शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 21:22 IST

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  

 

किरण उंद्रे  :

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  पतीच्या टेम्पोला अपघात झाला. अपघातमध्ये पतीच्या पायाला दुखापत होऊन पायात रॉड टाकायला लागला. मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जन्माचे अपंगत्व आले. हालचालीवर मर्यादा आल्या. त्यामुळे पूर्वीसारखं काम जमेना. अशा परिस्थित कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आली. 

 सरिता गाडे यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. हहडपसर, मांजरी,  पंधरा नंबर, महादेवनगर व इतर परिसरात सध्या रिक्षा चालवत आहेत.त्या बोलताना पुढे म्हणाल्या वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या समस्येला अनेक नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून खचून जावून अनेकण आत्महत्या करतात. माझे पती बाळु गाडे हे देखील रिक्षा चालवत होते. कुटुंबाला मदत करण्यासाठी मी देखील त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा गाडा ओढते.

सरिता गाडे सध्या भाड्याने परमिट लायसन्स घेऊन सध्या रिक्षा चालवत आहेत. ते म्हणाले माझे परमिट लायसन्स काढायचे आहे परंतु कागदपत्रांमध्ये त्रुटी निघत असल्याने माझे परमिट लायसन्स निघत नाही. त्यामुळे दुसºयाचे परमिट लायसन्स वापरत आहेत. त्यामुळे ज्या मालकाच्या नावे लायसन्स आहे त्यांना दिवसाला दोनशे पन्नास रुपये भाडे स्वरूपात पैसे द्यावे लागतात. त्यामुळे स्वत: चे परमिट लायसन्स निघाल्यास हे पैसे द्यावे लागणार नाही. शासनाने महीलांना परमिट लायसन्स काढण्यासाठी सवलत दिली पाहिजे अशी गाडे यांनी मागणी केली आहे. 

सुरवातीला रिक्षा चालवना थोडे अवघड वाटत होते पतींनीच रिक्षा चालवायला शिकवले परंतु सध्या काही वाटत नाही. उलट प्रवाशांना महिला रिक्षा चालवत असल्याचे कुतूहल वाटत आहे. प्रवाशी रिक्षात बसल्यावर माझी विचारपूस करतात. पंरतु कुटुंबाला हातभार लावत असल्याने समाधान वाटते. अनेक महाविद्यालयीन मुली माझ्यासोबत आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढतात. यातून प्रवाशांमधील असणारी आपुलकी दिसून येत.

बाळू गाडे (महिला रिक्षाचालकाचे पती) : १९९२ साली उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यात आलो. व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात २०१४ साली अपघात झाला.  त्यात पायाला मोठी दुखापत झाली. पाय काम करत नाही. त्याचबरोबर कंबरेचा मनक्याचा आजार असल्याने रिक्षा चालवताना त्रास होतो. पत्नीनेच स्वत: रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.  स्वत: म्हणाली कुटुंब चालवण्यासाठी माझा हातभार लागेल. त्यामुळे तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

टॅग्स :Womenमहिलाauto rickshawऑटो रिक्षा