शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

महामार्ग भूसंपादनासाठी १२४३ कोटींचे वितरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:00 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील इंदापूर (माणगाव) ते पोलादपूर या टप्प्यातील चौपदरीकरणाकरिता भूमी संपादन प्रक्रिया गतिमान झाली आहे. माणगाव तालुक्यात २६ गावांतील

- जयंत धुळप 

अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील इंदापूर (माणगाव) ते पोलादपूर या टप्प्यातील चौपदरीकरणाकरिता भूमी संपादन प्रक्रिया गतिमान झाली आहे. माणगाव तालुक्यात २६ गावांतील ६ हजार सहहिस्सेदार शेतकºयांची १०३ हेक्टर तर महाड व पोलादपूर तालुक्यांतील २१ गावांतील ६१३५ सहहिस्सेदार शेतकºयांची १२५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी अनुक्रमे ७०८ कोटी आणि ५३६ कोटी असा एकूण १२४३ कोटी रुपयांचा आर्थिक मोबदला माणगाव, महाड व पोलादपूर या तीन तालुक्यांमध्ये वितरीत होणार आहे.गेल्या तीन वर्षांतील जमीन खरेदी-विक्रीच्या दराची सरासरी किंवा सरकारी रेडिरेकनर दर यापैकी जो अधिक असेल तो दर शेतकºयांच्या जमिनीला देण्यात येतो. त्यांच पद्धतीने येथील शेतकºयांना जमीनभाव देण्यात आला असून, मोबदला वाटपाचे काम सुरू झाले असून, महाड व पोलादपूर मध्ये सुमारे ६० टक्केपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे.महाड तालुक्यांतील गांधारपले गावांत ६७१ सहहिस्सेदार शेतकºयांची जमीन संपादित करण्यात येत असून त्यांना १६९० रुपये प्रति चौरस मीटर दर देण्यात आला आहे. वीर, दासगाव, वहूर, केबुर्ली, राजेवाडी, कांबळेतर्फे महाड या गावांमध्ये ४९० रुपये प्रति चौरस मीटर, महाड व चांभारखिंड येथे ६०९० रुपये प्रति चौ. मि., नडगाव त. बिरवाड येथे ७४० प्रति चौ. मी., तर चांढवे खुर्द आणि चांढवे बुद्रुक येथे ६०० प्रति चौ. मी. दर देण्यात आला आहे.पोलादपूर तालुक्यात पोलादपूर येथे सर्वाधिक १०३० रुपये प्रति चौ.मी. दर देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी पार्ले, लोहारे, चोळई येथे ६१० तर सडवली, कातळी, भोगाव बुद्रुक, धामण देवी व भोगाव खुर्द येथे ४६० रुपये प्रति चौ. मीटर दर देण्यात आला आहे.माणगाव तालुक्यातील २६ गावांतील ७७२ खातेदार शेतकºयांच्या ६ हजार सहहिस्सेदारांची १०३.४२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, एकूण ७०८ कोटी मोबदला वाटप करण्यात येणार आहे. मोबदला वाटपास ४ जुलैपासून प्रारंभ करून आतापर्यंत १४२ कोटी रुपयांचे वाटप सबहिस्सेदारांना करण्यात आले असल्याची माहिती माणगाव उप विभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब तिडके यांनी दिली आहे. वारसनोंदी रीतसर केल्या नसल्याने काही शेतकºयांना थेट आर्थिक मोबदला देण्यात अडचणी येतआहेत.दरम्यान, अशा शेतकºयांची आता पर्यंत एकूण २५० कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली असल्याचे तिडके यांनी सांगितले. क्षेत्र निश्चिती तसेच वारस नोंदी बाबत संबंधित शेतकºयांना मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे. त्यांच्या नोंदी रीतसर होऊन वारस निश्चिती होताच त्यांना न्यायालयात जमा रक्कम प्राप्त होऊ शकणार आहे. इंदापूर ते पोलादपूर दरम्यानच्या संबंधित शेतकºयांना मोबदला वाटप करण्याचे काम सप्टेंबर २०१७ अखेर पूर्ण होणार आहे.माणगाव तालुक्यांतील २६ गावांतील ७७२ खातेदार शेतकºयांच्या ६ हजार सहहिस्सेदारांची १०३.४२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. एकूण ७०८ कोटी मोबदला वाटप करण्यात येणार आहे. मोबदला वाटपास ४ जुलैपासून प्रारंभ करुन आतापर्यंत १४२ कोटी रुपयांचे वाटप सबहिस्सेदारांना करण्यात आले. तर उर्वरित वाटप लवकरच पूर्ण होईल.- बाळासाहेब तिडके,उप विभागीय महसूल अधिकारी