शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रायरेश्वर किल्ल्याच्या शिडीला लाकडाचा ठेपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:11 IST

अपघात होण्याची शक्यता : शिडी गंज लागून खराब

महुडे : स्वराज्याची पहिली शपथ भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली. त्या रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. या पर्यटकांसाठी व रायरेश्वर ग्रामस्थांना चढउतार करण्यासाठी १९९२मध्ये लोखंडी शिडी बसविण्यात आली. परंतु, आज ती शिडी गंज लागून खराब झाली आहे. या खराब शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, अशी काळजी म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांकडून त्या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या गेल्या आहेत.

भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेले ठिकाण असल्याने अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली तसेच पर्यटक किल्ल्याला कायम वर्षभर भेट देण्यासाठी येतात. किल्ल्यावर जाण्याचा एकमेव मार्ग शिडीने चालू होतो. या लोखंडी शिडीला गंज लागून काही पायऱ्या नादुरुस्त झालेल्या आहेत. एके ठिकाणी शिडी झुकलेली दिसत आहे. या शिडीवरून पर्यटक, विद्यार्थी व रायरेश्वरावरील ग्रामस्थ ये-जा करतात. या शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांनी या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या आहेत. ही शिडी शेवटच्या घटका मोजत असल्याने प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार? मोठी दुर्घटना झाल्यावर काय होईल? असे अनेक प्रश्न येथील ग्रामस्थांना पडले आहेत. रायरेश्वरावरील एखादीव्यक्ती आजारी असल्यास उपचारांसाठी त्या व्यक्तीला डोली करून घेऊन जावे लागते.रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी असणारा रस्ता दुरुस्त करावा तसेच रायरेश्वर ग्रामस्थांना व पर्यटक यांच्यासाठी चढउतार करण्यासाठी असणारी लोखंडी शिडी नवीन मिळावी, अशी मागणी रायरेश्वर ग्रामस्थांकडून ग्रामस्थ समीर घोडेकर व सरपंच दत्तात्रय जंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Puneपुणे