शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Pune: तीन दिवस पाणी मिळेना, हीच का स्मार्ट सिटी? टँकरसाठी द्यावे लागतात ३ ते ४ हजार

By श्रीकिशन काळे | Updated: June 17, 2023 16:15 IST

शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले...

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील लाखो नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणी मिळत नाही. त्यामुळे ते हैराण झाले असून, टँकरचे पाणी ३ ते ४ हजार रूपयांना घ्यावे लागत आहे. पाणी हा मुलभूत अधिकार असताना तो देखील पुणे महापालिका देऊ शकत नाही आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीतंर्गत जागतिक स्तरावर पुरस्कार घेऊन मिरवते, असा विरोधाभास पुण्यात दिसून येत आहेत. पाणी न आल्याने जवळपास ५ लाख लोकं संतापले. त्यानंतर शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले.

भामा आसखेड प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याची वाहिनीला मोठी गळती झाल्यामुळे मागील तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला. दर गुरुवारी शहरात महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्यातच गळतीची ही गंभीर समस्या उद्भवल्यामुळे भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विमाननगर परिसरातील सर्व भागाला पाणी मिळालेले नाही. तीन दिवसांपासून पाण्याविना नागरिक हैराण झाले आहेत. खासगी टँकरवाले देखील हजारो रूपये मागत आहेत. एवढे पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सलग तीन दिवस पाणी बंद असल्याने नागरिक अतिशय वैतागले आहेत. दरम्यान, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

महापौर, नगरसेवक नसल्याने विचारायचे कोणाला?

तीन दिवस पाणी पुरवठा नसल्यामुळे महापालिकेच्या वतीने पर्यायी उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे किमान टँकरद्वारे पाणीपुरवठा करता आली असती. पण त्याविषयी कोणाला विचारायचे हा प्रश्न नागरिकांना पडला. कारण स्थानिक नगरसेवक किंवा महापौर देखील सध्या कार्यरत नाहीत. केवळ महापालिका आयुक्त आहेत. त्यांच्यापर्यंत कोण जाणार ? असाही प्रश्न उपस्थित झाला.

पाण्यासाठी नागरिक रस्त्यावरतीन दिवसांपासून पाणी न मिळाल्यामुळे शनिवारी विमाननगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथील सोसायटीमधील नागरिक सीसीडी चौकात आली. तिथे त्यांनी रस्ता रोको केला. तेव्हा पाणीपुरवठाचे अधिकारी आले होते, त्यांना घेराव घातला. या वेळी पोलीस देखील हजर होते. पोलीसांनी दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर नागरिकांना त्यांनी समजावले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले.

आम्ही तीन दिवस झाले पाण्याविना त्रस्त आहोत. कुठेतरी पाइपलाइन फुटल्याने पाणी बंद असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण उपाययोजना मात्र काहीच केल्या नाहीत. पाणी हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार असतो. तो दिलाच पाहिजे. पालिकेने पाइपलाइन दुरूस्ती होत असेल तर इतर ठिकाणाहून सोय करायला हवी होती. खासगी टँकरवाले तीन-चार हजार रूपये मागत होते. आता पालिका आयुक्त व पालकमंत्र्यांना सर्व नागरिकांच्या वतीने पत्र पाठविले आहे.- कर्नल शशिकांत दळवी (निवृत्त), विमाननगर रहिवासी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड