शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

यंदा होणार पाण्याची पळवा पळवी !

By admin | Updated: April 4, 2015 23:08 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होऊ लागली आहे. आजमितीस या प्रकल्पात केवळ २५ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

डिंभे : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होऊ लागली आहे. आजमितीस या प्रकल्पात केवळ २५ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.आजच्या तारखेस प्रकल्पात ७.६ टीएमसी २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या प्रकल्पात १२ टीएमसी म्हणजेच ३९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. शिल्लक पाणीसाठ्याचा काटकसरीने व नियोजनपूर्वक वापर न झाल्यास यंदा उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करणार असून, वाढती पाण्याची मागणी व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता कुकडी प्रकल्पातील पाण्याची पळवापळवी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाण्याच्या ओढा-ताणीमुळे धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येणार आहे. धरणाच्या आतील गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. (वार्ताहर)४पिंपळगाव जोगा : कुकडी प्रकल्पात येणारे हे धरण सन २००० मध्ये पूर्ण झाले असले, तरी १९९६-९९ पासूनच घळभरणी पूर्ण करून धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात केली आहे. या धरणाची लांबी १५६० मीटर असून, या धरणास पाच वक्र दरवाजे आहेत. या धरणातून ७० किमीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ७.६८७ टीएमसी एवढी असून, आजतागायत या धरणात १६ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. ४मागील वर्षाची तुलना करता यंदाच्या उन्हाळ्यात प्रकल्पातील सर्वच धरणांतील पाणाीसाठ्यात घट झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदा या प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या धरणांतून रब्बीसाठी १ खरिपासाठी १ एक अशी दोन रोटेशन पूर्ण झाली आहेत. यामुळे आज जरी कुकडी प्रकल्पात २५ टक्के एवढा पाणीसाठा दिसत असला, तरी वाढती उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमुळे यंदा या प्रकल्पातील धरणे कोरडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिंभे धरणासह यंदा प्रकल्पातील सर्वच धरणांत जेमतेम पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या आतील आदिवासी गावांना पाण्याच्या या पळवापळवीचा फटका बसणार असून, या भागात असणाऱ्या पाणी योजना अडचणीत येणार असल्याने धरणपाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत. ४येडगाव : कुकडी प्रकल्पात येणारे येडगाव धरण हे महत्त्वाचे धरण असून, या धरणाचे बांधकाम सन १९७७ ला पूर्ण झाले. धरणाची लांबी ४३१० मीटर असून, उंची २३.६० मीटर आहे. हे धरण पिकअपविअर म्हणून बांधण्यात आले असून डिंभे,माणिकडोह,पिंपळगाव व वडज या धरणांतून या धरणात पाणी सोडण्यात येते. या धरणास २४९ किमी लांबीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता ३.३ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात २९ टक्के एवढा पाणीसाठा आहे. ४माणिकडोह : माणिकडोह या धरणात सन १९८५ पासून पाणी साठवण्यास सुरुवात केली आहे. या धरणाची लांबी ९३० मीटर असून, उंची ५१.८० मीटर आहे. या धरणास २३.५० किमीचा कालवा असून, धरणाची एकूण साठवण क्षमता १०.८८ टीएमसी एवढी आहे. सध्या या धरणात ८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. ४वडज : प्रकल्पातील हे धरण मीना नदीवर बांधण्यात आले असून, १९८३ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर एवढी आहे. धरणास १४ किमीचा मीना पूरक कालवा व ४० किमीचा मीना शाखा कालवा काढण्यात आला आहे.