शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जागतिक ज्येष्ठदिन : कोणी तरी बोला रे आमच्याशी थोडं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 06:44 IST

वृद्धांची आर्त हाक; कुटुंबातील संवाद हरवतोय

पुणे : नटसम्राट सिनेमातील नाना पाटेकर यांचा कोणी घर देत का घर, हा डायलॉग घरातील वृद्धांची स्थिती दाखवत असल्याचे अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे. मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर सिनेमात नाना पाटेकर यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ आली. मात्र प्रत्यक्ष समाजात काहींनी आई-वडिलांना घराबाहेर काढले नसले तरी त्यांच्याबरोबर कोणी संवादच साधत नसल्याने आमच्याबरोबर कोणी बोलता का रे थोडं, अशी विनवणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आज जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या भावना समजावण्याचा हा प्रयत्न आहे.

ज्येष्ठ माणसे घरात नकोच, अशी मानसिकता शहरातील नोकरदारांमध्ये वाढली आहे. त्यामुळे वृद्धांना विविध प्रकारे त्रास देऊन गावाकडे जाण्याचा इशारा मुलगा किंवा सुनेकडून दिला जातो. त्यातून वाद झाल्यास कित्येक महिने वृद्धांबरोबर संवादच साधला जात नाही. तर काही परिस्थितींमध्ये घरातील सर्व व्यक्ती नोकरीला असतात. त्यामुळे त्याचा सकाळचा वेळ घरातील काम आवरण्यात, दिवसभर आॅफिसला आणि रात्री घरी आल्यानंतर टीव्ही पाहण्यातच जातो. तर घरातील लहान मुले गेम खेळण्यात किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा मारण्यात दंग असतात. त्यामुळे वृद्धांबरोबर बोलण्यासाठी कोणीच नसते. त्यात जर घरात एकच वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना दिवस कसा घालवायचा, अशा प्रश्न रोजच पडतो. वृद्धांचे हे प्रश्न मिटविण्यासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून प्रत्येक जिल्ह्यात ‘वी आर नॉट अलोन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे ज्येष्ठ नागरिक संघटनांना एकत्र करून त्याद्वारे वृद्धांचे प्रश्न मिटविण्यात येणार आहे. समस्यांच्या गर्तेत सापडलेल्यांना प्राधिकरणाकडून समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी येणारे नागरिकदेखील काही उपाययोजना सुचवत असून त्या अवलंबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक सचिन राऊत यांनी दिली.

आमच्याबरोबर बोलण्यासाठी कोणीच नाही. आम्ही तुम्हाला घरचा पत्ता देतो. कोणाला तरी आमच्याबरोबर बोलण्यासाठी पाठवता का, अशी विनवणी करणारे फोन येत आहेत. त्यानुसार आम्ही त्वरित एखादा स्वयंसेवक त्यांच्या घरी पाठवतो. त्यामुळे त्यांनादेखील बरे वाटते. संबंधित स्वयंसेवक त्यांचे समुपदेशनदेखील करीत असतात. ज्येष्ठांकडे खूप अनुभव असतो, असे राऊत यांनी सांगितले.आरोग्याची समस्या गंभीरवयाबरोबर आजारही वाढत असतात. त्यामुळे समुपदेशनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याची समस्या गंभीर असल्याचे जाणवते. त्यातील काहींकडे तर दैनंदिन गोळ्या-औषधांसाठीदेखील पैसे नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आरोग्याच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात काम होण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.ज्येष्ठांच्या धोरणात बदल सुचवणारज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने धोरण तयार केले आहे. मात्र त्यात काही त्रुटी आहेत. त्यामुळे त्यात काही बदल करण्यासाठी ज्येष्ठांविषयी काम करणाºया काही तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येऊन काम करीत आहेत. ज्येष्ठांना अपेक्षित असलेल्या बदलांचा आराखडा लवकरच केला जाईल.

टॅग्स :Puneपुणे