शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना : रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:40 IST

रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते.

ठळक मुद्दे२५० रुपयांचा दंड आकारलारेल्वेच्या नियमानुसार तिकीटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक

पुणे : फलाट तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना गाड्या विलंबाने आल्याचा चांगलाच फटका बसत आहे. फलाट तिकीटाची वेळ संपल्याचे कारण देत त्यांच्याकडून २५० रुपयांचा दंड आकारला जात आहे. गाडीला विलंब होणे ही प्रवाशांची चुक नाही. तरीही दोन तासाची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेण्याचा नियम आहे. या नियमाचा भुर्दंड सध्या अनेकांना सोसावा लागत आहे.रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते. या तिकीटाची मुदत दोन तासांची असते. ही मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घ्यावे, असा नियम आहे. दररोज हजारो फलाट तिकीटांची विक्री होते. त्यातून रेल्वेला मोठा महसुल मिळतो. पण, फलाट तिकीट काढणाºया अनेकांना वेगळ््याच समस्येचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी एका तरूणालाही याचा फटका बसला. तो फलाट तिकीट काढून महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट पाहत थांबला होता. पण गाडी विलंबाने आली. त्यातच तिकीटाची वेळ निघून गेल्याने तिकीट तपासणीसाने त्याला पकडले. त्याच्याकडून त्यावेळी फलाटावर उभ्या असलेल्या लोणावळा लोकलचे कमीत कमी भाडे २० रुपये व दंडाची २५० असा एकुण २७० रुपये दंड घेतला. याबाबत त्याने टिष्ट्वटरद्वारे रेल्वे मंत्रालय पुणे विभागाकडे ह्यगाडी विलंबाने आली, याचा माझा दोष कसाह्ण नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी तिकीटाची मुदत संपल्याने नियमानुसार नवीन तिकीट घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गाडी विलंबाने आल्याचा फटका प्रवाशांना सोसावा लागत असला तरी रेल्वेकडून नियमावर बोट ठेवले जात आहे.----------रेल्वेच्या नियमानुसार तिकीटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक आहे. तसेच न केल्यास त्यावेळी संबंधित फलाटावर उभ्या असलेल्या गाडीचे कमीत कमी तिकीट व २५० रुपये दंड अशा एकुण रकमेची दंडात्मक कारवाई केली जाते. संबंधित तिकीट धारक नेमक्या कोणत्या गाडीसाठी आला आहे, हे ओळखणे शक्य नाही. त्यामुळे एखादी गाडी विलंबाने आली तरी संबंधितांना नवीन तिकीट घेणे गरजेचे आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारीपुणे विभाग, मध्य रेल्वे----------

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpune railway stationपुणे रेल्वे स्थानक