शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

व्यवस्था बदलण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:23 IST

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुणे ते मुंबई लाँग मार्चला सुरुवात

पुणे : तरूणांना या देशात भवितव्य नसेल तर राष्टÑच उभे राहू शकणार नाही. या देशात तरूणांच्या भविष्यावर जुगार खेळला जातोय. व्यवस्था बदलण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.सरकारी नोकर भरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या पुणे ते मुंबई लाँगमार्च या लाँगमार्चला डेक्क न नदीपात्रातून शनिवारी सुरूवात झाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे, स्मिता पानसरे यांनी लाँगमार्चला पाठिंबा दिला. आयोजक योगेश जाधव, गिरीश फोंडे, अमोल हिपर्गे, पंकज चव्हाण, महेश बढे यावेळी उपस्थित होते.वारे म्हणाले, सरकारचे चुकलेले आर्थिक धोरण हे बेरोजगारीचे कारण आहे. त्यामुळे याविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार लढा देण्याची आवश्यकता आहे. पानसरे म्हणाल्या, जे सरकार मुलभूत हक्कांची पूर्तता करू शकत नसेल तर ते सरकार खाली खेचायला हवे. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार टाळावेत. जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची घोषणा शासनाने केली आहे, त्याची अंमलबजावणी करावी. खाजगी कंपनीला नोकर भरतीची कामे कंत्राटी पध्दतीने देऊ नये.महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा आॅफलाईन पद्धतीने एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात. नोकरी भरती घोटाळयांची न्यायालयीन चौकशी करावी खोटे खेळाडू, जात, अपंग व टाईपिंग प्रमाणपत्र देऊन शासकिय सेवेत आलेल्यांना बडतर्फ करावे, राज्य शासनामधील १ लाख ७७ हजार रिक्त जागा तसेच पोलिसांच्या ५० हजार रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र