शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार का? महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:56 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.‘बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगडविटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंत आणि सारस्वतांच्या कलाविष्काराने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. साहित्यिक आणि कलावंतांना ऊर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सर्जनकेंद्र आहे. या वास्तूची निगा व देखभाल राखण्यात पूर्णत: अपयशी ठरलेली पुणे महापालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे. पुणेकर रसिकांच्या भावना लक्षात घेऊन ही वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंकुल दुसºया जागेत उभे करावे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना साहित्य आणि कलाक्षेत्रातील लोकांशी बोलून, त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, असे संबंधितांना वाटत नाही यातच त्यांचा कोडगेपणा दिसून येतो,’ अशी संतप्त प्रतिक्रिया मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, याचा विसर महापालिकेला पडला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक वैभव आहे,’ असेही ते म्हणाले.जन्मशताब्दी वर्षात तरी गदिमांचे स्मारक करामहाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाबाबत पुणे महापालिका कमालीची उदासीन आहे. ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आली, तरी पुण्यात त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. या वर्षात तरी ते करून दाखवा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.कट सुज्ञ नागरिकच उधळून लावतील : सुरेखा पुणेकरहजारो कलाकारांचे मंदिर व शहराची ओळख असलेली बालगंधर्व रंगमंदिर ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कट सुज्ञ पुणेकरच उधळून लावतील, असे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. शिवसेना शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने बालगंधर्व येथे कलाकार-नागरिक यांची मते जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.कलाकार आणि पुणेकरांच्या भावनांचा विचार न करता भाजपाने या वास्तूचे व्यावसायिक सेंटर उभारण्यासाठी हा घाट घातला आहे. ही वास्तू कदापि पाडू देणार नाही, असे क्षेत्रप्रमुख उमेश वाघ म्हणाले. विभागप्रमुख राहुल शिरोळे यांनी केलेल्या या आंदोलनात सुनील महाजन, अभिनेता पवनकुमार, निर्माते बाबा पठाण, मोहन कुलकर्णी, वरुण कांबळे, गायक जितेंद्र भुरूक, रेश्मी मुखर्जी यांच्यासह अनेकांनी बालगंधर्व पाडण्यास विरोध दर्शविला. सुरेखा पुणेकरांसह उपविभागप्रमुख हेमंत डाबी, मंगेश खेडेकर, सुयोग भावे, प्रवीण डोंगरे, केदार सिद्धेश्वर यांनी जनजागृती पत्रकांचे वाटप करून नागरिकांची स्वाक्षरी घेतली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र