शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:27 IST

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना ...

चासकमान : खेड तालुक्यातील चास परिसरातील मिरजेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील भावडी-कुदळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, याच जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वी तळे खोदण्यात आले आहे. याच तळ्यात पाणी पिण्यासाठी मोरांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तळ्यातील पाणी संपल्याने वन्यप्राण्यांना इतरत्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

एकीकडे, शासन १३ कोटी वृक्षलागवडीसाठी संकल्प करीत आहे. तसेच, वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम पाणवठे तयार करून विविध उपाययोजना राबवून जनजागृती करीत आहे. मात्र, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणवठे आटले आहेत. चासकमान परिसरातील मिरजेवाडी, भावडी परिसरात कुदळेवाडीच्या जंगलात अज्ञात व्यक्तीकडून बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे.मात्र, मिरजेवाडी, कुदळेवाडीच्या जंगलात वृक्षांची मोठ्या प्रमाणात सर्रास अज्ञात व्यक्तीकडून कुºहाडीचे घाव घालून कत्तल केली जात आहे. तर, अनेक झाडे निम्म्याहून अधिक कापून अर्धी, जीर्ण करून ठेवली आहेत.पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता चासकमान परिसरातील शेतात वरचे वर दिसू लागला आहे. कोणत्याही प्रतिकूल वातावरणाशी जूळवून घेण्यात तरबेज असलेल्या बिबट्याचा जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय? केवळ जंगली भागात असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहेत. त्यांच्यापासून सुरक्षिततेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.तसेच मिरजेवाडी, कुदळेवाडी जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्वतंत्र पिजरा लावून संरक्षण सोयीसुविधा देण्याची गरज आहे. कित्येकदा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा येईपर्यंत वेळ घालवण्याऐवजी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पिजरा लावल्यानंतर त्यात बिबट्या सहज अडकेल आणि आपली जबाबदारी संपेल, अशी वन अधिकाऱ्यांना आशा असली, तरी परिस्थिती तशी नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.बिबट्याला पकडल्यानंतर निसर्गात मुक्त करावे लागत असते. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार