शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

युवांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा : क्रीडामंत्री सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:50 IST

उत्तम आरोग्यासाठी खेळणे महत्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी व्हावे

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर याच्यातर्फे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ’विश्वनाथ स्पोर्ट्स मीट- २०२०’ या स्पर्धेत क्रिकेटमध्ये दिघी येथील एआयटी संघाने तसेच मुंबईच्या वर्तक महाविद्यालयाने सोमवारी विजयी सलामी दिली.

विद्यापीठाच्या लोणी काळभोर येथील मैदानावर ही स्पर्धा आजपासून सुरु झाली. दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एआयटी) संघाने लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूल आॅफ इंजिनिअरिंग संघावर ९ गडी राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करणारा एमआयटी एसओई संघ १५ षटकांत अवघ्या ८० धावांवर गारद झाला. हर्षने १३ धावांत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात, एआयटीने अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.यात जय याने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले.

मुंबईच्या वर्तक महाविद्यालयाने चुरशीच्या लढतीत सांगली महाविद्यालय संघावर ४ धावांच्या निसटत्य फरकाने मात केली. वर्तक महाविद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ७ बाद ६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सांगली महाविद्यालय संघाला ६३ धावाच करता आल्या. २४ धावा आणि ४ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तेजस डोंगरे विजयाचा शिल्पकार ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, |ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारविजेती नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव शिवशरण माळी, विश्वनाथ स्पोर्ट्स मीटच्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश पाटील, डॉ. किशोर रवांदे, समीर दरेकर, सुभेदार सोममंगल गायकवाड, क्रीडा संचालक पद्माकर फड यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू अहोना मजुमदार, सिद्धार्थ गर्ग यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी प्रस्ताविक तर, सुदेशना रे, वैष्णव काळभोर आणि श्रेया उटेकर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. स्टीफन सॅबेस्टियन याने आभार मानले.युवांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा : क्रीडामंत्री सुनील केदार‘‘उत्तम आरोग्यासाठी खेळणे महत्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी व्हावे. आरोग्य चांगले असले तर विचार मजबूत होतात. राज्याचा क्रीडामंत्री म्हणून खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम माझे आहे. ते येत्या काळात मी करणारच आहे. आजघडीला जगात सर्वाधिक युवक आपल्या देशात आहे. मात्र, आपला युवावर्ग हा सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. दिवसातील सरासरी ८ तास तो इंटरनेटवर असतो. या आभासी दुनियेत रममाण होऊन आपला युवा वर्ग वास्तवापासून दूर जात आहे. अशी पिढी घेऊन आम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर शस्त्र म्हणून व्हायला हवा. युवांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटचा अतिरेक टाळावा. यासाठी युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून लवकरच योजना जाहीर करण्यात येईल,’’ असे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नमूद केले.

तेजस्विनी सावंत म्हणाली, ‘’राज्यात खेळासाठीचे वातावरण तयार होत आहे.खेळात खूप चांगले करिअर आहे. मेहनतीला कोणताही पर्याय नसतो. शांतचित्ताने खेळून जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भारताची शान असलेला तिरंगा जगाच्या क्षितिजावर अभिमानाने फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा.’’