शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सखींनो, 'त्या' पाच दिवसांबद्दल बिनधास्त लिहा! 'समाजबंध' चा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:19 IST

मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही...

ठळक मुद्देमासिक पाळीच्या अनुभव लेखन स्पर्धेतून साकारणार ई-बुकपरिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणारअनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती

पुणे : आपल्यासारखाच एक जीव निर्माण करण्याची निसर्गदत्त देणगी असलेली 'मासिक पाळी' कधीकधी नकोशी वाटते. प्रसंगी अडचणींवर मात केली तरी अडथळ्यांच्या शर्यतीत 'पाळी' मात्र कायम लक्षात राहते. ही नैसर्गिक प्रक्रिया आपल्याला नकोशी वाटू लागते. असा एकतरी अनुभव प्रत्येकीला कधी ना कधी आलेला असतो. मात्र, 'लोक काय म्हणतील' या भीतीने आपण त्याबद्दल कधीच बोलत नाही. मात्र, हे अनुभव शब्दबद्ध व्हावेत यासाठी 'समाजबंध' संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यांचे ई-बुक प्रसिद्ध केले जाणार आहे.मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही. परंपरागत चालत आलेल्या अनेक गैरसमजांमुळे मुलगी वयात येण्याच्या आधीपासूनच तिच्या मनात मासिक पाळीची भीती बसते. मुलींना, महिलांना या काळात शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागतात.समाजबंध संस्थेच्या माध्यमातून सचिन आशा सुभाष यांनी 'प पाळीचा' या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करण्याचा वसा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मासिक पाळी या विषयावर अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनुभवांवर आधारित एक अहवालही तयार केला जाणार असून, परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणार आहेत.सचिन आशा सुभाष यांनी 'लोकमत'ला सांगितले, 'कधी सोबत पॅड नसताना पाळी येते, कधी अनपेक्षितपणे प्रवासात पाळी येते, ऐन परीक्षांमध्ये, ऑफिसमध्ये असताना तर कधी घरी काही 'कार्य' असताना पाळी येते. आणि मग सुरू होते महिलांच्या जीवाची घालमेल, 'अच्छे दाग' लपवण्याची धडपड, आराम मिळवण्याची, बाथरूम शोधण्याची धावपळ आणि पॅड मिळवण्यासाठी आणि बदलण्यासाठीची कसरत. कधी जवळ पॅडच नसते, कधी पॅड बदलायला जागा नसते, कधी नाईलाजाने अतिगलिच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो तर कधी घरातील कार्यात 'विघ्न' नको म्हणून आपल्यालाच दूर केलं जातं किंवा पाळीच दूर लोटली जाते. असे अनेक अनुभव अनेकांच्या गाठीशी असतात. याच अनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.'अनुभव लिहिण्यासाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही. आपल्या सोयीनुसार कोणत्याही भाषेत लिहिता येणार आहे. आपला अनुभव टाईप करून samajbandhindia@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा  7709488286 यावर व्हॉटसअपद्वारे ३१ मे पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला