शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तरुणाच्या दक्षतेमुळे जखमी हरणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:33 IST

भिवरी (ता. पुरंदर) येथील घिसरेवाडीनजीक पठारमळ्यातील शेतात हरिण जखमी होऊन पडले होते. या शेताचे मालक, भैरवनाथ चतुर्मुख प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब कटके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी भिवरी येथे येऊन जखमी हरिण ताब्यात घेतले.

गराडे : भिवरी (ता. पुरंदर) येथील घिसरेवाडीनजीक पठारमळ्यातील शेतात हरिण जखमी होऊन पडले होते. या शेताचे मालक, भैरवनाथ चतुर्मुख प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब कटके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी भिवरी येथे येऊन जखमी हरिण ताब्यात घेतले.पठारमळ्यातील जखमी हरिण पाण्यासाठी व शेतातील टोमॅटो खात असताना कुत्र्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला होता.दादासाहेब कटके यांनी कुत्र्यांना पिटाळून लावले. यामध्ये हरणाच्या पाय व मणक्याला दुखापत होऊन जखम झाली होती.या वेळी दादासाहेब कटके, भाऊसाहेब दळवी, माऊली घारे, भाऊसाहेब गोगावले, नवनाथ कटके, सुहास कटके, नवनाथ लोणकर, ओंकार कटके, जीवन दळवी, दत्तात्रय कटके यांनी जखमी हरणाची काळजी घेतली. वनपाल महादेव सस्ते, वनरक्षक एस. के. साळुंखे, वन कर्मचारी नानासाहेब घाटे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी हरणाला दादासाहेब कटके यांच्याकडून ताब्यात घेऊन कात्रज येथील पशू अनाथालयात उपचारांसाठी सोडले. तेथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून हरणाला जीवदान दिले.भिवरी परिसरात अनेक वन्यजीव राहतात. उन्हाळ्यात त्यांचे पाण्याअभावी भयंकर हाल होतात. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अशा घटना घडतात. हे टाळण्यासाठी वन विभाग व सामाजिक सेवाभावी संस्था, व्यक्तींनी पुढाकार घेऊन वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यची सोय करावी, असे आवाहन भिवरी विकास सोसायटीचे उपसभापती भाऊसाहेब दळवी यांनी केले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवPuneपुणे