शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:43 IST

दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा मोहन फडणीस यांनी व्यक्त केली.  

ठळक मुद्देहस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे स्वप्ने

पुणे : ‘भक्तांचेनि साभिमाने। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध।’असे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाचे वर्णन केले आहे. दासबोधातील दशके आणि समासांमधून प्रेरणा घेऊन ६५ वर्षीय मोहन फडणीस यांनी हस्तलिखित लिहिले आहे. वाचनाची आवड, आध्यात्मिक बैैठक, शिवथरघळ याठिकाणावरील श्रध्दा यातून हस्तलिखितांची प्रेरणा त्यांना मिळाली. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना मोहन फडणीस म्हणाले, ‘दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. १८ जानेवारी रोजी हस्तलिखित लिहिण्यास सुरुवात केली. ३१ मार्च २०१८ रोजी दासबोध लिहून पूर्ण झाले. हस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ७७५१ ओव्या असून, ११६४ लिखित पाने असून, ९१० पानांवर भावार्थ लिहिण्यात आला आहे.’दासबोधाबरोबरच ग्रंथात असलेली स्वामी समर्थ रामदासांची करुणाष्टके, मनाचे श्लोक, आरत्या या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. हस्तलिखितामध्ये जेथे जागा शिल्लक असेल तेथे समर्थांची चित्रे, श्रीराम जय राम जय जय राम असा जपही लिहिण्यात आला आहे. त्यामुळे हस्तलिखित दर्शनीय आणि वाचनीय बनले आहे. योग्य वेळी हा ग्रंथ शिवथरघळ येथे घळीत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. फडणीस म्हणाले, ‘हस्तलिखित लिहिताना मानसिक समाधान मिळाले. मी नेहमी शिवथरघळला जातो. तेथूनच हस्तलिखितांची प्रेरणा मिळाली. एकाने इंग्रजी भाषेमध्ये हस्तलिखित लिहिल्याचे समजले. तेव्हापासून मराठी हस्तलिखित लिहिण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली.’ फडणीस यांचा पूर्वी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. लहानपणापासून आईला वाचनाची सवय असल्याने फडणीस यांच्यावरही ते संस्कार झाले. अजूनही त्यांच्या घरी दासबोधाची प्रवचने होतात. त्यातून कमालीचे आत्मिक समाधान आणि शांती मिळते. आध्यात्मिक लिखाण करण्यावर त्यांचा भर आहे. शिवथरघळ येथे जाऊन किमान एक समास लिहिण्याची इच्छा आहे. दासबोधानंतर आता ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करण्याचा मानसही फडणीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

टॅग्स :Puneपुणे