शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

योगिता पाटील, अशोक बनसोडे, पांडुरंग पवार मानकरी; लोकमत काव्यऋतू स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 06:52 IST

प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आहे.

पुणे : प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आहे.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कोपरगाव येथील कवी अ‍ॅड. अशोक बनसोडे यांच्या ‘माती काळीच आहे अजून’ या कवितेला जाहीर झाला आहे. तृतीय क्रमांक पांडुरंगपवार यांच्या ‘एखादे राष्ट्र बेचिराख होताना’ या कवितेने पटकावलाआहे. त्याचबरोबर रोशनकुमार पिलेवान (पिंपळगाव) यांची ‘यातनांचे घोस’, डॉ. संजय कुलकर्णी (उद्गीर) यांची ‘आरक्षण’, प्रा. मीनल येवले यांची ‘बाई आणि माती’, चित्रा क्षीरसागर (ताळगाव, गोवा) यांची ‘आताशा पोरी’, उमेश घेवरीकर (शेवगाव) यांची ‘शिक्षणाची कविता’ या कवितांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.या सर्व विजेत्या प्रतिभावंत कवींच्या पाठीवर कौतुकाची व प्रोत्साहनाची थाप देण्यासाठी दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठयेथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने हा काव्यसोहळा रंगणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे व कवी अशोक नायगावकर. कवी संदीप खरे ववैभव जोशी यांची उपस्थिती असणार आहे. ‘काव्यऋतू’ या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातूनसुमारे २ हजाराहून अधिककवितांचा पाऊस या स्पर्धेसाठी पडलेला होता. गोव्यापासून, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा विविध भागांतून तळागाळातल्या खेड्यापाड्यांतून कवींनीआपल्या कविता ‘लोकमत’कडे पाठवल्या. विशेष म्हणजे या सर्व कविता आॅनलाइन मागवण्यातआल्या होत्या.मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा ‘लोकमत’ने नवोदीत कवींनाही अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठउपलब्ध करून देण्यासाठीआणि त्यांच्या काव्यप्रतिभेलामानाचा मुजरा करावा ही‘लोकमत’ या स्पर्धेमागचीभूमिका आहे.या कवितांमधून प्रतिभावंत कवींची निवड करण्यासाठी मान्यवर व अभ्यासू परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे,ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव, डॉ. नीलिमा गुंडी यांचा समावेश होता. उत्तमोत्तम अशा कवितांमधून निवड करीत त्यांनी या कवितांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उत्तेजनार्थ विजेत्यांना एक हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सुरुवातीच्या काही रांगा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.नामवंतांची रंगणार बहारदार मैफलरसिक पुणेकरांसाठी १३ नोव्हेंबरचा दिवस एक अनोखी काव्यपर्वणी घेऊन येणारा ठरणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामांकीत कवींना एका व्यासपीठावर आणून त्यांचे कविसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांच्यासह कवी संदीप खरे, वैभव जोशी, भरत दौंडकर, अंकुश आरेकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित, तुकाराम धांडे, कल्पना दुधाळ आदी गाजलेले कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत.कथा स्पर्धेचेही पारितोषिक वितरण'लोकमत'तर्फे दिवाळी उत्सव अंकासाठी जाहीर केलेल्या जिल्हास्तरीय कथा स्पर्धेत आरती श्रुंगारपुरे यांच्या 'चिऊचं घर मेणाचं' या कथेला पहिला क्रमांक मिळाला. रमेश पिंजारकर यांच्या 'दिव्यांग दर्शन' या कथेला दुसरा व सुवर्णा पवार यांच्या 'लाल रिबीन' या कथेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तेजनार्थ पुरस्कार विजय सातपुते, योगेश गोखले, शंतनू चिंचाळकर यांना प्राप्त झाला आहे. या सर्वांनाही याच समारंभात गौरवण्यात येणार आहे.‘काव्यकट्टा’ हा उपक्रम काही अपरिहार्य कारणामुळे तूर्त स्थगित केला असून नंतर स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

टॅग्स :Puneपुणे