शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

बांधायची हाेती २७१ घरे, मात्र दाेन वर्षांत बांधली फक्त ६६; तळीयेच्या दरडग्रस्तांच्या दारी आपलं शासन येणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 09:20 IST

पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दरडग्रस्त तळीये गावाचे शासनामार्फत पुनर्वसन करण्यात येत आहे. म्हाडामार्फत २७१ घरे बांधली जात आहेत. मात्र ६६ घरे बांधून देतानाच म्हाडाची दमछाक झाली आहे. उर्वरित घरांसाठी अजून किती वाट पाहावी लागणार, असा सवाल तळीयेकर करीत आहेत. २१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळली. यात ९० जणांचा मृत्यू झाला आणि पूर्ण गाव दरडीखाली गेले होते.

६६ घरांची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात घराबाहेरील सुविधांची कामे अपूर्णच आहेत. घराबाहेरील पिचिंग, ड्रेनेज आणि इतर कामांसाठी निधी मंजूर नसल्याने ही कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यापूर्वी तळीयेकरांचा गृहप्रवेश होईल, असे जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने गृहप्रवेश लांबणीवर गेला आहे. वृत्तपत्रांनी यावर आवाज उठविल्यानंतर अखेर ६६ घरांची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आलेली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरले असून, यंदाचा पावसाळा कंटेनरमध्ये राहूनच काढावा लागत आहे. शासन, प्रशासनाने तळीयेमध्ये येऊन आम्ही कसे राहतो हे पाहावे, अशी संतप्त भावनाही ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. 

पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा अर्धवट काम केलेल्या घरांमध्ये राहायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच बांधण्यात आलेली आधुनिक पद्धतीची घरे ही ग्रामस्थांना अडचणीची ठरत आहेत. ग्रामस्थांनी पारंपरिक घरे देण्याबाबत मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.

रस्ते, पाणीपुरवठ्याचे काय?६६ घरांची कामे पूर्ण झाली असली तरी जिल्हा परिषदेमार्फत होणारे रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची कामे अपूर्ण राहिली आहेत. दोन वर्षांपासून दरडग्रस्त कुटुंबे कंटेनरमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेली सुविधाही अपुरी आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलन