शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तरुणांना पडतोय हृदयरोगाचा विळखा, बदलती जीवनशैली ठरतेय कारणीभूत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 19:46 IST

तरुणांना होणाऱ्या हृदयरोगात वाढ होत असून हे विदयार्थी दशेतच हृदयरोग त्यांच्यात भिनत चालला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या हृषीकेश आहेर या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारे आहे. यामुळे तरुणांच्या हृदयरोगाचे प्रमाण वाढत असण्याच्या विषयाकडे पुन्हा गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या हृषीकेश आहेर या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारे आहे. यामुळे तरुणांच्या हृदयरोगाचे प्रमाण वाढत असण्याच्या विषयाकडे पुन्हा गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून बदलती जीवनशैली तरूणांसाठी घातक ठरू लागली आहे. विविध कारणांमुळे वाढणारा ताण-तणाव, धुम्रपान, खाण्याच्या सवयी यांसह आरोग्याकडे होणाऱ्या  अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक तरूणांना हृदयरोगाचा विळखा पडत आहे. विविध अभ्यासांनुसार, भारतात हे प्रमाण वेगाने वाढत चालले असून २५ ते ३० वयोगटातील तरूणांमधील हृदयरोगाचे प्रमाण अधिक आहे.

जगातील सर्वाधिक तरूण असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. पण ही तरूणाई बदलत्या जीवनशैलीची बळी ठरू लागली आहे. मागील काही वर्षांत तरूणांमध्ये वाढत जाणाऱ्या हृदयरोगाचे प्रमाण धोक्याची घंटा ठरू लागली आहे. अमेरिका, चीन, जपानच्या तुलनेत भारतातील तरूणांना हा धोका कितीतरी पटीने अधिक आहे. तरूणींच्या तुलनेत तरूणांमध्ये हे प्रमाण अधिक असण्याचे प्रमुख कारण धुम्रपान हे ठरत आहे. जीवनशैली बदलल्याने तरूणांमध्ये धुम्रपान, मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तसेच बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी जेवण व पुरेशी झोपही मिळत नाही. आरोग्याकडेही दुर्लक्ष होत असून वेळच्या वेळी तपासण्या केल्या जात नाहीत. त्यामुळेही हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयामध्ये दर महिन्याला २५ ते ३० या वयोगटातील किमान दोन तरूणांवर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली जाते. चार-पाच वर्षापुर्वीपर्यंत हे वय ४५ पर्यंत होते. आता हे सातत्याने कमी होत चालले आहे. समाजातील एकुण हृदयविकाराचे झटके येणाऱ्यांमध्ये  तरूणांची संख्याही लक्षणीय आहे. बदलती जीवनशैली त्यास कारणीभुत आहेच. मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, शरीराची फारशी हालचाल नसणे, खाण्या-पिण्याची सवयींचाही परिणाम आहे. पुर्वी धुम्रपान, मधुमेह या कारणांमुळे हृदयरोग होत होता. पण आता मानसिक ताण-तणाव प्रमुख कारण होऊ लागले आहे.

याबाबत लोकमतने काही तरुणांशी काही तरुणांशी बातचीत केली.मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या  ऐश्वर्या जोशी हिने बोलताना व्यायाम कमी होत असल्याचे सांगितले. मात्र आजचे उदाहरण बघितल्यावर काळजी घेण्याची गरज निर्माण झाल्याचे जाणवत आहे असेही ती म्हणाली. एवढंच नाही तर मी आजपासून व्यायाम करणार असल्याचा निश्चय तिने व्यक्त केला. १२वीमध्ये शिकणाऱ्या नुपूर माने हिने आम्ही दररोज इतके बिझी असतो की त्यातच व्यायाम होतो असं मला वाटायचं. पण आता तसा विचार न करता मी वेळ काढून सायकलिंग करणार आहे. अक्षय यादव या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने रोज अभ्यास करताना मी योगा आणि चालण्याचा व्यायाम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे शरीरासोबत मनालाही तजेला मिळतो असे आवर्जून नमूद केले. 

जीवनशैलीत हवा असा बदल 

वेळेत जेवण आणि नाश्ता करण्याची गरज 

चहा, कॉफी आणि शीतपेय पिणे टाळणे 

आरोग्यदायी पदार्थ सेवन करण्यास प्राधान्य 

दारू, सिगारेटसह कोणत्याही व्यसनाला नकार 

उशिरापर्यंत जागण्यापेक्षा सकाळच्या अभ्यासावर भर 

सलग अभ्यास न करता मध्ये मध्ये हवी विश्रांती 

एकाग्रतेसाठी योगासने व ध्यानधारणेची उपासना 

रोज पुरेशी झोप घेण्याची गरज  

टॅग्स :PuneपुणेHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य