शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात बरसल्या मान्सूनपूर्व सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 07:25 IST

पूर्वमोसमी पाऊस २५ टक्क्यांनी कमी : झाडे उन्मळली, वीज कोसळली, ठिकठिकाणी तारांबळ

पुणे : एकीकडे देशातील बहुतांश भाग दुष्काळाशी तोंड देत असताना, तसेच उष्णतेचा कहर झेलत असताना दुसरीकडे पूर्व मोसमी पावसात तब्बल २५ टक्के घट झाली आहे़ मात्र रविवारी राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने सलामी दिली.मान्सूनपूर्व पावसामुळे जमिनीतील ओलावा कायम राहण्यास मदत होते़ मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण काही वर्षात सातत्याने घटत असल्याचे दिसून येत आहे़ उष्णता वाढल्याने पाणी साठ्यातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे़

देशभरात १ मार्च ते ३१ मेपर्यंत एकूण सरासरी १३१़५ मिमी पाऊस पडतो़ यंदा तो ९९ मिमी पाऊस झाला आहे़ मान्सूनपूर्व पावसात तब्बल २५ टक्के घट झाली आहे़ दक्षिण भागात सर्वाधिक ४७ टक्के तुट आली असून उत्तरपश्चिम भारतात ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़ पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात १४ टक्के, मध्य भारतात १८ टक्के पाऊस कमी झाला आहे़ देशातील ३६ हवामान विभागापैकी तब्बल २३ हवामान विभागात कमी तसेच अत्यंत कमी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे़ केवळ एका विभागात सर्वाधिक जास्त तर ३ विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ९ विभागात सरासरी पाऊस झाला.याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले, राज्यात उन्हाळ्याच्या या दिवसात आकाशात कोणतेही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही़ उष्णतेमुळे अरबी समुद्राकडून बाष्प घेऊन येणारे ढग तयार झाले नाही़ त्यामुळे आकाश निरभ्र राहिल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहचून उष्णता वाढण्यास कारणीभूत ठरली़ येथील माती काळीभोर असल्याने ती या उष्णतेमुळे पूर्णपणे सुकून गेली़ अशी सुकलेली माती अधिकाधिक उष्णता शोषून घेत असल्याने उष्णतेत वाढ झाली़ ढग तयार न झाल्याने त्याचा परिणाम होऊन मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़साताऱ्यात घरांत पाणीसातारा शहर व परिसराला रविवारी सायंकाळी पावसाने झोडपले. सुमारे एक तास मुसळधार पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले. काही ठिकाणी घरात तसेच इमारतीच्या तळघरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. कोरेगाव, खटाव व फलटण तालुक्यांतही पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टाआग्नेय अरबी समुद्र, लगतच्या लक्ष्यद्वीप व पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे़ त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पुढील चार दिवस कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़झाडे उन्मळलीउस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात रविवारी दुपारी वादळी वाºयासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असून झाडेही उन्मळून पडली आहेत. भूम शहरासह परिसरात दुपारी वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली.कोल्हापुरात हुलकावणीगेले तीन दिवस भल्या पहाटे वळवाने हजेरी लावली. पण रविवारी पुन्हा हुलकावणी दिल्याने दिवसभर कोल्हापूरकरांना घामाच्या धारांमध्ये चिंब होण्याची वेळ आली. दुपारनंतर ढग दाटून आले, वाराही सुटला, पण पाऊस बरसलाच नाही. सांगली जिल्ह्यातही ढगाळ वातावरण होते.चारही हवामान विभागात कमी पाऊस१ मार्च ते ३१ मेपर्यंतचा झालेला पाऊस (मिमी)विभाग झालेला सरासरी टक्केवारीपाऊस पाऊसकोकण ०़७ ३७़२ ९८मध्य महाराष्ट्र ८़३ ३७़८ ७८मराठवाडा ६़१ ३०़३ ८०विदर्भ ६़९ ३०़९ ७८

टॅग्स :Rainपाऊस