शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जेएसडब्ल्यूच्या बार्जवरून केली 16 खलाशांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 10:26 IST

भारतीय तटरक्षक दल, रायगड पाेलीस, बंदर विभागाचे संयुक्त बचावकार्य

- अभय आपटे                                                                                                                                    लाेकमत न्यूज नेटवर्क                                                                                                                        रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील खाडीत जेएसडब्ल्यू कंपनीच्या एम.व्ही. मंगलम बार्जला अपघात झाला. हा मालवाहू बार्ज रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हि घटना घडली.  रायगड पाेलीस, तटरक्षक दलाने बचावकार्य मोहीम राबवत १६ खलाशांची सुखरूप सुटका केली, अशी माहिती रायगडचे अतिरिक्त जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

येथील जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही. मंगलम बार्ज सुमारे दाेन हजार ४०० मेट्रिक टन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून निघाली हाेती. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलाेमीटर अंतरावर असताना बार्ज समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची काेणतीच माहिती यंत्रणेला संबंधित कंपनीने दिली नाही. ओहाेटी सुरू झाल्याने गाळात रुतली. याबाबत रायगड पाेलिसांना माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बचावकार्य हाती घेण्यात आले.

बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडेदहा असे तब्बल १७ तास खलाशी बार्जवरच अडकून पडले हाेते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची दाेन हेलिकाॅप्टर, बाेटी बचाव कार्यात पुढे हाेत्या. १६ खलाशांना हेलिकाॅप्टरच्या, तर तीन खलाशांना बाेटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 

सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरुण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधीक्षक अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,  रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

या खलाशांची झाली सुखरूप सुटकाकॅप्टन सुदाम देवनाथ, सिरा राजू, मंतव्य राज, संतोष कुमार कटरी, एसके मुस्लर रहमान, मयांक तांडेल, अमित निशाद, मोहम्मद सरफराज, पवन कुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, सफात मोहम्मद, मनोज कुमार जैस्वाल, पंकज कुमार पटेल, मिजान एसके.