शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधून १५ हजार मजूर स्वगृही रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:28 IST

आतापर्यंत मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता २, उत्तरप्रदेशकरिता २ तर बिहार आणि ओरिसाकरिता प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.

पनवेल : लॉकडाउनमुळे नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओडिसा राज्यातील तब्बल १५ हजार १०४ मजूर विशेष रेल्वेने स्वगृही पाठविण्यात आले.आतापर्यंत मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता २, उत्तरप्रदेशकरिता २ तर बिहार आणि ओरिसाकरिता प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विशाल दौंडकर, अमित सानप यांच्या एकत्रित नियोजनाने सुरळीत पार पडली.कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर देशभरात लाखो मजूर विविध राज्यांत अडकून पडले होते. त्याचप्रमाणे रायगडमध्येही मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा येथील हजारो मजूर अडकले होते.रेल्वेत बसण्यापूवी सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना स्वगृही जाण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून पनवेल रेल्वेस्थानकात बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांना जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यातआले. रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाइझर करणे व स्थानकावर निर्जंतुकीकरण केले होते.गावी जायला मिळत असल्याने मजुरांच्या चेहºयावर समाधान होते, गावी जाण्याची, कुटुंबाला भेटण्याची ओढ होती. गाडी निघताना प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे, प्रशासनाचे, रेल्वे स्थानकात उपस्थित प्रत्येकाचेटाळ्या वाजवून मन:पर्वूक आभारव्यक्त केले.२८६ कामगार उत्तरप्रदेशला रवानामोहोपाडा : चौक परिसरातून २८६ मजूर उत्तरप्रदेशसाठी रवाना झाले आहेत. मजुरांना सुरुवातीला १२ बसमधून पनवेलला पाठविण्यात आले, त्यानंतर रेल्वेने मूळ गावी रवाना करण्यात आले. गावी जाण्याची मुभा मिळाल्यावर, कामगारांनी कुटुंबासह गर्दी केली होती. खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक व कर्मचारी यांनी शेकडो कामगारांना एकत्र केले. अर्ज भरून २८६ जणांना १२ एसटी बसमधून पनवेल रेल्वेस्थानकात सोडण्यात आले. या वेळी त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तलाठी व ग्रामसेवकांनी स्वखर्चाने केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस