शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 12:33 IST

‘गीतरामायण’ ही मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली सर्वोत्तम कलाकृती आहे..

ठळक मुद्दे ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित मधु पोतदार लिखित ‘गदिमान’ या पुस्तक प्रकाशन

पुणे : ग. दि. माडगूळकर हे मराठी साहित्य आणि माणसाला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. गदिमा हे गीतकारच नव्हते तर, उत्तम कवीही होते. मराठी भाषेवर गदिमांचे अनंत उपकार आहेत. ‘गीतरामायण’ ही मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली सर्वोत्तम कलाकृती आहे, असे असताना ‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का मिळू नये? असा प्रश्न माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी उपस्थित केला. मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने गीतरामायणाचे शिल्पकार ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित मधु पोतदार लिखित ^‘गदिमान’ या पुस्तकाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विलास पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस, मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे प्रवीण वाळिंबे आणि प्रतिष्ठानच्या सचिव करुणा पाटील या वेळी उपस्थित होते. मधू पोतदार यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.देशमुख म्हणाले, मराठी भाषा किती अर्थवाही आणि किती सुंदर आहे, हे गदिमांच्या लिखाणातून दिसते. त्यांनी मातृभाषेत गीत लेखन रुजविले. गदिमांना इतर भाषेत का यश मिळाले नाही, हे गौण आहे़ त्यांच्या प्रतिभेला तोड नाही. शांता शेळके, पी. सावळाराम, जगदीश खेबूडकर आणि गदिमा ही मराठीतील उत्तम गीतकारांची चौकडी होती. गदिमांची  गीते मनात रूंजी घालतात. मात्र, त्यांच्या प्रतिभेवर कमी लेखन झाले आहे. त्यांच्यावर समग्र चिकित्सा झाली पाहिजे. त्याचा मोठेपणा आपण लोकांसमोर आणायला हवा. त्यांच्या लिखाणाचा समग्र अभ्यास व्हायला हवा. प्रसिद्ध लेखक वि. स़ खांडेकर यांच्या ‘ययाति’ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो, मग गदिमांच्या ‘गीतरामायण’ला का मिळू नये? विलास पाटील म्हणाले, गदिमा यांनी चित्रपट क्षेत्र समृद्ध केले. त्यांची कविता प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची. गीतरामायण हे वैभव त्यांनी दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही, हे नवलच आहे. यासारखी खंत नाही. गदिमा हे मराठीतील एक चमत्कार आहेत. वास्तवता मराठीत आणण्याचे काम त्यांनी केले़कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण वाळिंबे यांनी केले तर धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.............पावसात भिजवत शिकवली कवितापुस्तकामागची भूमिका मधू पोतदार यांनी विशद केली. ते म्हणाले, १९५६ मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये  सहाव्या इयत्तेत शिकत होतो. अत्रे शिक्षकांनी गदिमांची ‘मृग’ नावाची कविता शिकवायला घेतली. वर्गाच्या कोंडवड्यात न शिकविता त्यांनी आम्हाला पावसात भिजवत कविता शिकवली. .......४ती गदिमांशी झालेली पहिली ओळख. शाळेत भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. त्यानंतर त्यांचा चैत्रबन आणि जोगीया काव्यसंग्रह वाचनात आला. त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे. माझ्या चित्रपट अभ्यासाचे मूळ गदिमांची गाणी आहेत. माडगूळकर अफाट प्रतिभेचा माणूस होता. गदिमा हे हुकूमाचा एक्का असलेले गीतकार होते........५०च्या दशकातील ते जादूई गीतकारांपैकी एक असल्याने ते चित्रपट क्षेत्रात प्रत्येकाला हवेहवेसे वाटायचे. आता अभिरुची बदलली आहे. गीत लिहिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. मात्र, गीतकार म्हणून गदिमा यांनी चित्रपटसृष्टीला जे दिले ते अमूल्य आहे.

टॅग्स :PuneपुणेGeetramayanगीतरामायणliteratureसाहित्य