शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी

By राजू इनामदार | Updated: January 31, 2025 18:00 IST

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनी मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्यासोबत अन्य काही मंत्री. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला? असा खडा सवाल उच्च रवात काही वर्षांपूर्वी विचारणाऱ्या मराठी साहित्याला आता मात्र अशी राजकारण्यांची उपस्थिती अंगवळणी पडली असल्याचे दिसते आहे. फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला व्यासपीठावर हजर असणारी राजकारण्यांची मांदियाळी हेच सांगत होती, त्याची चर्चाही संमेलनस्थळी रंगली होती.

सरकारचा मराठी भाषा विभाग व विश्व मराठी साहित्य संमलेन यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले जाते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच विश्व मराठी साहित्य संमेलन होते. आयोजनात सरकारच आहे म्हणून की काय किंवा मग मराठी अभिजात झाल्यानंतरचे पहिलेच म्हणून की काय, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. ते तर आलेच, पण त्यांच्याबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे हे त्यांचे दोनही उपमुख्यमंत्रीही उदघाटनाला आले. उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे मराठी भाषा विभागही आहेच, त्यामुळे ते होते. नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधरी मिसाळ होत्या, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे हेही होते. व्यासपीठावरच्या या सर्व राजकीय गर्दीत संमेलनात साहित्य भूषण पुरस्कार देण्यात येणारे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याबरोबरच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद मोरे, रविंद्र शोभणे, राजा दीक्षित, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे हेही होते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारने हा दर्जा जाहीर केला असला तरी त्याची प्रतिक्षाही बराच काळ करावी लागली होती, मात्र त्याचा आता विसर पडला असल्याचे दिसते आहे. उलट हा दर्जा जाहीर केल्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल याचाच विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी याचे पूर्ण श्रेय दिले व त्यासाठी पंतप्रधानांना समस्त मराठी जनतेच्या वतीने त्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. सगळे श्रेय मुख्यमंत्र्यांनीच का घ्यावे म्हणून मग उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनीही मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असे सांगितले.

फडणवीस, पवार, शिंदे यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्यात्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारीही उदघाटनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनस्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे स्वत:च्या छायाचित्रांसहितचे भले मोठे फलक झळकावले होते. त्यांच्या संख्या इतकी होती की साहित्य संमेलन आहे की एखाद्या राजकीय पक्षाचे अधिवेशन असा संभ्रम निर्माण व्हावा. संमेलनासाठी म्हणून आलेल्या काही रसिक साहित्यिक व वाचकांमध्ये याबाबतची बरीच कुजबूज सुरू होती.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेmarathiमराठीcultureसांस्कृतिक