शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

योगिता पाटील, अशोक बनसोडे, पांडुरंग पवार मानकरी; लोकमत काव्यऋतू स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 06:52 IST

प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आहे.

पुणे : प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आहे.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कोपरगाव येथील कवी अ‍ॅड. अशोक बनसोडे यांच्या ‘माती काळीच आहे अजून’ या कवितेला जाहीर झाला आहे. तृतीय क्रमांक पांडुरंगपवार यांच्या ‘एखादे राष्ट्र बेचिराख होताना’ या कवितेने पटकावलाआहे. त्याचबरोबर रोशनकुमार पिलेवान (पिंपळगाव) यांची ‘यातनांचे घोस’, डॉ. संजय कुलकर्णी (उद्गीर) यांची ‘आरक्षण’, प्रा. मीनल येवले यांची ‘बाई आणि माती’, चित्रा क्षीरसागर (ताळगाव, गोवा) यांची ‘आताशा पोरी’, उमेश घेवरीकर (शेवगाव) यांची ‘शिक्षणाची कविता’ या कवितांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.या सर्व विजेत्या प्रतिभावंत कवींच्या पाठीवर कौतुकाची व प्रोत्साहनाची थाप देण्यासाठी दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठयेथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने हा काव्यसोहळा रंगणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे व कवी अशोक नायगावकर. कवी संदीप खरे ववैभव जोशी यांची उपस्थिती असणार आहे. ‘काव्यऋतू’ या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातूनसुमारे २ हजाराहून अधिककवितांचा पाऊस या स्पर्धेसाठी पडलेला होता. गोव्यापासून, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा विविध भागांतून तळागाळातल्या खेड्यापाड्यांतून कवींनीआपल्या कविता ‘लोकमत’कडे पाठवल्या. विशेष म्हणजे या सर्व कविता आॅनलाइन मागवण्यातआल्या होत्या.मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा ‘लोकमत’ने नवोदीत कवींनाही अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठउपलब्ध करून देण्यासाठीआणि त्यांच्या काव्यप्रतिभेलामानाचा मुजरा करावा ही‘लोकमत’ या स्पर्धेमागचीभूमिका आहे.या कवितांमधून प्रतिभावंत कवींची निवड करण्यासाठी मान्यवर व अभ्यासू परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे,ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव, डॉ. नीलिमा गुंडी यांचा समावेश होता. उत्तमोत्तम अशा कवितांमधून निवड करीत त्यांनी या कवितांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उत्तेजनार्थ विजेत्यांना एक हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सुरुवातीच्या काही रांगा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.नामवंतांची रंगणार बहारदार मैफलरसिक पुणेकरांसाठी १३ नोव्हेंबरचा दिवस एक अनोखी काव्यपर्वणी घेऊन येणारा ठरणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामांकीत कवींना एका व्यासपीठावर आणून त्यांचे कविसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांच्यासह कवी संदीप खरे, वैभव जोशी, भरत दौंडकर, अंकुश आरेकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित, तुकाराम धांडे, कल्पना दुधाळ आदी गाजलेले कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत.कथा स्पर्धेचेही पारितोषिक वितरण'लोकमत'तर्फे दिवाळी उत्सव अंकासाठी जाहीर केलेल्या जिल्हास्तरीय कथा स्पर्धेत आरती श्रुंगारपुरे यांच्या 'चिऊचं घर मेणाचं' या कथेला पहिला क्रमांक मिळाला. रमेश पिंजारकर यांच्या 'दिव्यांग दर्शन' या कथेला दुसरा व सुवर्णा पवार यांच्या 'लाल रिबीन' या कथेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तेजनार्थ पुरस्कार विजय सातपुते, योगेश गोखले, शंतनू चिंचाळकर यांना प्राप्त झाला आहे. या सर्वांनाही याच समारंभात गौरवण्यात येणार आहे.‘काव्यकट्टा’ हा उपक्रम काही अपरिहार्य कारणामुळे तूर्त स्थगित केला असून नंतर स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

टॅग्स :Puneपुणे