शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Pune: तीन दिवस पाणी मिळेना, हीच का स्मार्ट सिटी? टँकरसाठी द्यावे लागतात ३ ते ४ हजार

By श्रीकिशन काळे | Updated: June 17, 2023 16:15 IST

शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले...

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील लाखो नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणी मिळत नाही. त्यामुळे ते हैराण झाले असून, टँकरचे पाणी ३ ते ४ हजार रूपयांना घ्यावे लागत आहे. पाणी हा मुलभूत अधिकार असताना तो देखील पुणे महापालिका देऊ शकत नाही आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीतंर्गत जागतिक स्तरावर पुरस्कार घेऊन मिरवते, असा विरोधाभास पुण्यात दिसून येत आहेत. पाणी न आल्याने जवळपास ५ लाख लोकं संतापले. त्यानंतर शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले.

भामा आसखेड प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याची वाहिनीला मोठी गळती झाल्यामुळे मागील तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला. दर गुरुवारी शहरात महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्यातच गळतीची ही गंभीर समस्या उद्भवल्यामुळे भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विमाननगर परिसरातील सर्व भागाला पाणी मिळालेले नाही. तीन दिवसांपासून पाण्याविना नागरिक हैराण झाले आहेत. खासगी टँकरवाले देखील हजारो रूपये मागत आहेत. एवढे पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सलग तीन दिवस पाणी बंद असल्याने नागरिक अतिशय वैतागले आहेत. दरम्यान, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

महापौर, नगरसेवक नसल्याने विचारायचे कोणाला?

तीन दिवस पाणी पुरवठा नसल्यामुळे महापालिकेच्या वतीने पर्यायी उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे किमान टँकरद्वारे पाणीपुरवठा करता आली असती. पण त्याविषयी कोणाला विचारायचे हा प्रश्न नागरिकांना पडला. कारण स्थानिक नगरसेवक किंवा महापौर देखील सध्या कार्यरत नाहीत. केवळ महापालिका आयुक्त आहेत. त्यांच्यापर्यंत कोण जाणार ? असाही प्रश्न उपस्थित झाला.

पाण्यासाठी नागरिक रस्त्यावरतीन दिवसांपासून पाणी न मिळाल्यामुळे शनिवारी विमाननगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथील सोसायटीमधील नागरिक सीसीडी चौकात आली. तिथे त्यांनी रस्ता रोको केला. तेव्हा पाणीपुरवठाचे अधिकारी आले होते, त्यांना घेराव घातला. या वेळी पोलीस देखील हजर होते. पोलीसांनी दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर नागरिकांना त्यांनी समजावले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले.

आम्ही तीन दिवस झाले पाण्याविना त्रस्त आहोत. कुठेतरी पाइपलाइन फुटल्याने पाणी बंद असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण उपाययोजना मात्र काहीच केल्या नाहीत. पाणी हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार असतो. तो दिलाच पाहिजे. पालिकेने पाइपलाइन दुरूस्ती होत असेल तर इतर ठिकाणाहून सोय करायला हवी होती. खासगी टँकरवाले तीन-चार हजार रूपये मागत होते. आता पालिका आयुक्त व पालकमंत्र्यांना सर्व नागरिकांच्या वतीने पत्र पाठविले आहे.- कर्नल शशिकांत दळवी (निवृत्त), विमाननगर रहिवासी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड