शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी

By राजू इनामदार | Updated: January 31, 2025 18:00 IST

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनी मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्यासोबत अन्य काही मंत्री. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला? असा खडा सवाल उच्च रवात काही वर्षांपूर्वी विचारणाऱ्या मराठी साहित्याला आता मात्र अशी राजकारण्यांची उपस्थिती अंगवळणी पडली असल्याचे दिसते आहे. फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला व्यासपीठावर हजर असणारी राजकारण्यांची मांदियाळी हेच सांगत होती, त्याची चर्चाही संमेलनस्थळी रंगली होती.

सरकारचा मराठी भाषा विभाग व विश्व मराठी साहित्य संमलेन यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले जाते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच विश्व मराठी साहित्य संमेलन होते. आयोजनात सरकारच आहे म्हणून की काय किंवा मग मराठी अभिजात झाल्यानंतरचे पहिलेच म्हणून की काय, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. ते तर आलेच, पण त्यांच्याबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे हे त्यांचे दोनही उपमुख्यमंत्रीही उदघाटनाला आले. उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे मराठी भाषा विभागही आहेच, त्यामुळे ते होते. नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधरी मिसाळ होत्या, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे हेही होते. व्यासपीठावरच्या या सर्व राजकीय गर्दीत संमेलनात साहित्य भूषण पुरस्कार देण्यात येणारे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याबरोबरच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद मोरे, रविंद्र शोभणे, राजा दीक्षित, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे हेही होते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारने हा दर्जा जाहीर केला असला तरी त्याची प्रतिक्षाही बराच काळ करावी लागली होती, मात्र त्याचा आता विसर पडला असल्याचे दिसते आहे. उलट हा दर्जा जाहीर केल्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल याचाच विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी याचे पूर्ण श्रेय दिले व त्यासाठी पंतप्रधानांना समस्त मराठी जनतेच्या वतीने त्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. सगळे श्रेय मुख्यमंत्र्यांनीच का घ्यावे म्हणून मग उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनीही मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असे सांगितले.

फडणवीस, पवार, शिंदे यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्यात्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारीही उदघाटनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनस्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे स्वत:च्या छायाचित्रांसहितचे भले मोठे फलक झळकावले होते. त्यांच्या संख्या इतकी होती की साहित्य संमेलन आहे की एखाद्या राजकीय पक्षाचे अधिवेशन असा संभ्रम निर्माण व्हावा. संमेलनासाठी म्हणून आलेल्या काही रसिक साहित्यिक व वाचकांमध्ये याबाबतची बरीच कुजबूज सुरू होती.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेmarathiमराठीcultureसांस्कृतिक