शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जागतिक मातृदिन विशेष : मी 'बाई' नसले म्हणून काय झालं, 'आई' तर आहे ना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 21:09 IST

 'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं  आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून घेतलं आणि आयुष्य सफल झालं' हे शब्द आहेत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बी पन्ना गाबरेल यांचे. 

नेहा सराफ 

पुणे : 'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं  आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून घेतलं आणि आयुष्य सफल झालं' हे शब्द आहेत तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बी पन्ना गाबरेल यांचे. फक्त पन्ना नाही तर पुण्यातील अनेक तृतीयपंथी मुल दत्तक घेऊन मातृत्व अनुभवत आहेत. वस्तू घरात नेणं सोपं असतं पण चालतंबोलतं मुल म्हटलं की त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या येतात. त्यामुळे आपल्या आयुष्याची आणि समाजच्या फटकून वागण्याची झळ मुलांना बसू नये म्हणून ते विशेष प्रयत्न करतात. 

याबाबत पन्ना सांगतात, 'आज मुलगी महाराष्ट्राबाहेर महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिथे मी तिला तीन महिन्यातून भेटायला जाते.ती कधीही पुण्यातील बुधवार पेठेत आलेली नाही. आपली आई तृतीयपंथी असल्याचे तिला माहिती आहे. मात्र तिने त्याविषयी कधीही उच्चार न केलेला नाही. शेवटी तिच्यासमोर माझे अस्तित्व आई म्हणून आहे हे महत्वाचे. पूर्वी तृतीयपंथीयांना मुल दत्तक दिले जात नव्हते. आता गौरी सावंत यांच्यापासून त्यालाही सुरुवात झाली आहे. मात्र आम्ही घेतलेली मुले ही अनेकदा आजूबाजूच्या वस्तीत जन्मलेली आहेत. त्यांची आई पालनपोषण न करू शकणारी तर वडील अस्तित्व नाकारणारे होते. त्यामुळे त्यांना कुठेतरी टाकून त्यांचे आयुष्य बरबाद होण्यापेक्षा अनेक हिजड्यांनी त्यांना दत्तक घेतले आहे. आमच्यापैकी काहींनी तर त्यासाठी बुधवार पेठेतून बाहेर पडून शहराच्या उपनगरात घरे घेतली आहे. या मुलांचे संगोपन सर्वसामान्य वातावरणात व्हावे असे आम्हाला वाटते. 

  अशोक (नाव बदललेले) यांनीही मुलगा दत्तक घेतला असून तो आता आठवीत शिकतो. ते सांगतात, 'माझा मुलगा आठवीत आहे पण मला अजूनही त्याला मी तृतीयपंथी असल्याचे सांगितलेले नाही. आजही तो मला मामा म्हणूनच हाक मारतो.मात्र आता हा मुलगाच माझं आयुष्य आहे. उद्या मी हे बाळ घेतलं नसतं तर कदाचित ते पाकीटमार किंवा दलालही बनले असते. एक नवं जग त्याला माहिती व्हावं म्हणून मी हे छोटंसं पाऊल उचललं'. 

या मुलांना प्रत्यक्ष तुझी आई किंवा वडील हे तृतीयपंथी आहेत हे सांगायची वेळ येते तेव्हा मात्र अनेकांनी स्पष्ट सांगितलं. पन्ना म्हणतात, 'बाहेरून समजण्यापेक्षा आपण सांगितलेलं अधिक चांगलं. कारण कधीतरी हे सत्य समजणार आहेच. हा विचार करून मुलगी बारा वर्षाची झाल्यावर मी तिला सत्य सांगितलं आणि तिने ते स्वीकारलंही. अशोक यांचे मात्र याबाबत वेगळे मत असून योग्य वेळ आल्यावर आणि मूल पुरेसे मोठे झाल्यावर समुपदेशन करून त्याला कल्पना द्यावी. पन्ना आणि अशोक यांनी मुलाला आपलेच नाव लावले आहे. मात्र अनेक तृतीयपंथी आजही त्याला स्वतःऐवजी आपल्या वडिलांचे नाव देतात.शेवटी  नावापेक्षाही नातं महत्वाचं आहे. जगाने अनेकदा द्वेष आणि अपमान दिल्यावरही आई होऊन एका कोवळ्या जीवाचं आयुष्य फुलवणाऱ्या या खरं स्त्रीत्व जपणाऱ्या तृतीयपंथीयांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेTransgenderट्रान्सजेंडरbudhwar pethबुधवार पेठ