शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांस्कृतिक दहशतवाद पसरविण्याचे छुपे काम सुरू : रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:50 IST

संत तुकाराम नगर भागातील संस्था व संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते

ठळक मुद्देसध्याचे मोदी सरकार छत्रपतींचे नाव घेऊन संस्कृतीचे दमन करत आहे.

पिंपरी : दलितांबद्दल प्रेम व आपुलकी असल्याचा दिखावा करणारे हे भाजप सरकार वास्तविकरित्या सांस्कृतिक दहशतवाद पसरविण्याचे छुपे काम करीत असल्याची टीका ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी आज येथे केली. संत तुकाराम नगर भागातील संस्था व संघटनांनी आयोजित व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रामध्ये ते बोलत होते.यावेळी माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे डॉ. अशोक शिलवंत, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, बाळासाहेब ओव्हाळ, तसेच प्रभाकर ओव्हाळ, शरद जाधव, आर. डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कसबे म्हणाले, छत्रपतींची खरी उपेक्षा स्वकीयांनीच केली. मात्र, अठरापगड जातींच्या मावळयांच्या ताकदीवर त्यांनी राज्यकारभार करून कल्याणकारी राजा अशी प्रतिमा जगासमोर निर्माण केली. सध्याचे मोदी सरकार छत्रपतींचे नाव घेऊन संस्कृतीचे दमन करत आहेत.  व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले, खोटया इतिहासाच्या बनावावर समाजात धार्मिक दुही पसरविण्याचे काम भाजप सरकार करत आहेत. नव्या पिढीतील विदयार्थ्यांना खोट्या इतिहासाची मांडणी असणारे साहित्य व पुस्तके प्रवाहात आणण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रास्ताविक  लक्ष्मण रानवडे यांनी केले. तर डॉ. अशोक शिलवंत यांनी स्वागत केले. विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले  आणि  प्रकाश जाधव यांनी आभार मानले.

 

  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा