शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

अलिबागच्या २४ महिला भक्तांनी अनुभवली आषाढवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:32 AM

लिबागमधील २४ भगिनींनी वारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी जायची तयारी केली. त्यासाठी जवळपास महिनाभर त्यांनी पायी चालण्याचा सराव केला.

अलिबाग : ज्येष्ठ महिना आला की, मनात आषाढी वारीचे चित्र उमटू लागते. यंदा अलिबागमधील २४ भगिनींनी वारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी जायची तयारी केली. त्यासाठी जवळपास महिनाभर त्यांनी पायी चालण्याचा सराव केला. जेव्हा त्या सासवड मुक्कामी पोहोचल्या, तेव्हा निसर्गाचा हिरवा, वारकºयांचा पांढरा (पोशाख) तर ध्वजाचा केशरी अशा तीन रंगात माउलींचा तळ सजला होता. तर पालखीचा रथ झेंडू, निशिगंध, मोगरा, गुलाबाने सजवला होता. या चैतन्यमय वातावरणात आमचे पाय वारकºयांच्या दिंडीसमवेत जेजुरीकडे निघाले. प्रत्येक दिंडीतली वारकºयांची शिस्त सर्वांना शिकवण देणारी होती, अशा अनुभव वारीत सहभागी झालेल्या कवयित्री अनिता जोशी यांनी सांगितला.‘करा शिस्तीचे पालन, माउली देईल दर्शन’ असा भाव प्रत्येक वारकºया ठायी होता. प्रत्येक वारकरी माउलींच्या रस्त्यावर पाय ठेवण्याआधी अगदी वाकून त्या वाटेला नमस्कार करूनच मगच मार्गस्थ होत होता. जागोजागी पाण्याचे टँकर्स, फिरते रुग्णालय, अ‍ॅम्ब्युलन्स अशी वारकºयांसाठी सोय प्रशासनाने केली होती. रस्त्यांवर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. हे सर्व अनुभवत १७ ते १८ कि.मी. अंतर पायी पार करून आम्ही २४ जणींनी कधी जेजुरी गाठले, हे कळलेच नसल्याचे जोशी यांनी सांगितले. आमची एक सखी दिंडीसमवेत पुढे गेली होती. तिचा संपर्क होत नव्हता. तिला शोधण्यात बराच वेळ गेला होता आणि आमचे वाहन पुढे येईपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनसमोर असलेल्या आवारात बसून होतो. तेथील सर्व पोलिसांनी आमच्या भोजनाची सोय केली. पुढच्या वर्षी वाल्हे-नीरा-लोणंद हा २२ कि.मी.चा वारीचा टप्पा पूर्ण करायचा या दृढ निश्चय करूनच परतीच्या प्रवासाला लागल्याचे या वेळी जोशी यांनी सांगितले.३०० पोळ्या करून केली वारकरी सेवाजेजुरी मुक्कामी अलिबागकर भगिनींनी ३०० पोळ्या करून वारकरी सेवा केल्याचा आनंद घेतला. दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता वाल्या कोळीची समाधी असलेल्या वाल्हेकडे वारी निघाली. सुमारे आठ कि.मी. चालल्यावर माउलींचा रथ दिसला आणि त्यानंतर माउलीच्या समवेतच चालण्याचा योग आला आणि आम्ही साºया जणी धन्य झाल्या.महिला उद्योग मंडळाच्या शाळेत अवतरली पंढरीरसायनी : मोहोपाडा येथील महिला उद्योग मंडळाच्या शिशु विकास आणि प्राथमिक शाळेत शनिवार आषाढी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केली होती.मंडळाच्या अध्यक्षा सरोजिनी साजवान, सचिव सुनंदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व मुख्याध्यापक महादेव पाटील यांनी पालखी व पांडुरंगाच्या मूर्तीचे पूजन केले. हरिनामाच्या गजरात पालखी दिंडी मोहोपाडा बाजारपेठेतून, नवीन पोसरीतील विठ्ठल मंदिरात आली. तेथे विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते सादर केली.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीRaigadरायगड