.एकूण लागवड क्षेत्र नुकसानआंबा १५९० हेक्टर ६२९ हेक्टरनारळ ४३५ ७८सुपारी ४१६ १४२इतर पिके ६२ ४५

टॅग्स :Raigadरायगड