शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

जेएसडब्ल्यूच्या बार्जवरून केली 16 खलाशांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 10:26 IST

भारतीय तटरक्षक दल, रायगड पाेलीस, बंदर विभागाचे संयुक्त बचावकार्य

- अभय आपटे                                                                                                                                    लाेकमत न्यूज नेटवर्क                                                                                                                        रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील खाडीत जेएसडब्ल्यू कंपनीच्या एम.व्ही. मंगलम बार्जला अपघात झाला. हा मालवाहू बार्ज रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हि घटना घडली.  रायगड पाेलीस, तटरक्षक दलाने बचावकार्य मोहीम राबवत १६ खलाशांची सुखरूप सुटका केली, अशी माहिती रायगडचे अतिरिक्त जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

येथील जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही. मंगलम बार्ज सुमारे दाेन हजार ४०० मेट्रिक टन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून निघाली हाेती. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलाेमीटर अंतरावर असताना बार्ज समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची काेणतीच माहिती यंत्रणेला संबंधित कंपनीने दिली नाही. ओहाेटी सुरू झाल्याने गाळात रुतली. याबाबत रायगड पाेलिसांना माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बचावकार्य हाती घेण्यात आले.

बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडेदहा असे तब्बल १७ तास खलाशी बार्जवरच अडकून पडले हाेते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची दाेन हेलिकाॅप्टर, बाेटी बचाव कार्यात पुढे हाेत्या. १६ खलाशांना हेलिकाॅप्टरच्या, तर तीन खलाशांना बाेटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 

सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरुण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधीक्षक अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,  रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

या खलाशांची झाली सुखरूप सुटकाकॅप्टन सुदाम देवनाथ, सिरा राजू, मंतव्य राज, संतोष कुमार कटरी, एसके मुस्लर रहमान, मयांक तांडेल, अमित निशाद, मोहम्मद सरफराज, पवन कुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, सफात मोहम्मद, मनोज कुमार जैस्वाल, पंकज कुमार पटेल, मिजान एसके.