शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश

By निखिल म्हात्रे | Updated: March 30, 2025 19:29 IST

या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात गावातील ४ कुटुंबांचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील घरकुल योजनेतील लाभार्थी ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी (दि.३०) करण्यात आला. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्ग रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. लाभार्थी कुटुंबीयांना गृहप्रवेश करण्यासाठी गावागावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात गावातील ४ कुटुंबांचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहूल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, माजी सरपंच मिलिद कवळे यांच्यासह अलिबाग पंचायत समिती अधिकारी, वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनेंतर्गत मागील काही दिवसात मोठ्या संख्येने घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. कामे वेळेत पूर्ण करून लाभार्थी कुटुंबांना ताबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात घरकुल योजनांतर्गत ३ हजार १७७ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. या घरकुलांमध्ये लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. यासाठी गावागावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गृहप्रवेश कार्यक्रमांचे आयोजन करून, लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश करण्यात आला.  रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात ३२२ कुटुंबांचा गृहप्रवेश झाला असून, कर्जत १५६, खालापूर ९८, महाड ३२७, माणगाव ४५३, म्हसळा १०२, मुरुड १५४, पनवेल १४७, पेण ४०२, पोलादपूर ९७, रोहा ४५६, श्रीवर्धन ५०, सुधागड ३१७, तळा ५७, उरण ३९ कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाला.घरकुलांचे कामे अत्यंत नियोजनरित्या पूर्ण करण्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाचे अभिनंदन. आज अनेक कुटुंबांचे घरकुलांच स्वप्न पूर्ण झाले आहे. आणखी जे कुणी पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहिले असतील ते लाभार्थी शोधून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.- महेंद्र दळवी, आमदारआज आम्हाला निवारा प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेतून आम्हाला घर बांधून मिळाले. याबाबत प्रशासनाचे आभार. - अरुणा पवार, लाभार्थी, वरसोली.

टॅग्स :alibaugअलिबाग