शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

रायरेश्वर किल्ल्याच्या शिडीला लाकडाचा ठेपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:11 IST

अपघात होण्याची शक्यता : शिडी गंज लागून खराब

महुडे : स्वराज्याची पहिली शपथ भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली. त्या रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. या पर्यटकांसाठी व रायरेश्वर ग्रामस्थांना चढउतार करण्यासाठी १९९२मध्ये लोखंडी शिडी बसविण्यात आली. परंतु, आज ती शिडी गंज लागून खराब झाली आहे. या खराब शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, अशी काळजी म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांकडून त्या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या गेल्या आहेत.

भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेले ठिकाण असल्याने अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली तसेच पर्यटक किल्ल्याला कायम वर्षभर भेट देण्यासाठी येतात. किल्ल्यावर जाण्याचा एकमेव मार्ग शिडीने चालू होतो. या लोखंडी शिडीला गंज लागून काही पायऱ्या नादुरुस्त झालेल्या आहेत. एके ठिकाणी शिडी झुकलेली दिसत आहे. या शिडीवरून पर्यटक, विद्यार्थी व रायरेश्वरावरील ग्रामस्थ ये-जा करतात. या शिडीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रायरेश्वर ग्रामस्थांनी या शिडीला लाकडाच्या ठेपा दिल्या आहेत. ही शिडी शेवटच्या घटका मोजत असल्याने प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार? मोठी दुर्घटना झाल्यावर काय होईल? असे अनेक प्रश्न येथील ग्रामस्थांना पडले आहेत. रायरेश्वरावरील एखादीव्यक्ती आजारी असल्यास उपचारांसाठी त्या व्यक्तीला डोली करून घेऊन जावे लागते.रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी असणारा रस्ता दुरुस्त करावा तसेच रायरेश्वर ग्रामस्थांना व पर्यटक यांच्यासाठी चढउतार करण्यासाठी असणारी लोखंडी शिडी नवीन मिळावी, अशी मागणी रायरेश्वर ग्रामस्थांकडून ग्रामस्थ समीर घोडेकर व सरपंच दत्तात्रय जंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Puneपुणे