शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 21:22 IST

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  

 

किरण उंद्रे  :

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  पतीच्या टेम्पोला अपघात झाला. अपघातमध्ये पतीच्या पायाला दुखापत होऊन पायात रॉड टाकायला लागला. मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जन्माचे अपंगत्व आले. हालचालीवर मर्यादा आल्या. त्यामुळे पूर्वीसारखं काम जमेना. अशा परिस्थित कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आली. 

 सरिता गाडे यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. हहडपसर, मांजरी,  पंधरा नंबर, महादेवनगर व इतर परिसरात सध्या रिक्षा चालवत आहेत.त्या बोलताना पुढे म्हणाल्या वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या समस्येला अनेक नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून खचून जावून अनेकण आत्महत्या करतात. माझे पती बाळु गाडे हे देखील रिक्षा चालवत होते. कुटुंबाला मदत करण्यासाठी मी देखील त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा गाडा ओढते.

सरिता गाडे सध्या भाड्याने परमिट लायसन्स घेऊन सध्या रिक्षा चालवत आहेत. ते म्हणाले माझे परमिट लायसन्स काढायचे आहे परंतु कागदपत्रांमध्ये त्रुटी निघत असल्याने माझे परमिट लायसन्स निघत नाही. त्यामुळे दुसºयाचे परमिट लायसन्स वापरत आहेत. त्यामुळे ज्या मालकाच्या नावे लायसन्स आहे त्यांना दिवसाला दोनशे पन्नास रुपये भाडे स्वरूपात पैसे द्यावे लागतात. त्यामुळे स्वत: चे परमिट लायसन्स निघाल्यास हे पैसे द्यावे लागणार नाही. शासनाने महीलांना परमिट लायसन्स काढण्यासाठी सवलत दिली पाहिजे अशी गाडे यांनी मागणी केली आहे. 

सुरवातीला रिक्षा चालवना थोडे अवघड वाटत होते पतींनीच रिक्षा चालवायला शिकवले परंतु सध्या काही वाटत नाही. उलट प्रवाशांना महिला रिक्षा चालवत असल्याचे कुतूहल वाटत आहे. प्रवाशी रिक्षात बसल्यावर माझी विचारपूस करतात. पंरतु कुटुंबाला हातभार लावत असल्याने समाधान वाटते. अनेक महाविद्यालयीन मुली माझ्यासोबत आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढतात. यातून प्रवाशांमधील असणारी आपुलकी दिसून येत.

बाळू गाडे (महिला रिक्षाचालकाचे पती) : १९९२ साली उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यात आलो. व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात २०१४ साली अपघात झाला.  त्यात पायाला मोठी दुखापत झाली. पाय काम करत नाही. त्याचबरोबर कंबरेचा मनक्याचा आजार असल्याने रिक्षा चालवताना त्रास होतो. पत्नीनेच स्वत: रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.  स्वत: म्हणाली कुटुंब चालवण्यासाठी माझा हातभार लागेल. त्यामुळे तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

टॅग्स :Womenमहिलाauto rickshawऑटो रिक्षा