शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांमधील जगणंच धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:34 IST

लोकमत पाहणी : दाटीवाटीमुळे आगीच्या घटना

पुणे : मिळेल तेथे, वाटेल तशी बांधलेली घरे.... कच्चा बांधकामांवर चढवलेले मजलेच मजले... बेकायदेशीरपणे विजेच्या खाबांवर टाकलेले आकडे.... गॅस रीफीलिंग, बेकरीसारखे अनेक धोकादायक धंदे.... एका माणसाला पायी जाणेदेखील कठीण होईल या पद्धतीने सोडलेली दोन झोपट्यांमधील जागा.... चिंचोळे रस्ते.. ड्रेनेजलाईन, चेंबरवरच उभारलेली घरे... यामुळे अनेक ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाशदेखील येऊ शकत नाही... या परिस्थितीमुळे एखाद्या आजारी व्यक्तींला तातडीची मदत लागली तरी मिळणे कठीण... आशा ठिकाणी आग किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर अग्निशामक बंब, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचणेदेखील कठीण... अशा भयानक स्थितीत शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ४२ टक्के म्हणजे १४ लाखांपेक्षा अधिक लोक दररोजचे आपले मरण डोळ्यांसमोर ठेवून जीवन जगत असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आले.

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीला बुधवारी आग लागली आणि तब्बल शंभराहून अधिक झोपड्या खाक झाल्या. झोपडपट्टीला आग लागल्यानंतर काही वेळातच ३० हून अधिक अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले; परंतु आग विझविण्यासाठी आत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना प्रचंड कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख लोहियानगर वसाहत, मीनाताई ठाकरे वसाहत, रामनगर वसाहत व जनता वसाहत येथे जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. यामध्ये वरील वास्तव समोर आले.झोपडपट्टी दादांमुळे अतिक्रमण वाढतेसध्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. याला सर्वांधिक जबाबदार झोपडपट्टी दादा असून, आपली लीडरशिप वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण वाढविण्यास ते प्रोत्सहान देतात. यामुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येतो. झोपडपट्ट्यांकडे व्हॉट बँक म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोन बदलल्यास नक्कीत बदल होईल. - डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौरलोहियानगर वसाहत : लोहियानगर वसाहतीत प्रचंड दाट लोकवस्ती असून, गल्यांमधील रस्ते एकदम चिंचोळे आहेत. लोहियानगर भागात कच्च्या बांधकामावर तीन-चार मजले उभारले आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने घरांच्या पत्र्याला लागल्या आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा प्रचंड धोका असल्याचे निदर्शनास आले.मीनाताई ठाकरे वसाहतया वसाहतीत एकूण १७ मुख्य गल्ल्या आहेत. या सर्व गल्ल्यांना जोडणारा एक समांतर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर अग्निशामक दलाची गाडी येऊ शकते. परंतु, अंतर्गत रस्ते खूपच अरुंद आहेत. काही गल्ल्यांतून दुचाकीही जाऊ शकत नाही इतक्या अरुंद आहेत, तर काही वसाहतींमध्ये लघुउद्योग तसेच विविध प्रकारची दुकाने आहेत. हे लघुउद्योग अत्यंत असुरक्षितरीत्या चालवले जात असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुमजली, तीन मजली घरे आहेत. दुर्घटनेच्या वेळी या घरांतून ताबडतोब बाहेर पडणे अशक्य आहे. येथील लोक खूप दाटीवाटीने राहत असल्याचे दिसून आले, तसेच नागरी सुविधांचा अभाव दिसून आला.जनता वसाहत : प्रचंड दाट लोकवस्ती, गल्ल्यांमधून एकदम चिंचोळे रस्ते, डोंगराच्या पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर खालच्या घरांमध्ये पाणी जाते, वरील सर्व कचरा पावसाने खाली येऊन मोठ्या प्रमाणात घाण साठते, वसाहतीत एकूण १०८ गल्ल्या असून, अग्निशामक दलाची गाडी ७०व्या गल्लीपर्यंतेच जाते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास आपत्तकालीन यंत्रणाच पोहोचणे कठीण आहे.