शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

सखींनो, 'त्या' पाच दिवसांबद्दल बिनधास्त लिहा! 'समाजबंध' चा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:19 IST

मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही...

ठळक मुद्देमासिक पाळीच्या अनुभव लेखन स्पर्धेतून साकारणार ई-बुकपरिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणारअनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती

पुणे : आपल्यासारखाच एक जीव निर्माण करण्याची निसर्गदत्त देणगी असलेली 'मासिक पाळी' कधीकधी नकोशी वाटते. प्रसंगी अडचणींवर मात केली तरी अडथळ्यांच्या शर्यतीत 'पाळी' मात्र कायम लक्षात राहते. ही नैसर्गिक प्रक्रिया आपल्याला नकोशी वाटू लागते. असा एकतरी अनुभव प्रत्येकीला कधी ना कधी आलेला असतो. मात्र, 'लोक काय म्हणतील' या भीतीने आपण त्याबद्दल कधीच बोलत नाही. मात्र, हे अनुभव शब्दबद्ध व्हावेत यासाठी 'समाजबंध' संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यांचे ई-बुक प्रसिद्ध केले जाणार आहे.मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही. परंपरागत चालत आलेल्या अनेक गैरसमजांमुळे मुलगी वयात येण्याच्या आधीपासूनच तिच्या मनात मासिक पाळीची भीती बसते. मुलींना, महिलांना या काळात शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागतात.समाजबंध संस्थेच्या माध्यमातून सचिन आशा सुभाष यांनी 'प पाळीचा' या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करण्याचा वसा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मासिक पाळी या विषयावर अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनुभवांवर आधारित एक अहवालही तयार केला जाणार असून, परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणार आहेत.सचिन आशा सुभाष यांनी 'लोकमत'ला सांगितले, 'कधी सोबत पॅड नसताना पाळी येते, कधी अनपेक्षितपणे प्रवासात पाळी येते, ऐन परीक्षांमध्ये, ऑफिसमध्ये असताना तर कधी घरी काही 'कार्य' असताना पाळी येते. आणि मग सुरू होते महिलांच्या जीवाची घालमेल, 'अच्छे दाग' लपवण्याची धडपड, आराम मिळवण्याची, बाथरूम शोधण्याची धावपळ आणि पॅड मिळवण्यासाठी आणि बदलण्यासाठीची कसरत. कधी जवळ पॅडच नसते, कधी पॅड बदलायला जागा नसते, कधी नाईलाजाने अतिगलिच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो तर कधी घरातील कार्यात 'विघ्न' नको म्हणून आपल्यालाच दूर केलं जातं किंवा पाळीच दूर लोटली जाते. असे अनेक अनुभव अनेकांच्या गाठीशी असतात. याच अनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.'अनुभव लिहिण्यासाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही. आपल्या सोयीनुसार कोणत्याही भाषेत लिहिता येणार आहे. आपला अनुभव टाईप करून samajbandhindia@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा  7709488286 यावर व्हॉटसअपद्वारे ३१ मे पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला