शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे ३२ टक्के बागायत क्षेत्र बाधित; मुरूडमध्ये ७९४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:04 IST

नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट

मुरूड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील २५०३ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ७९४ हेक्टर भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याने मुरूड तालुक्यातील नारळ, सुपारी, आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकसानीच्या मानाने शासनाने केलेली मदत कमीच असल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट दिसत आहे.

नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट पाहावी लागणार आहे. उंच माडाची झाडे एकावर एक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नारळाचे बहुतांशी झाप पडल्याने फळधारणा होण्यासाठी झापांची जाळी तयार होईपर्यंत थांबावे लागणार आहे. माडी व्यवसाय करणाऱ्यांवरदेखील संक्रांत आली असून दहापैकी २ ते ३ झाडे माडी काढण्यायोग्य राहिली आहेत. माडी काढताना आधारासाठी माडावर पुरेसे झाप नसतील तर माडी निघत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील कित्ते भंडारी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा माडीचा असून वेगाने सुटलेल्या वाºयाने माडाचे झाप उडून गेल्याने झाड बोडके झाले व परिणामत: या झाडांनी आता माडी देणे बंद केल्याने या भागात माडीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे निसर्ग चक्रीवादळामुळे नारळ व सुपारीची अनेक झाडे पडल्याने या भागात नारळांचा तुटवडा निर्माण झाला असून, चढ्या किमतीने आता नारळांची विक्री होताना दिसत आहे. तर सुपारीचीसुद्धा अनेक झाडे पडल्याने सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे.

२० टक्के आंबा बागायत लागवड ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने या बागांचे मोठे नुकसान झाले. तौलनिकदृष्ट्या सुपारीचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद आहे. नवीन बागायत तयार व्हायला किमान १० वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे प्रशासकीय पातळीवर केले. मात्र आंब्याला हेक्टरी ५० हजार, नारळास प्रति झाडास २५० रु पये तर सुपारीस ५० रु पये इतकी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. २५९० शेतकºयांना अनुदान स्वरूपात वाटप करण्यात आले. खरे पाहता आंब्यापासून सरासरी १० हजार, नारळापासून २ हजार तर सुपारीपासून १ हजार रु. वार्षिक उत्पन्न मिळते. बागायतदारांच्या एकूण क्षेत्रापैकी ३२ टक्के क्षेत्र चक्रीवादळामुळे बाधित झाले असून बळीराजाला नवीन लागवड केल्यानंतर किमान १० वर्षे उत्पन्न मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जाते.

सुपारीच्या रोपांची टंचाई

च्कोकणात अत्यल्प भूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रति गुंठा १२ ते १३ सुपारीची लागवड केली जाते. सुपारी पिकाचे वादळात अतोनात नुकसान झाले. नवीन लागवडीसाठी साहजिकच धावाधाव सुरू झाली. च्जिल्ह्यातील वेश्वी, आवास, रोहा व श्रीवर्धन या शासकीय रोपवाटिकांमध्ये रोपांचा तुटवडा आल्याने कृषी खात्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुपारीची रोपे मागवावी लागली. रोपे विनामूल्य असली तरी वाहतूक खर्चापोटी प्रति रोपास ८ रुपये शेतकºयांना चुकवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.एकूण लागवड क्षेत्र नुकसानआंबा १५९० हेक्टर ६२९ हेक्टरनारळ ४३५ ७८सुपारी ४१६ १४२इतर पिके ६२ ४५

टॅग्स :Raigadरायगड