शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोटार चालविताना संयम संपतो! पुण्यात मोटारीपेक्षा सायकलच भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:50 IST

खर्च वाचेल आणि फक्त पाच-सहा मिनिटेच जास्त लागतील...

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने पुण्यात मोटारींची संख्या वाढत आहे. एखाद्या ठिकाणी तातडीने पोहोचायचे असल्यास किंवा कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी मोटारीचा वापर होतो. पण, पुण्यातील गर्दी लक्षात घेता मोटारीपेक्षा सायकलच भारी ठरत आहे. अगदी सहा किलोमीटर अंतर जायचे असले तरी मोटारीपेक्षा सायकलला केवळ पाच ते सहा मिनिटे जास्त वेळ लागतो. पण, या बदल्यात खर्च कमी होतोच आणि आरोग्यासाठीही फायदा होतो.

परिसर आणि एसपीटीएम या दोन संस्थांनी ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने केलेल्या प्रयोगात ही बाब समोर आली आहे. तीन दिवस गर्दीच्या वेळी, शहरातल्या १०० किलोमीटर रस्त्यांवर सायकल आणि गाडीचा वापर करून एकाच अंतराला चारचाकी गाडीच्या तुलनेत सायकलीला किती वेळ लागतो याची नोंद केली. यातून दिसून आले की एक किलोमीटर अंतराला सायकलीला फक्त ४५ सेकंद ते १ मिनिट जास्त वेळ लागतो. तुमचे अंतर ६ किलोमीटरचे असेल, तर कार वापरल्याने ५-६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचत नाही. त्याच वेळी सायकलीमुळे वायुप्रदूषण होत नाही आणि सायकलीला रस्त्यावर जागादेखील कमी लागते. खूप ट्रॅफिक होते तेव्हा सायकलीचा वेग कारपेक्षा जास्त होता.

पुण्यात मोटार चालविताना संयम संपतो!

अश्विनी सोवनी ह्या कामावर जाण्यासाठी सायकल वापरतात. त्या म्हणतात, “पुण्यासारख्या शहरात सायकल हे अगदी योग्य वाहन आहे. विशेष करून ६ ते ८ किलोमीटरच्या छोट्या अंतरासाठी सायकल शहरातल्या हवेच्या प्रदूषणात भर घालत नाही. सायकल चालविणाऱ्या व्यक्तीला आरोग्याचा फायदाही होतो. मिहीर देव यांनी चारचाकी चालक म्हणून भाग घेतला होता. ते म्हणाले, गाडी चालवताना रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीमुळे आपला संयम संपतो. त्यामुळे मी आनंदाने सायकल चालवतो. परदेशात सायकल चालवणाऱ्यांना मान मिळतो, त्यांचं कौतुक असतं. त्यामुळे तिथे सायकल चालवणं सुरक्षित तर आहेच; पण आनंददायीदेखील आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड