शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार का? महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:56 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.‘बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगडविटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंत आणि सारस्वतांच्या कलाविष्काराने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. साहित्यिक आणि कलावंतांना ऊर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सर्जनकेंद्र आहे. या वास्तूची निगा व देखभाल राखण्यात पूर्णत: अपयशी ठरलेली पुणे महापालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे. पुणेकर रसिकांच्या भावना लक्षात घेऊन ही वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंकुल दुसºया जागेत उभे करावे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना साहित्य आणि कलाक्षेत्रातील लोकांशी बोलून, त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, असे संबंधितांना वाटत नाही यातच त्यांचा कोडगेपणा दिसून येतो,’ अशी संतप्त प्रतिक्रिया मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, याचा विसर महापालिकेला पडला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक वैभव आहे,’ असेही ते म्हणाले.जन्मशताब्दी वर्षात तरी गदिमांचे स्मारक करामहाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाबाबत पुणे महापालिका कमालीची उदासीन आहे. ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आली, तरी पुण्यात त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. या वर्षात तरी ते करून दाखवा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.कट सुज्ञ नागरिकच उधळून लावतील : सुरेखा पुणेकरहजारो कलाकारांचे मंदिर व शहराची ओळख असलेली बालगंधर्व रंगमंदिर ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कट सुज्ञ पुणेकरच उधळून लावतील, असे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. शिवसेना शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने बालगंधर्व येथे कलाकार-नागरिक यांची मते जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.कलाकार आणि पुणेकरांच्या भावनांचा विचार न करता भाजपाने या वास्तूचे व्यावसायिक सेंटर उभारण्यासाठी हा घाट घातला आहे. ही वास्तू कदापि पाडू देणार नाही, असे क्षेत्रप्रमुख उमेश वाघ म्हणाले. विभागप्रमुख राहुल शिरोळे यांनी केलेल्या या आंदोलनात सुनील महाजन, अभिनेता पवनकुमार, निर्माते बाबा पठाण, मोहन कुलकर्णी, वरुण कांबळे, गायक जितेंद्र भुरूक, रेश्मी मुखर्जी यांच्यासह अनेकांनी बालगंधर्व पाडण्यास विरोध दर्शविला. सुरेखा पुणेकरांसह उपविभागप्रमुख हेमंत डाबी, मंगेश खेडेकर, सुयोग भावे, प्रवीण डोंगरे, केदार सिद्धेश्वर यांनी जनजागृती पत्रकांचे वाटप करून नागरिकांची स्वाक्षरी घेतली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र