शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

जागतिक रंगभूमी दिन - राजकीय सटायरने स्टॅँडअप कॉमेडीला धूम..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:01 IST

' विनोद’ करणं आणि तो प्रेक्षकांपर्यंत त्याचं पद्धतीनं पोहोचविणं हे तसं कलाकारासाठी अत्यंत कठीण काम असतं आणि त्यातून तो राजकीय घडामोडींशी निगडित ' विनोद’ असेल तर मग संपलच!

ठळक मुद्देनेटिझन्सने युवा पिढीच्या  ‘स्टँड अप’ कॉमेडीला धरले उचलून

- नम्रता फडणीस- ' विनोद’ करणं आणि तो प्रेक्षकांपर्यंत त्याचं पद्धतीनं पोहोचविणं हे तसं कलाकारासाठी अत्यंत कठीण काम असतं आणि त्यातून तो राजकीय घडामोडींशी निगडित ' विनोद’ असेल तर मग संपलच! जिथं विरोधात बोललं तर अंगावर  धावून येणा-यांची संख्या अधिक आहे. त्या सध्याच्या जमान्यात एखाद्या राजकीय विषयावर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा राहुल गांधी यांच्या एखाद्या वक्तव्यावर केलेला विनोद असो, तो कशा पद्धतीने सोशल मीडियावर घेतला जातो आणि समर्थकांकडून कशा पद्धतीनं ट्रोलिंग सुरू होतं, हे वेगळ सांगायला नको. एकीकडे ही परिस्थिती असताना युवा पिढी मात्र राजकीय विषयांवरचा स्वत:चा ’हटके’ दृष्टीकोन विकसित करीत  बिनधास्तपणे कमेंट,जोक्स द्वारे’स्टँंड अप’ कॉमेडीमधून सोशल मीडियावर अथवा प्रत्यक्ष कार्यक्रमांमधून व्यक्त होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, युवा पिढीच्या  ‘स्टँंड अप’ कॉमेडीला सोशल मीडियावर नेटिझन्सचा उदंड प्रतिसाद मिळत असून, या कार्यक्रमांवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.  प्रादेशिक मराठी रंगभूमीवर  ‘स्टँंड अप’ कॉमेडीचा श्रीगणेशा कुणी केला असेल तर तो महाराष्ट्राचं लाडक व्यक्तिमत्व असलेल्या  ‘पु.लं देशपांडे यांनी. एकपात्री कार्यक्रमांद्वारे हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमातून विषय, परिस्थिती किंवा ’व्यक्ती आणि वल्लीं’वर भाष्य करण्याचा ट्रेंड त्यांनी रंगभूमीवर रूजविला. आचार्य अत्रे यांनीही स्वत:चा श्रोतृवर्ग घडविला. त्यानंतर लक्ष्मण देशपांडे यांनी  ‘व-हाड निघालय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामधून पुलंचा वारसा पुढे नेला...त्यानंतर अनेक एकपात्री कलाकारांची फळी तयार झाली .यात आता युवा पिढीही मागे राहिलेली नाही. ’कुणाल कामरा’ ने सोशल मीडियावर प्रथम स्टँड अप कॉमेडीचा प्रयोग केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत इतर युवा कलाकार ‘लाईव्ह’ कार्यक्रमांबरोबरच सोशल मीडियाचाही  ‘स्टँड अप’ कॉमेडीसाठी पुरेपूर वापर करत आहेत.. अगदी राजकारणापासून, फुड, ट्रँव्हल, आदी विविध विषयांना त्यांनी विनोदाच्या चौकटीत गुंफले आहे. तरूणी देखील बिनधास्तपणे ब्युटी पार्लरपासून ते लग्न न जमणा-या मुलींच्या व्यथेपर्यत सामाजिक चिमटे काढताना दिसत आहेत. युवा पिढीच्या ‘स्टँंड अप’ कॉमेडी ने सोशल मीडियावर धूम केली असून,  कोणताही विरोध न करता नेटिझन्सने युवा पिढीच्या  ‘स्टँड अप’ कॉमेडीला उचलून धरले आहे. ही ‘व्हर्च्युअल’ रंगभूमीही कलाकारांसाठी वरदान ठरली आहे. ...........

’स्टँड अप’ कॉमेडीमध्ये राजकीय विषयावर भाष्य करताना कोणत्या विशिष्ट्य एका पक्षाचे आहोत वगैरे याचा कधीच विचार केला जात नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा दृष्टेकोनही राजकीय नसतो. फेसबुक किंवा ट्ट्विटरवर एखाद्या नेत्याशी किंवा विशिष्ट्य विषयाशी संबंधित कमेंट, जोक्स याचा अभ्यास करून सादरीकरण काय करायचे हे मनाशी निश्चित केले जाते. त्यावर लोकांचं काय म्हणण आहे त्याचाही समावेश केला जातो. कोणत्याही पक्षाच्या विचारधारेला नाव ठेवली जात नाहीत, हे एक तत्व यात पाळले जाते. लोकांना केवळ हलक्या फुलक्या विनोदातून निखळ आनंद देणे हाच उददेश असतो- आदित्य महाजन, युवा कलाकार

...............................

बारा वर्षे नाटक करीत आहे. नाटकाची तिकिट विकण किती अवघड आहे, हे चांगलचं अवगत आहे. लोकांना सध्या  ‘विनोदा’ची खूप गरज आहे. सोशल मीडियावर सगळेच उद्रेक करीत असतात. त्यामुळे कुठतरी विनोद महत्वाचा ठरतो. त्यामुळे सोशल मीडियावर  ‘‘स्टँंड अप’ कॉमेडी करणा-या कलाकाराला आणि कार्यक्रमालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र हा नवीन नाही. पु.लं देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी तो रूजविला. मात्र मध्यंतरीच्या काळात तो मिमिक्रीकडे झुकला. आता पुन्हा तो राजकीय भाष्याकडे वळला आहे. आजूबाजूला काय घडत आहे त्याची निरीक्षण ठेवावी लागतात. बातम्या पाहाव्या लागतात. ही कॉमेडी क्षणिक असते. ब-याचवेळा राजकीय मतांवर टीका केली जाते. मात्र तरीही ती टीका न वाटता सटायर वाटला पाहिजे.  ‘स्टँड अप’ मध्ये थेट प्रेक्षकांशी संवाद असतो- सारंग साठे, युवा कलाकार

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकPoliticsराजकारण