शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय इमारती आणि सरकारी निवासस्थानाची गळती रोखण्यासाठी १७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:51 IST

आच्छादनासाठी निविदा प्रसिद्ध : दरवर्षी होणाऱ्या खर्चाला लगाम घालण्याची गरज

अलिबाग : काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार आहे. सरकारी कार्यालयासह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या छपरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे यंदा पावसाच्या पाण्यापासून होणारी गळती थांबवण्यासाठी कार्यालय आणि घरांच्या छपरावर ताडपत्री टाकावी लागणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १७ लाख रुपयांची ताडपत्री खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तालुक्यातील सरकारी कारभार पाहणाºया कार्यालयांना पावसाळ्यात कार्यालय गळू नये याची प्रत्येक वर्षी चिंता असते. यासाठी यंदाही ताडपत्रीचा आधार घ्यावा लागणार आहे. अलिबागचे तहसीलदार कार्यालय, पोलीस अधीक्षक यांचा बंगला, पोयनाड पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत, अलिबागमधील राखीव पोलीस कार्यालय, सारंग सरकारी विश्रामगृह या ठिकाणी ताडपत्री (टारपोलीन) पुरविण्यासाठी बांधकाम विभागाने १७ लाख १६ हजार ९६ रुपयांची निविदा ३१ मे २०१९ रोजी प्रसिद्ध केली आहे. या निविदेमध्येच जिल्हा कारागृह दुरुस्ती, जिल्हा उत्पादन शुल्क कार्यालय दुरुस्ती, कोषागार कार्यालय दुरुस्ती, उप अभियंता (बांधकाम) यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती यासाठी १३ लाख ६३ हजार ५३७ अशा एकूण ३० लाख ८० हजार ३३३ रकमेच्या कामांचा या निविदेमध्ये समावेश आहे.दरवर्षी सरकारी कार्यालयांवर ताडपत्री टाकणे आणि दुरुस्ती करण्यापेक्षा या कार्यालयांच्या इमारती नवीन बांधण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव का सादर केला जात नाही, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी लाखो रुपयांची कामे काढून सरकारचा म्हणजेच जनतेच्या पैशाचा अपव्यय का केला जातो, असा सवालही त्यांनी केला.

जिल्ह्याचे मुख्यालय असणाºया अलिबाग तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाची इमारत जुनी झाली आहे. विकासासाठी सरकारच्या लाखो रुपयांच्या योजनांची अंमलबाजावणी करणाºया कार्यालयांच्या इमारती दुर्लक्षित होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीवरील कवले फुटली आहेत. मागील काही पावसाळ्यात या कार्यालयात पावसाच्या पाण्याच्या धारा लागत होत्या. त्यामुळे इमारतीच्या छतावर ताडपत्री टाकून गळती बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर २०१७ मध्ये तहसील कार्यालयावर नवीन पत्रे टाकण्यात आले होते. हे पत्रे सुस्थितीत असताना पुन्हा ताडपत्री टाकण्याचे प्रयोजन काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता आर. एस. मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

इमारतींची दुरवस्थातालुक्याची प्रमुख प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना येथील अधिकारी, कर्मचाºयांना करावा लागतो. इमारती नवीन व्हावी यासाठी प्रशासन स्तरावर आणि लोकप्रतिनिधी यापैकी कोणी तरी पुढाकार घेणे गरजेचे आहे, तरच दरवर्षी होणाºया लाखो रुपयांच्या उधळपट्टीला लगाम घालता येणार आहे. अन्यथा दरवर्षी अशाच निविदा निघतील आणि ठेकेदारासह पुरवठादारांचे पोट भरण्याच्या उद्योगाचे चक्र सुरूच राहील.