शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

आळंदीतील इंद्रायणी नदीवरील पाचवा लक्षवेधी पूल रहदारीच्या प्रतीक्षेत, बाह्यवळण जोडमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:41 IST

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत श्रीक्षेत्र आळंदीत होत असलेल्या विविध रस्तेविकास कामांसह इतर कामांना प्रचंड विलंब झाल्याने येथील बाह्यवळण मार्गालादेखील विलंबाचे ग्रहण लागले आहे.

आळंदी : राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत श्रीक्षेत्र आळंदीत होत असलेल्या विविध रस्तेविकास कामांसह इतर कामांना प्रचंड विलंब झाल्याने येथील बाह्यवळण मार्गालादेखील विलंबाचे ग्रहण लागले आहे. बाह्यवळण मार्गासह जोडरस्त्यांचे भूसंपादन रखडल्याने उर्वरित रस्तेविकास कामासाठी शासनाला पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ येणार असल्याची आळंदीत चर्चा होत आहे. यामुळे विलंबाला जबाबदार घटकांवर कारवाईचे संकेत प्रशासनाचे उच्चस्तरीय यंत्रणेने दिले आहे.आळंदीतील वाहतूककोंडी रोखण्यासाठी इंद्रायणी नदीवर साधकाश्रम आणि सिद्धबेट जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याने हा पूल वाहतूककोंडी फोडण्यास सज्ज असताना जोडरस्त्याअभावी या पुलावरून रहदारीला प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे होत असलेल्या कामांतून उघड झाले आहे.पुलाचे काम पूर्ण झाले असून पुलावर पथदिवेदेखील बसविण्यात आले आहेत. मात्र, आळंदी-देहू रस्त्यापासून इंद्रायणी नदीवरील पूल जोडणाºया रस्त्याचे भूसंपादन रखडल्याने बाह्यवळण मार्गाच्या विकासात भूसंपादनाचा अडथळा असल्याचे प्रशासनांकडून सांगितले जात आहे. शासनाचे नियोजन विभागाचे येथील कामावर थेट नियंत्रण नसल्याने येथील कामे अर्धवट अवस्थेत असून अजून सुरूच आहेत.मुदत संपल्याने कामास विलंब; मुदतवाढीचा प्रश्न ऐरणीवरयेथील बाह्यवळण मार्गाचे विकासकामाचे कार्यादेश ३ जानेवारी २०१७ रोजी देण्यात आले होते. या कामाची मुदत १२ महिन्यांची होती. २ जानेवारी २०१८ रोजी मुदत संपली. यामुळे बाह्यवळण मार्गाच्या विकासकामाला वाढीव ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, मुदतवाढ देऊनदेखील अजून काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. वाढीव मुदतीतदेखील काम पूर्ण न झाल्याने आता पुन्हा यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, बाह्यवळण मार्गात आळंदीतील अंतर्गत रस्ते विकसित होत आहेत. यासाठी कार्यादेशाप्रमाणे ६ कोटी ५ लाख २९ हजार ६०४ रुपये खर्चाचे बाह्यवळण मार्गाचे काम आहे.यात आळंदी-देहू रस्त्यावरील मोशी-आळंदी रस्त्यापासून ते इंद्रायणी नदीकिनारा, गोपाळपूर पूल ते केळगाव रस्ता ते चाकण रस्त्या या कामाचा समावेश आहे. मात्र, इंद्रायणी नदीवरील गोपाळपूर पूल ते केळगाव रस्ता ते चाकण रस्ता यादरम्यानचा बाह्यवळण मार्ग विकसित होत आहे. यालादेखील काही महिने अजून वेळ लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दोष दायित्व ६० महिन्यांसाठी संबंधित रस्ते विकसित करणाºया ठेकेदार कंपनीकडे आहे.रस्त्याच्या देखभालीसाठी नंतर फारसा खर्च आळंदी नगर परिषदेला करावा लागणार नाही. उर्वरित बाह्यवळणाचे काम वारकरी शिक्षण संस्था- पद्मावती रस्ता- वडगाव रस्ता ते मरकळ रस्ता तसेच मरकळ रस्ता- चºहोली रस्ता- इंद्रायणी नदी ते पुढे पुणे-आळंदी रस्ता यादरम्यान रस्तेविकासाला गती देण्याची गरज भाविक, नागरिकांतून व्यक्त होत आहे. उर्वरित बाह्यवळण मार्गाचे भूसंपादन आणि रस्तेविकास सुरू झाला नसल्याने आळंदीत वाहतूककोंडी अजून काही काळ कायम राहील.जुन्या दगडी पुलाच्या रुंदीकरणासाठी साकडेआळंदी-चाकण मार्गावरील जुना दगडी पूल अरुंद असल्याने त्याच्या रुंदीकरणाची गरज असल्याने वाढीव कामात रुंदीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या संदर्भात आमदार सुरेश गोरे यांनादेखील नागरिकांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे. येथील डुडुळगाव (ता. हवेली), केळगाव चिंबळी (ता. खेड) जोडणाºया पुलाचे काम पूर्ण, मात्र पुलाला जोडरस्त्यांच्या कामाअभावी पूल अनेक वर्षांपासून वापरास बंद तसेच इंद्रायणी नदीत वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे. इंद्रायणी नदीकडील पूर्वकिनारा मात्र रस्तेविकासापासून वंचित राहिला आहे. 

टॅग्स :Alandiआळंदीnewsबातम्या