शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:27 IST

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना ...

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वी तळे खोदण्यात आले आहे. याच तळ्यात पाणी पिण्यासाठी मोरांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांना इतरत्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

एकीकडे, शासन १३ कोटी वृक्षलागवडीसाठी संकल्प करीत आहे. तसेच, वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम पाणवठे तयार करून विविध उपाययोजना राबवून जनजागृती करीत आहे. मात्र, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणवठे आटले आहेत. चासकमान परिसरातील मिरजेवाडी, भावडी परिसरात कुदळेवाडीच्या जंगलात अज्ञात व्यक्तीकडून बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे.मात्र, मिरजेवाडी, कुदळेवाडीच्या जंगलात वृक्षांची मोठ्या प्रमाणात सर्रास अज्ञात व्यक्तीकडून कुºहाडीचे घाव घालून कत्तल केली जात आहे. तर, अनेक झाडे निम्म्याहून अधिक कापून अर्धी, जीर्ण करून ठेवली आहेत.पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता चासकमान परिसरातील शेतात वरचे वर दिसू लागला आहे. कोणत्याही प्रतिकूल वातावरणाशी जूळवून घेण्यात तरबेज असलेल्या बिबट्याचा जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय? केवळ जंगली भागात असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहेत. त्यांच्यापासून सुरक्षिततेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.तसेच मिरजेवाडी, कुदळेवाडी जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्वतंत्र पिजरा लावून संरक्षण सोयीसुविधा देण्याची गरज आहे. कित्येकदा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा येईपर्यंत वेळ घालवण्याऐवजी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पिजरा लावल्यानंतर त्यात बिबट्या सहज अडकेल आणि आपली जबाबदारी संपेल, अशी वन अधिकाऱ्यांना आशा असली, तरी परिस्थिती तशी नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.बिबट्याला पकडल्यानंतर निसर्गात मुक्त करावे लागत असते. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार