शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

... म्हणून महाराष्ट्रातील मुलांची लग्न होत नाहीत, शरद पवारांनीचं सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:36 IST

महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत.

पुणे - मुलांचे लग्न ही सध्याच्या समाजातील जटील समस्या बनली आहे. त्यामुळेच, सोलापूर जिल्ह्यातीलम मोहोळ येथील युवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा काढला होता. लग्नासाठी पोरी मिळत नाहीत, म्हणत जिल्हाधिकारी महोदयांनीच आता आमच्याकडे लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मुलांचे लग्न होत नसल्याचं कारण सांगितलं आहे. 

महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या कारणानेच महाराष्ट्रात तरुण मुलांची लग्नं होत नाहीत, असं परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात जनजागर यात्रा सुरु करण्यात आली आहे. पुण्यात या यात्रेचं उद्घाटन झाल्यानंतर शरद पवार बोलत होते. यावेळी, केंद्र आणि राज्य सरकारवरीही त्यांनी टीकास्त्र सोडले. 

राज्य सरकारमधील एका मंत्र्याने राज्यातील काही महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरु केल्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील नेते सोडा, सर्वसामान्य माणूसही कधी भीक मागत नाही. महाराष्ट्रीय माणूस हा श्रम करणारा आणि घामातून कमावणारा माणूस आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांचं नाव न घेत शरद पवारांनी लगावला.

संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात वावगं नाही

अजित पवारांचे संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिले; पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेले लिखाण कोणालाही पसंत पडणारे नाही; पण ते कधीकाळी लिहिलेले होते. ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र, संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही. काही नागरिक, व्यक्ती, घटक संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करतात, तर काही घटक संभाजीराजे यांच्याकडे धर्मवीर म्हणून पाहत असतील, तर त्याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबई