शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 03:14 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आगामी सन्माननीय अध्यक्ष कोण असेल? या चर्चेबरोबरच आता २०२० चे साहित्य संमेलन कुठे होणार? याविषयी साहित्य वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आगामी सन्माननीय अध्यक्ष कोण असेल? या चर्चेबरोबरच आता २०२० चे साहित्य संमेलन कुठे होणार? याविषयी साहित्य वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी मराठवाडा साहित्य परिषदेकडे गेल्यामुुळे साहित्य संमेलन हे मराठवाड्यातच व्हावे यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लातूर किंवा उस्मानाबादला संमेलन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडे तीन वर्षांपासून असलेले साहित्य महामंडळाचे कार्यालय १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षांसाठी औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेकडे गेले आहे. यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये आगामी ९३ व्या साहित्य संमेलनासाठी महामंडळाकडे लातूर, उस्मानाबाद आणि बुलडाणायेथील प्रगती वाचनालय या तीन ठिकाणांहून निमंत्रणे आल्याचे सांगण्यात आले आहे. आजवरचा संमेलनाचा इतिहास पाहता ज्या घटक संस्थेकडे साहित्य महामंडळ जाते त्याच संस्थेचे संमेलनावर वर्चस्व असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यातच महामंडळाचे फिरते कार्यालय औरंगाबादला असल्याने आगामी तीनपैकी दोन संमेलने तरी मराठवाड्यात आयोजित करून साहित्यिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद आग्रही आहे. यामुळे पुढील तीन संमेलनांवर मराठवाड्याचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी उस्मानाबाद अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. २०१५ मध्ये उस्मानाबाद येथे संमेलन होण्याची शक्यता होती; पण त्यांची संधी हुकली आणि हेसंमेलन घुमानला झाले. उस्मानाबाद आणि लातूर येथे एकदाहीसाहित्य संमेलन झालेले नाही.संमेलन म्हणजे पुणे-मुंबई आणि शहरपट्टा असे समीकरण झाले आहे. इतर भागात सांस्कृतिक भूक कायम आहे. तेथील अनुशेष भरून काढण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाड्याला समर्थन देईल, असे मसापमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.आगामी साहित्य संमेलनासाठी लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भ येथून निमंत्रणे आली आहेत. महामंडळाचे कार्यालय मराठवाड्याकडे आल्यापासून एकही निमंत्रण आलेले नाही. पुढील काही दिवसांत आणखी निमंत्रणे येतील. त्यानंतर बैठकीत चर्चा होईल. निमंत्रण पाठवण्यासाठी अंतिम मुदत दिलेली नाही. यापुढे येणाºया निमंत्रणांचा विचार केला जाईल.- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन