शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डागडुजीसाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित, खासगी खारभूमी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:58 IST

- जयंत धुळपअलिबाग : कोकणातील रायगड जिल्ह्यातील ३३, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी १०, पालघर ७ आणि ठाणे जिल्ह्यातील ३ अशा एकूण ६४ खासगी खारभूमी योजना शेतकºयांकडून सरकारच्या खारभूमी विकास मंडळाच्या ताब्यात घेवून त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी केल्यास या चार जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३३५ हेक्टर भूक्षेत्र पुन:प्रापित होवून तेथे पूर्वीप्रमाणे भातशेती ...

- जयंत धुळपअलिबाग : कोकणातील रायगड जिल्ह्यातील ३३, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी १०, पालघर ७ आणि ठाणे जिल्ह्यातील ३ अशा एकूण ६४ खासगी खारभूमी योजना शेतकºयांकडून सरकारच्या खारभूमी विकास मंडळाच्या ताब्यात घेवून त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी केल्यास या चार जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३३५ हेक्टर भूक्षेत्र पुन:प्रापित होवून तेथे पूर्वीप्रमाणे भातशेती होवू शकते. या ६४ खासगी खारभूमी योजनांच्या दुरुस्ती आणि डागडुजीकरिता अपेक्षित व अंदाजपत्रकीय खर्च १५० कोटी ५३ लाख रुपये आहे. या खासगी खारभूमी योजना सरकारच्या ताब्यात घेवून त्यांची दुरुस्ती करून भूक्षेत्र पुन:प्रापित करून पुन्हा एकदा भातशेती लागवड सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव खारभूमी विकास मंडळाचे प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता अ.पा.अव्हाड आणि कोकण विभागीय जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता खलील अन्सारी यांच्याकडून नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.उर्वरित महाराष्ट्रातील शेतकºयांप्रमाणे कोकणातील शेतकºयांच्या वाट्याला देखील अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, परंतु सागराप्रमाणे आत्मविश्वास आणि प्रचंड संयमी मानसिकता याच्या जोरावर आलेल्या संकटांवर मात करून कोकणातील शेतकºयांनी आपल्या उदरनिर्वाहाकरिता शेती व्यतिरिक्तच्या मजुरी वा रोजंदारी यांचा स्वीकार केला. मात्र आत्महत्येकडे तो कधीही वळला नाही. त्यांच्या या संयमी मानसिकतेचे फलित त्यांना आता या नव्या प्रस्तावाच्या मान्यतेअंती प्राप्त होवू शकणार आहे. येत्या हिवाळी नागपूर अधिवेशनात या प्रस्तावास नक्की मान्यता मिळेल. कोकणातील संयमी शेतकºयाची भातशेती पुन्हा बहरणार आणि त्याकरिता श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय संघटक डॉ.भारत पाटणकर यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा संघटक राजन भगत यांनी सांगितले.खासगी खारभूमी योजना सरकारने ताब्यात घेण्यामागची कारणमीमांसा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अनेक वर्षे शेतकरी सहकार (जोळ) तत्त्वावर या खासगी खारभूमी योजनांची दुरुस्ती करीत असत. परंतु आता याकरिता आवश्यक असलेले मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. या पार्श्वभूमीवर या योजना सरकारने ताब्यात घेवून त्यांची देखभाल दुरुस्ती करावी असा प्रस्ताव श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय संघटक डॉ.भारत पाटणकर यांनी सरकारला सादर केला होता.उघाड्यांची बांधकामे तांत्रिक मानकाप्रमाणे आवश्यकच्खासगी खारभूमी योजना या सुमारे ५० ते ५५ वर्र्षांपूर्वीच्या असून त्या अष्मपटल विरहित तसेच फक्त मातीत बांधलेल्या असल्याने या योजनांची तात्पुरती दुरुस्ती करून योजना सुस्थितीत ठेवणे शक्य होत नाही.च्या योजनांच्या बांधाची कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून खारभूमी योजनेचे तांंत्रिक मानक १२ मार्च २०१३ अन्वये बांधाचा काटच्छेद ठरविणे तसेच उच्चतम भरती-पातळीचा अभ्यास करून याप्रमाणे त्या योजनांची कामे हाती घेणे आवश्यक आहे.च्या योजनांच्या उघाड्यांची बांधकामे ही दगडामध्ये केलेली असून ही बांधकामे करून बराच कालावधी लोटल्याने उघाड्या कमकुवत झाल्या आहेत. या उघाड्यांची बांधकामे कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून खारभूमीच्या तांत्रिक मानकाप्रमाणे पूर्णपणे संधानकात बांधणे आवश्यक आहेत.च्बºयाच शासकीय योजनांना लागून काही खासगी योजना आहेत. खासगी योजनांमध्ये खांडी (भगदाडे) पडल्यास तेथील शासकीय योजना निरुपयोगी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात उद्भवते. या पार्श्वभूमीवर खासगी खारभूमी योजना सरकारने ताब्यात घेण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

टॅग्स :Raigadरायगड