शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तळजाईवरील काँक्रिटीकरण काढून टाकणार; नगरसेवकांकडून नागरिकांना आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 11:33 IST

काँक्रिटीकरणाच्या मुद्द्यावर आयुक्त कार्यालयात बैठक

पुणे : तळजाई टेकडीवर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणावर आणि येथील जैवविविधता प्रकल्पावर महापालिका आयुक्तालयासमोर सादरीकरणाचे आयोजन केले होते. परंतु पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी टेकडीवर कसलाही प्रकल्प नको, अशी भूमिका घेऊन सादरीकरण करायला विरोध केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत टेकडीवरील काँक्रिटीकरण काढून टाकण्यात येईल, असे आश्वासन स्थानिक नगरसेवक आबा बागुल आणि स्वीकृत सदस्य सुभाष जगताप यांनी दिले. तळजाईवर गेल्या काही महिन्यांपासून काँक्रिटीकरणावर भर दिला जात असून, टेकडीचे सौंदर्य नष्ट होत आहे. तसेच जैवविविधता प्रकल्पामध्ये कौशल्य विकास केंद्र, सेंद्रीय शेती केंद्र आणि  इतर अनेक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याला नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. आज महापालिकेत आयुक्तासमोर टेकडीवरील विकासकामांच्या प्रकल्पाचे सादरीकरण होते. यावेळी आयुक्त सौरव राव, नगरसेवक आबा बागुल, अश्विनी कदम, सुभाष जगताप, साईदिशा माने, पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर, सत्या नटराजन, मकरंद शेंडे, पुष्कर कुलकर्णी, आर्किटेक्चर आनंद उपळेकर, हेमंत बागुल, पालिका अधिकारी, नागरिक उपस्थित होते. पर्यावरणप्रेमींनी सुरुवातीला टेकडीवरील विकासकामांचा प्रकल्प कधी मंजूर झाला, कसा मंजूर झाला असे प्रश्न विचारले. त्यावर पालिका अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता आले नाही. टेकडीवरील प्रकल्प अंतिम झालेला नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी 2018 मध्ये सल्लागाराची नेमणूक केली होती. जर सल्लागार नेमला, तर मग नागरिकांशी किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला का घेतला नाही, असा सवाल उपस्थित केला. तेव्हा प्रकल्प अंतिम झालेला नाही. त्यावर चर्चा करता येईल आणि बदल करता येईल, असे आबा बागुल यांनी सांगितले. नागरिक आणि तज्ज्ञांशी बोलून प्रकल्प पुढे नेऊ, असे ते म्हणाले.अश्विनी कदम म्हणाल्या, लोकांच्या भावनेचा विचार केला पाहिजे. त्यांना टेकडीवर कसलेही काँक्रिटीकरण नको आहे, तर त्याचा विचार व्हावा. सत्या नटराजन म्हणाले, टेकडीवर वृक्ष तोड होत आहे. तिचे सौंदर्य नष्ट केले जात आहे. टेकडीवर बांधकाम करता येत नाही हा नियम आहे. मग तरी बांधकाम कसे झाले? कायद्याचे उल्लंघन होत आहे. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. पुष्कर कुलकर्णी म्हणाले, लोकशाहीत नागरिकांचा विचार करणे आवश्यक असते. लोकांना टेकडीवर कसलाही विकास नको आहे. लोकांच्या कररूपी पैशांचा विनाकारण चुराडा करू नये. पैसे योग्य ठिकाणी खर्च व्हावेत. विकास नको आम्हाला...टेकडीवर विकास करायचा आहे. तुम्हाला विकास हवा की, नको, असे आबा बागुल यांनी मोठ्याने सर्वांना विचारले. तेव्हा सर्व नागरिकांनी मोठ्या आवाजात टेकडीवर विकास नकोय आम्हाला!, असे ठणकावून सांगितले. आयुक्तांना निवेदनटेकडीवर सुरू असलेले काँक्रिटीकरण थांबवावे आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पालिका आयुक्त सौरव राव यांना पर्यावरणप्रेमींनी यावेळी दिले. त्यानंतर टेकडीचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.