शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जिल्ह्यात आठ महिन्यात ११२ बेवारस मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 23:58 IST

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे.

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरणासोबत नागरिकरण वाढल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाला जिल्ह्यात ७ ते ८ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी होत आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत असताना, आत्ता पोलिसांसमोर ठिकठीकाणी बेवारस सापडणार्‍या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हाण समोर ठाकले आहे. तसेच बेवारस मृतदेहांचे नातेवाईक न सापडल्यास कोही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही पोलिसांना करावे लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. याचबरोबर गुन्हेगारीचे स्वरुपही बदलले असून, गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात १ जानेवारी ते २०ऑगस्ट या काळावधीत रायगड जिल्हा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत ११२ बेवारस मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेवारस मृतदेहांची ओळख पटवित गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. सापडलेल्या ११२ बेवारस मृतेहांपैकी ८६ मतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांनी यश मिळाले असून, उर्वरित २६ बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बेवारस मृतदेह मोठ्या संख्येने सापडत आहेत. चालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते  २० ऑगस्टपर्यंत रायगड जिल्ह्यात ११२ बेवारस मृतदेह सापडले आहेत. या सर्व मृतदेहांची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता -रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तिचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी राज्यभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणाने हे सिद्ध झाले आहे. शिना बोरा हिची मुंबईत हत्या करुन मृतदेहाची रायगड जिल्ह्यात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.बेवारस मृतदेहावर अत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर -सापडलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह हे वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जातात. ३ ते ७ दिवसात या बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी करायचे असते. कित्येकदा पोलिसांना तपास करण्यास काही महिने लागतात. परिणामी मृतदेह सडू लागतात. या मृतदेहाचे अंत्यविधी करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. अंत्यविधीचा खर्चही पोलिसांना करावा लागतोे. तर काही वेळेस स्थिनिक स्वराज्य संस्थांची बेवारस मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यासाठी पोलीस मदत घेतात.