शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

परिहार चौकातील फुटपाथचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST

ज्या भाजी विक्रेत्यांचे स्टॉल त्याठिकाणी आहेत ते सर्व स्थानिक व गरजू आहेत. मग अशा वेळी त्या ठिकाणी डांबरीकरण आणि ...

ज्या भाजी विक्रेत्यांचे स्टॉल त्याठिकाणी आहेत ते सर्व स्थानिक व गरजू आहेत. मग अशा वेळी त्या ठिकाणी डांबरीकरण आणि सुशोभीकरण करणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा रस्ता होणे आवश्यक होते. पण आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही अजूनही काम सुरू झालेले नाही.

महापालिका यात कधी लक्ष घालणार आहे? असा सवाल तेथील भाजी विक्रेत्यांनी केला आहे. फुटपाथचे कामच होत नसल्याने आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात तर याठिकाणी उग्र वास येतो. अनेक ज्येष्ठ नागरिक इथे चालताना पडलेले आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली असून आता प्रशासन कुठल्या अपघाताची वाट पाहत आहे, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला.

या फुटपाथलगत साधारणतः ४० भाजी विक्रेत्यांचे स्टॉल आहेत. विकासकामांची अडचण असल्याने ग्राहक येत नाही. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आपले स्टॉल बंद केलेले आहे. अस्वच्छतेमुळे ग्राहक येत नसल्याने आता धंदा कसा करायचा असा पेच विक्रेत्यांना पडलाय.

कोट

२५ वर्षांपासून आम्ही येथे व्यवसाय करतोय. स्मार्ट सिटीच्या नकाशात या जागेचा समावेश आहे. आता पाच वर्षे झालीत अजूनही याठिकाणी काम झालेले नाही.

-सचिन डिंबर, भाजीविक्रेता, परिहार

आधीच कोरोनाकाळात आमचे लघू उद्योगांवर शेवटची कुऱ्हाड पडली आहे. अशातच चौकात सुविधा नसल्याने ग्राहक येत नाहीत. आमचा संसार उघड्यावर आला आहे. महापालिकेने यात लक्ष घालून आमचा प्रश्न सोडवावा.

प्रताप डिंबर, फळविक्रेता, परिहार

चौकट

भाजी विक्रेत्यांनी वेळोवेळी विविध नेतेमंडळी आणि महापालिका प्रशासनाकडे चकरा मारल्या; परंतु अजूनही तिढा सुटलेला नाही. आमचा प्रश्न फक्त राजकीय उदासीनतेमुळे मार्गी लागत नसल्याची भावना भाजी विक्रेत्यांची आहे.