शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:27 IST

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना ...

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वी तळे खोदण्यात आले आहे. याच तळ्यात पाणी पिण्यासाठी मोरांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांना इतरत्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

एकीकडे, शासन १३ कोटी वृक्षलागवडीसाठी संकल्प करीत आहे. तसेच, वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम पाणवठे तयार करून विविध उपाययोजना राबवून जनजागृती करीत आहे. मात्र, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणवठे आटले आहेत. चासकमान परिसरातील मिरजेवाडी, भावडी परिसरात कुदळेवाडीच्या जंगलात अज्ञात व्यक्तीकडून बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे.मात्र, मिरजेवाडी, कुदळेवाडीच्या जंगलात वृक्षांची मोठ्या प्रमाणात सर्रास अज्ञात व्यक्तीकडून कुºहाडीचे घाव घालून कत्तल केली जात आहे. तर, अनेक झाडे निम्म्याहून अधिक कापून अर्धी, जीर्ण करून ठेवली आहेत.पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता चासकमान परिसरातील शेतात वरचे वर दिसू लागला आहे. कोणत्याही प्रतिकूल वातावरणाशी जूळवून घेण्यात तरबेज असलेल्या बिबट्याचा जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय? केवळ जंगली भागात असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहेत. त्यांच्यापासून सुरक्षिततेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.तसेच मिरजेवाडी, कुदळेवाडी जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्वतंत्र पिजरा लावून संरक्षण सोयीसुविधा देण्याची गरज आहे. कित्येकदा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा येईपर्यंत वेळ घालवण्याऐवजी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पिजरा लावल्यानंतर त्यात बिबट्या सहज अडकेल आणि आपली जबाबदारी संपेल, अशी वन अधिकाऱ्यांना आशा असली, तरी परिस्थिती तशी नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.बिबट्याला पकडल्यानंतर निसर्गात मुक्त करावे लागत असते. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार