शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात १५७८ कारखाने प्रदूषणकारी, भाताच्या कोठारात रासायनिक आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:50 IST

भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र...

- जयंत धुळपअलिबाग - भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र वाढत्या प्रदूषणाचा फटका रायगडवासीयांना बसू लागला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१६-१७ मधील उद्योगांच्या प्रदूषण निर्देशांकानुसार जिल्ह्यात ६० किंवा त्यापेक्षा अधिक अशा ‘लाल’रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या तब्बल ६३४ आहे. यामध्ये १७५ मोठे उद्योग, ३१ मध्यम उद्योग तर ४२८ लहान उद्योगांचा समावेश आहे.४१ ते ५९ दरम्यानच्या ‘नारंगी’ रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात एकूण ४७७ आहे. त्यामध्ये ८८ मोठे, ३४ मध्यम तर ३५५ लहान उद्योग आहेत. २१ ते ४० दरम्यानच्या ‘हिरवा ’ रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात एकूण ४६७ आहे. त्यामध्ये एकही मोठा उद्योग नाही, याचाच दुसरा अर्थ मोठे सर्व उद्योग प्रदूषणकारी असल्याचे स्पष्ट होते. २० मध्यम आणि ४४७ लहान उद्योग या ‘हिरव्या’ रंगश्रेणीमध्ये आहेत.मुंबई शहरात रासायनिक कारखान्यांतून होणारे प्रदूषण गंभीर स्वरुपाचे झाल्यावर सुमारे ४० वर्षांपूर्वी मुंबईतील रासायनिक कारखाने मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला. मुंबईस खेटूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात हे रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.उद्योजकांनी आपले कारखाने रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करावेत याकरिता विशेष प्रोत्साहन योजना देखील त्यावेळी अमलात आणण्यात आली. रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यातूनच रायगड जिल्ह्यात रसायनी ही पहिली औद्योगिक वसाहत जन्माला आली.मुंबईतून रायगडमध्ये आलेले विविध रासायनिक कारखाने आणि नव्याने थेट रायगडमध्ये आलेले रासायनिक कारखाने यातून एकीकडे रोजगार निर्माण झाला, मात्र त्याकरिता प्रदूषणाची मोठी किंमत रायगडला मोजावी लागली आहे.नद्यांच्या जलप्रदूषणातून जलदुर्भिक्षाच्या समस्येचा जन्मरायगड जिल्ह्यातील पाताळगंगा, गाढी, अंबा, कुंडलिका,सावित्री आदी प्रमुख नद्यांच्या किनारी तळोजा, पनवेल, रसायनी, रोहा, महाड या महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या महाकाय औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आणि त्यात हे सारे रासायनिक कारखाने आले.रासायनिक कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी पिण्याच्या पाण्याचा नैसगिक स्रोत असणाऱ्या या नद्यांच्या पाण्यात सोडण्यात आल्याने या नद्या कायमस्वरुपी प्रदूषित होवून, पाण्याचे दुर्भिक्ष जिल्ह्यात निर्माण झाले.दरम्यान, याच नद्यांवर बांधण्यात आलेल्या धरणांतील पिण्याचे पाणी अधिक प्रमाणात जिल्ह्यात आलेल्या रासायनिक कारखान्यांनाच देण्यात आल्याने जिल्ह्यातील दुबार शेतीला पाणी मिळण्याचे शेतकºयांचे स्वप्न विरुन गेले. शासनाला दरवर्षी उन्हाळ््यात कोट्यवधी रुपये खर्च करुन पिण्याचे पाणी नदी किनारच्या गावांमध्ये उपलब्ध करुन द्यावे लागले.जिल्ह्यात वायू प्रदूषणाचे प्रमाणदेखील मोठेजलप्रदूषणाबरोबरच जिल्ह्यात वायू प्रदूषणाचे प्रमाणदेखील मोठे आहे. या वायू प्रदूषणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील भातशेतीसह भाजीपाला, आंबा, नारळ, सुपारी या प्रमुख पिकांवर होत असल्याचा निष्कर्ष प्रयोगशील शेतकरी महेश्वर देशमुख यांचा आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या