शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

पतीच्या अपघातानंतर महिला चालवते रिक्षा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 21:22 IST

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  

 

किरण उंद्रे  :

जेव्हा कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी नेहमी पदराआड असणारी गृहिणी डोक्यावरील पदर कमरेला खोचून परिस्थितीशी दोन हात करते तेव्हा प्रारब्ध आणि नशिबाच्या रेषा आपल्या मनाप्रमाणे आखत असते. अशाच झुंजार रणरागिणीची ही कहाणी आहे.  पतीच्या टेम्पोला अपघात झाला. अपघातमध्ये पतीच्या पायाला दुखापत होऊन पायात रॉड टाकायला लागला. मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जन्माचे अपंगत्व आले. हालचालीवर मर्यादा आल्या. त्यामुळे पूर्वीसारखं काम जमेना. अशा परिस्थित कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आली. 

 सरिता गाडे यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. हहडपसर, मांजरी,  पंधरा नंबर, महादेवनगर व इतर परिसरात सध्या रिक्षा चालवत आहेत.त्या बोलताना पुढे म्हणाल्या वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या समस्येला अनेक नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून खचून जावून अनेकण आत्महत्या करतात. माझे पती बाळु गाडे हे देखील रिक्षा चालवत होते. कुटुंबाला मदत करण्यासाठी मी देखील त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा गाडा ओढते.

सरिता गाडे सध्या भाड्याने परमिट लायसन्स घेऊन सध्या रिक्षा चालवत आहेत. ते म्हणाले माझे परमिट लायसन्स काढायचे आहे परंतु कागदपत्रांमध्ये त्रुटी निघत असल्याने माझे परमिट लायसन्स निघत नाही. त्यामुळे दुसºयाचे परमिट लायसन्स वापरत आहेत. त्यामुळे ज्या मालकाच्या नावे लायसन्स आहे त्यांना दिवसाला दोनशे पन्नास रुपये भाडे स्वरूपात पैसे द्यावे लागतात. त्यामुळे स्वत: चे परमिट लायसन्स निघाल्यास हे पैसे द्यावे लागणार नाही. शासनाने महीलांना परमिट लायसन्स काढण्यासाठी सवलत दिली पाहिजे अशी गाडे यांनी मागणी केली आहे. 

सुरवातीला रिक्षा चालवना थोडे अवघड वाटत होते पतींनीच रिक्षा चालवायला शिकवले परंतु सध्या काही वाटत नाही. उलट प्रवाशांना महिला रिक्षा चालवत असल्याचे कुतूहल वाटत आहे. प्रवाशी रिक्षात बसल्यावर माझी विचारपूस करतात. पंरतु कुटुंबाला हातभार लावत असल्याने समाधान वाटते. अनेक महाविद्यालयीन मुली माझ्यासोबत आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढतात. यातून प्रवाशांमधील असणारी आपुलकी दिसून येत.

बाळू गाडे (महिला रिक्षाचालकाचे पती) : १९९२ साली उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यात आलो. व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात २०१४ साली अपघात झाला.  त्यात पायाला मोठी दुखापत झाली. पाय काम करत नाही. त्याचबरोबर कंबरेचा मनक्याचा आजार असल्याने रिक्षा चालवताना त्रास होतो. पत्नीनेच स्वत: रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.  स्वत: म्हणाली कुटुंब चालवण्यासाठी माझा हातभार लागेल. त्यामुळे तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

टॅग्स :Womenमहिलाauto rickshawऑटो रिक्षा