शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:43 IST

दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा मोहन फडणीस यांनी व्यक्त केली.  

ठळक मुद्देहस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे स्वप्ने

पुणे : ‘भक्तांचेनि साभिमाने। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध।’असे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाचे वर्णन केले आहे. दासबोधातील दशके आणि समासांमधून प्रेरणा घेऊन ६५ वर्षीय मोहन फडणीस यांनी हस्तलिखित लिहिले आहे. वाचनाची आवड, आध्यात्मिक बैैठक, शिवथरघळ याठिकाणावरील श्रध्दा यातून हस्तलिखितांची प्रेरणा त्यांना मिळाली. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना मोहन फडणीस म्हणाले, ‘दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. १८ जानेवारी रोजी हस्तलिखित लिहिण्यास सुरुवात केली. ३१ मार्च २०१८ रोजी दासबोध लिहून पूर्ण झाले. हस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ७७५१ ओव्या असून, ११६४ लिखित पाने असून, ९१० पानांवर भावार्थ लिहिण्यात आला आहे.’दासबोधाबरोबरच ग्रंथात असलेली स्वामी समर्थ रामदासांची करुणाष्टके, मनाचे श्लोक, आरत्या या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. हस्तलिखितामध्ये जेथे जागा शिल्लक असेल तेथे समर्थांची चित्रे, श्रीराम जय राम जय जय राम असा जपही लिहिण्यात आला आहे. त्यामुळे हस्तलिखित दर्शनीय आणि वाचनीय बनले आहे. योग्य वेळी हा ग्रंथ शिवथरघळ येथे घळीत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. फडणीस म्हणाले, ‘हस्तलिखित लिहिताना मानसिक समाधान मिळाले. मी नेहमी शिवथरघळला जातो. तेथूनच हस्तलिखितांची प्रेरणा मिळाली. एकाने इंग्रजी भाषेमध्ये हस्तलिखित लिहिल्याचे समजले. तेव्हापासून मराठी हस्तलिखित लिहिण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली.’ फडणीस यांचा पूर्वी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. लहानपणापासून आईला वाचनाची सवय असल्याने फडणीस यांच्यावरही ते संस्कार झाले. अजूनही त्यांच्या घरी दासबोधाची प्रवचने होतात. त्यातून कमालीचे आत्मिक समाधान आणि शांती मिळते. आध्यात्मिक लिखाण करण्यावर त्यांचा भर आहे. शिवथरघळ येथे जाऊन किमान एक समास लिहिण्याची इच्छा आहे. दासबोधानंतर आता ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करण्याचा मानसही फडणीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

टॅग्स :Puneपुणे