शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बांधायची हाेती २७१ घरे, मात्र दाेन वर्षांत बांधली फक्त ६६; तळीयेच्या दरडग्रस्तांच्या दारी आपलं शासन येणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 09:20 IST

पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दरडग्रस्त तळीये गावाचे शासनामार्फत पुनर्वसन करण्यात येत आहे. म्हाडामार्फत २७१ घरे बांधली जात आहेत. मात्र ६६ घरे बांधून देतानाच म्हाडाची दमछाक झाली आहे. उर्वरित घरांसाठी अजून किती वाट पाहावी लागणार, असा सवाल तळीयेकर करीत आहेत. २१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळली. यात ९० जणांचा मृत्यू झाला आणि पूर्ण गाव दरडीखाली गेले होते.

६६ घरांची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात घराबाहेरील सुविधांची कामे अपूर्णच आहेत. घराबाहेरील पिचिंग, ड्रेनेज आणि इतर कामांसाठी निधी मंजूर नसल्याने ही कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यापूर्वी तळीयेकरांचा गृहप्रवेश होईल, असे जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने गृहप्रवेश लांबणीवर गेला आहे. वृत्तपत्रांनी यावर आवाज उठविल्यानंतर अखेर ६६ घरांची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आलेली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरले असून, यंदाचा पावसाळा कंटेनरमध्ये राहूनच काढावा लागत आहे. शासन, प्रशासनाने तळीयेमध्ये येऊन आम्ही कसे राहतो हे पाहावे, अशी संतप्त भावनाही ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. 

पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा अर्धवट काम केलेल्या घरांमध्ये राहायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच बांधण्यात आलेली आधुनिक पद्धतीची घरे ही ग्रामस्थांना अडचणीची ठरत आहेत. ग्रामस्थांनी पारंपरिक घरे देण्याबाबत मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.

रस्ते, पाणीपुरवठ्याचे काय?६६ घरांची कामे पूर्ण झाली असली तरी जिल्हा परिषदेमार्फत होणारे रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची कामे अपूर्ण राहिली आहेत. दोन वर्षांपासून दरडग्रस्त कुटुंबे कंटेनरमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेली सुविधाही अपुरी आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलन