शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना : रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:40 IST

रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते.

ठळक मुद्दे२५० रुपयांचा दंड आकारलारेल्वेच्या नियमानुसार तिकीटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक

पुणे : फलाट तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना गाड्या विलंबाने आल्याचा चांगलाच फटका बसत आहे. फलाट तिकीटाची वेळ संपल्याचे कारण देत त्यांच्याकडून २५० रुपयांचा दंड आकारला जात आहे. गाडीला विलंब होणे ही प्रवाशांची चुक नाही. तरीही दोन तासाची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेण्याचा नियम आहे. या नियमाचा भुर्दंड सध्या अनेकांना सोसावा लागत आहे.रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते. या तिकीटाची मुदत दोन तासांची असते. ही मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घ्यावे, असा नियम आहे. दररोज हजारो फलाट तिकीटांची विक्री होते. त्यातून रेल्वेला मोठा महसुल मिळतो. पण, फलाट तिकीट काढणाºया अनेकांना वेगळ््याच समस्येचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी एका तरूणालाही याचा फटका बसला. तो फलाट तिकीट काढून महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट पाहत थांबला होता. पण गाडी विलंबाने आली. त्यातच तिकीटाची वेळ निघून गेल्याने तिकीट तपासणीसाने त्याला पकडले. त्याच्याकडून त्यावेळी फलाटावर उभ्या असलेल्या लोणावळा लोकलचे कमीत कमी भाडे २० रुपये व दंडाची २५० असा एकुण २७० रुपये दंड घेतला. याबाबत त्याने टिष्ट्वटरद्वारे रेल्वे मंत्रालय पुणे विभागाकडे ह्यगाडी विलंबाने आली, याचा माझा दोष कसाह्ण नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी तिकीटाची मुदत संपल्याने नियमानुसार नवीन तिकीट घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गाडी विलंबाने आल्याचा फटका प्रवाशांना सोसावा लागत असला तरी रेल्वेकडून नियमावर बोट ठेवले जात आहे.----------रेल्वेच्या नियमानुसार तिकीटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक आहे. तसेच न केल्यास त्यावेळी संबंधित फलाटावर उभ्या असलेल्या गाडीचे कमीत कमी तिकीट व २५० रुपये दंड अशा एकुण रकमेची दंडात्मक कारवाई केली जाते. संबंधित तिकीट धारक नेमक्या कोणत्या गाडीसाठी आला आहे, हे ओळखणे शक्य नाही. त्यामुळे एखादी गाडी विलंबाने आली तरी संबंधितांना नवीन तिकीट घेणे गरजेचे आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारीपुणे विभाग, मध्य रेल्वे----------

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpune railway stationपुणे रेल्वे स्थानक