शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जिल्हा परिषदेची यंदा स्वच्छतेची वारी

By admin | Updated: June 18, 2015 23:29 IST

सर्वांनाच आता वारीचे वेध लागले असून, पुणे जिल्हा परिषद यंदा ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या वारीत आपली

पुणे : सर्वांनाच आता वारीचे वेध लागले असून, पुणे जिल्हा परिषद यंदा ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या वारीत आपली ‘स्वच्छतेची वारी’ घेऊन जाणार आहे. यात १०० स्वयंसेवक सहभागी होणार असून, ते वारीपूर्व व वारीनंतर मुक्कामी गावात स्वच्छता करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.दर वर्षीप्रमाणे या वर्षी ८ जुलै ते २८ जुलैदरम्यान श्री संत ज्ञानेश्वरमहाराज, श्री संत तुकाराममहाराज व श्री संत सोपानदेवमहाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा आहे. यात राज्यभरातून सुमारे ७ ते ८ लाख वारकरी सहभागी होतात. जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, व दौड, बारामती व इंदापूर तालुक्यांतील ३६ गावांत या पालख्यांचा मुक्काम व विसावा होतो. मात्र, वारीच्या मुक्कामानंतर त्या गावाच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. ग्रामस्थांना या अस्वच्छतेला सामोरे जावे लागते. यासाठी यापूर्वी जिल्हा परिषद या गावांना सोयीसुविधेसाठी सुमारे ३५ लाखांचा निधी देते; मात्र यंदा जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ते आपल्या १०० स्वयंसेवकांची या वाऱ्यांमध्ये स्वच्छतेची वारी काढणार आहेत. यात जिल्हा कक्षातील १० तज्ज्ञ, तालुका स्तरावरील १२ अधिकारी, २२ स्वयंसेवक प्रतिनिधी, पालखीसमवेत राज्यातील ६ तज्ज्ञ, एनएसएसचे ५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही टीम संबंधित ग्रामस्थांसमवेत संपूर्ण गाव स्वच्छ करून घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणार आहे. त्यामुळे मुक्कामी गावे व विसावे वारीनंतर स्वच्छ व सुंदर राहून ग्रामस्थांची या त्रासातून सुटका होणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास जे कोणी इच्छुक असतील, त्यांनी जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ इवभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)सोयीसुविधांसाठी ३५ लाखया वर्षी पालखीमार्गावरील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत पालखीदरम्यान करायच्या सोयीसुविधांकरिता मुक्काम गाव रक्कम २ लाख, पालखी विसावा रक्कम ५० हजार तसेच श्री संत सोपानमहाराज पालखी मुक्कामासाठी ७५ हजार व विसाव्यासाठी २५ हजार रुपये, असे ३५ लाख रुपये इतका निधी देणार आहे.