शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

युवांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा : क्रीडामंत्री सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:49 AM

उत्तम आरोग्यासाठी खेळणे महत्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी व्हावे

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर याच्यातर्फे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ’विश्वनाथ स्पोर्ट्स मीट- २०२०’ या स्पर्धेत क्रिकेटमध्ये दिघी येथील एआयटी संघाने तसेच मुंबईच्या वर्तक महाविद्यालयाने सोमवारी विजयी सलामी दिली.

विद्यापीठाच्या लोणी काळभोर येथील मैदानावर ही स्पर्धा आजपासून सुरु झाली. दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एआयटी) संघाने लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूल आॅफ इंजिनिअरिंग संघावर ९ गडी राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करणारा एमआयटी एसओई संघ १५ षटकांत अवघ्या ८० धावांवर गारद झाला. हर्षने १३ धावांत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात, एआयटीने अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.यात जय याने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले.

मुंबईच्या वर्तक महाविद्यालयाने चुरशीच्या लढतीत सांगली महाविद्यालय संघावर ४ धावांच्या निसटत्य फरकाने मात केली. वर्तक महाविद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ७ बाद ६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सांगली महाविद्यालय संघाला ६३ धावाच करता आल्या. २४ धावा आणि ४ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तेजस डोंगरे विजयाचा शिल्पकार ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, |ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारविजेती नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव शिवशरण माळी, विश्वनाथ स्पोर्ट्स मीटच्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश पाटील, डॉ. किशोर रवांदे, समीर दरेकर, सुभेदार सोममंगल गायकवाड, क्रीडा संचालक पद्माकर फड यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू अहोना मजुमदार, सिद्धार्थ गर्ग यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी प्रस्ताविक तर, सुदेशना रे, वैष्णव काळभोर आणि श्रेया उटेकर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. स्टीफन सॅबेस्टियन याने आभार मानले.युवांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा : क्रीडामंत्री सुनील केदार‘‘उत्तम आरोग्यासाठी खेळणे महत्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी व्हावे. आरोग्य चांगले असले तर विचार मजबूत होतात. राज्याचा क्रीडामंत्री म्हणून खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम माझे आहे. ते येत्या काळात मी करणारच आहे. आजघडीला जगात सर्वाधिक युवक आपल्या देशात आहे. मात्र, आपला युवावर्ग हा सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. दिवसातील सरासरी ८ तास तो इंटरनेटवर असतो. या आभासी दुनियेत रममाण होऊन आपला युवा वर्ग वास्तवापासून दूर जात आहे. अशी पिढी घेऊन आम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर शस्त्र म्हणून व्हायला हवा. युवांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटचा अतिरेक टाळावा. यासाठी युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून लवकरच योजना जाहीर करण्यात येईल,’’ असे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नमूद केले.

तेजस्विनी सावंत म्हणाली, ‘’राज्यात खेळासाठीचे वातावरण तयार होत आहे.खेळात खूप चांगले करिअर आहे. मेहनतीला कोणताही पर्याय नसतो. शांतचित्ताने खेळून जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भारताची शान असलेला तिरंगा जगाच्या क्षितिजावर अभिमानाने फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा.’’