शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

रायरेश्वर किल्ल्याच्या शिडीला लाकडाचा ठेपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:11 IST

अपघात होण्याची शक्यता : शिडी गंज लागून खराब

महुडे : स्वराज्याची पहिली शपथ भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली. त्या रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. या पर्यटकांसाठी व रायरेश्वर ग्रामस्थांना चढउतार करण्यासाठी १९९२मध्ये लोखंडी शिडी बसविण्यात आली. परंतु, आज ती शिडी गंज लागून खराब झाली आहे. या खराब शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, अशी काळजी म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांकडून त्या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या गेल्या आहेत.

भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेले ठिकाण असल्याने अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली तसेच पर्यटक किल्ल्याला कायम वर्षभर भेट देण्यासाठी येतात. किल्ल्यावर जाण्याचा एकमेव मार्ग शिडीने चालू होतो. या लोखंडी शिडीला गंज लागून काही पायऱ्या नादुरुस्त झालेल्या आहेत. एके ठिकाणी शिडी झुकलेली दिसत आहे. या शिडीवरून पर्यटक, विद्यार्थी व रायरेश्वरावरील ग्रामस्थ ये-जा करतात. या शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांनी या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या आहेत. ही शिडी शेवटच्या घटका मोजत असल्याने प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार? मोठी दुर्घटना झाल्यावर काय होईल? असे अनेक प्रश्न येथील ग्रामस्थांना पडले आहेत. रायरेश्वरावरील एखादीव्यक्ती आजारी असल्यास उपचारांसाठी त्या व्यक्तीला डोली करून घेऊन जावे लागते.रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी असणारा रस्ता दुरुस्त करावा तसेच रायरेश्वर ग्रामस्थांना व पर्यटक यांच्यासाठी चढउतार करण्यासाठी असणारी लोखंडी शिडी नवीन मिळावी, अशी मागणी रायरेश्वर ग्रामस्थांकडून ग्रामस्थ समीर घोडेकर व सरपंच दत्तात्रय जंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Puneपुणे