शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यात १५७८ कारखाने प्रदूषणकारी, भाताच्या कोठारात रासायनिक आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:50 IST

भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र...

- जयंत धुळपअलिबाग - भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र वाढत्या प्रदूषणाचा फटका रायगडवासीयांना बसू लागला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१६-१७ मधील उद्योगांच्या प्रदूषण निर्देशांकानुसार जिल्ह्यात ६० किंवा त्यापेक्षा अधिक अशा ‘लाल’रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या तब्बल ६३४ आहे. यामध्ये १७५ मोठे उद्योग, ३१ मध्यम उद्योग तर ४२८ लहान उद्योगांचा समावेश आहे.४१ ते ५९ दरम्यानच्या ‘नारंगी’ रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात एकूण ४७७ आहे. त्यामध्ये ८८ मोठे, ३४ मध्यम तर ३५५ लहान उद्योग आहेत. २१ ते ४० दरम्यानच्या ‘हिरवा ’ रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात एकूण ४६७ आहे. त्यामध्ये एकही मोठा उद्योग नाही, याचाच दुसरा अर्थ मोठे सर्व उद्योग प्रदूषणकारी असल्याचे स्पष्ट होते. २० मध्यम आणि ४४७ लहान उद्योग या ‘हिरव्या’ रंगश्रेणीमध्ये आहेत.मुंबई शहरात रासायनिक कारखान्यांतून होणारे प्रदूषण गंभीर स्वरुपाचे झाल्यावर सुमारे ४० वर्षांपूर्वी मुंबईतील रासायनिक कारखाने मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला. मुंबईस खेटूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात हे रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.उद्योजकांनी आपले कारखाने रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करावेत याकरिता विशेष प्रोत्साहन योजना देखील त्यावेळी अमलात आणण्यात आली. रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यातूनच रायगड जिल्ह्यात रसायनी ही पहिली औद्योगिक वसाहत जन्माला आली.मुंबईतून रायगडमध्ये आलेले विविध रासायनिक कारखाने आणि नव्याने थेट रायगडमध्ये आलेले रासायनिक कारखाने यातून एकीकडे रोजगार निर्माण झाला, मात्र त्याकरिता प्रदूषणाची मोठी किंमत रायगडला मोजावी लागली आहे.नद्यांच्या जलप्रदूषणातून जलदुर्भिक्षाच्या समस्येचा जन्मरायगड जिल्ह्यातील पाताळगंगा, गाढी, अंबा, कुंडलिका,सावित्री आदी प्रमुख नद्यांच्या किनारी तळोजा, पनवेल, रसायनी, रोहा, महाड या महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या महाकाय औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आणि त्यात हे सारे रासायनिक कारखाने आले.रासायनिक कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी पिण्याच्या पाण्याचा नैसगिक स्रोत असणाऱ्या या नद्यांच्या पाण्यात सोडण्यात आल्याने या नद्या कायमस्वरुपी प्रदूषित होवून, पाण्याचे दुर्भिक्ष जिल्ह्यात निर्माण झाले.दरम्यान, याच नद्यांवर बांधण्यात आलेल्या धरणांतील पिण्याचे पाणी अधिक प्रमाणात जिल्ह्यात आलेल्या रासायनिक कारखान्यांनाच देण्यात आल्याने जिल्ह्यातील दुबार शेतीला पाणी मिळण्याचे शेतकºयांचे स्वप्न विरुन गेले. शासनाला दरवर्षी उन्हाळ््यात कोट्यवधी रुपये खर्च करुन पिण्याचे पाणी नदी किनारच्या गावांमध्ये उपलब्ध करुन द्यावे लागले.जिल्ह्यात वायू प्रदूषणाचे प्रमाणदेखील मोठेजलप्रदूषणाबरोबरच जिल्ह्यात वायू प्रदूषणाचे प्रमाणदेखील मोठे आहे. या वायू प्रदूषणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील भातशेतीसह भाजीपाला, आंबा, नारळ, सुपारी या प्रमुख पिकांवर होत असल्याचा निष्कर्ष प्रयोगशील शेतकरी महेश्वर देशमुख यांचा आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या