शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
गिल 'गोल्डन डक' झाला अन् 'डगआउट'मध्ये बसलेल्या संजूसह पुन्हा चर्चेत आला 'वशीलेबाजी'चा मुद्दा
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 12:33 IST

‘गीतरामायण’ ही मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली सर्वोत्तम कलाकृती आहे..

ठळक मुद्दे ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित मधु पोतदार लिखित ‘गदिमान’ या पुस्तक प्रकाशन

पुणे : ग. दि. माडगूळकर हे मराठी साहित्य आणि माणसाला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. गदिमा हे गीतकारच नव्हते तर, उत्तम कवीही होते. मराठी भाषेवर गदिमांचे अनंत उपकार आहेत. ‘गीतरामायण’ ही मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली सर्वोत्तम कलाकृती आहे, असे असताना ‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का मिळू नये? असा प्रश्न माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी उपस्थित केला. मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने गीतरामायणाचे शिल्पकार ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित मधु पोतदार लिखित ^‘गदिमान’ या पुस्तकाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विलास पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस, मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे प्रवीण वाळिंबे आणि प्रतिष्ठानच्या सचिव करुणा पाटील या वेळी उपस्थित होते. मधू पोतदार यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.देशमुख म्हणाले, मराठी भाषा किती अर्थवाही आणि किती सुंदर आहे, हे गदिमांच्या लिखाणातून दिसते. त्यांनी मातृभाषेत गीत लेखन रुजविले. गदिमांना इतर भाषेत का यश मिळाले नाही, हे गौण आहे़ त्यांच्या प्रतिभेला तोड नाही. शांता शेळके, पी. सावळाराम, जगदीश खेबूडकर आणि गदिमा ही मराठीतील उत्तम गीतकारांची चौकडी होती. गदिमांची  गीते मनात रूंजी घालतात. मात्र, त्यांच्या प्रतिभेवर कमी लेखन झाले आहे. त्यांच्यावर समग्र चिकित्सा झाली पाहिजे. त्याचा मोठेपणा आपण लोकांसमोर आणायला हवा. त्यांच्या लिखाणाचा समग्र अभ्यास व्हायला हवा. प्रसिद्ध लेखक वि. स़ खांडेकर यांच्या ‘ययाति’ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो, मग गदिमांच्या ‘गीतरामायण’ला का मिळू नये? विलास पाटील म्हणाले, गदिमा यांनी चित्रपट क्षेत्र समृद्ध केले. त्यांची कविता प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची. गीतरामायण हे वैभव त्यांनी दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही, हे नवलच आहे. यासारखी खंत नाही. गदिमा हे मराठीतील एक चमत्कार आहेत. वास्तवता मराठीत आणण्याचे काम त्यांनी केले़कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण वाळिंबे यांनी केले तर धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.............पावसात भिजवत शिकवली कवितापुस्तकामागची भूमिका मधू पोतदार यांनी विशद केली. ते म्हणाले, १९५६ मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये  सहाव्या इयत्तेत शिकत होतो. अत्रे शिक्षकांनी गदिमांची ‘मृग’ नावाची कविता शिकवायला घेतली. वर्गाच्या कोंडवड्यात न शिकविता त्यांनी आम्हाला पावसात भिजवत कविता शिकवली. .......४ती गदिमांशी झालेली पहिली ओळख. शाळेत भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. त्यानंतर त्यांचा चैत्रबन आणि जोगीया काव्यसंग्रह वाचनात आला. त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे. माझ्या चित्रपट अभ्यासाचे मूळ गदिमांची गाणी आहेत. माडगूळकर अफाट प्रतिभेचा माणूस होता. गदिमा हे हुकूमाचा एक्का असलेले गीतकार होते........५०च्या दशकातील ते जादूई गीतकारांपैकी एक असल्याने ते चित्रपट क्षेत्रात प्रत्येकाला हवेहवेसे वाटायचे. आता अभिरुची बदलली आहे. गीत लिहिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. मात्र, गीतकार म्हणून गदिमा यांनी चित्रपटसृष्टीला जे दिले ते अमूल्य आहे.

टॅग्स :PuneपुणेGeetramayanगीतरामायणliteratureसाहित्य