शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Pune: तीन दिवस पाणी मिळेना, हीच का स्मार्ट सिटी? टँकरसाठी द्यावे लागतात ३ ते ४ हजार

By श्रीकिशन काळे | Updated: June 17, 2023 16:15 IST

शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले...

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील लाखो नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणी मिळत नाही. त्यामुळे ते हैराण झाले असून, टँकरचे पाणी ३ ते ४ हजार रूपयांना घ्यावे लागत आहे. पाणी हा मुलभूत अधिकार असताना तो देखील पुणे महापालिका देऊ शकत नाही आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीतंर्गत जागतिक स्तरावर पुरस्कार घेऊन मिरवते, असा विरोधाभास पुण्यात दिसून येत आहेत. पाणी न आल्याने जवळपास ५ लाख लोकं संतापले. त्यानंतर शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले.

भामा आसखेड प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याची वाहिनीला मोठी गळती झाल्यामुळे मागील तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला. दर गुरुवारी शहरात महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्यातच गळतीची ही गंभीर समस्या उद्भवल्यामुळे भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विमाननगर परिसरातील सर्व भागाला पाणी मिळालेले नाही. तीन दिवसांपासून पाण्याविना नागरिक हैराण झाले आहेत. खासगी टँकरवाले देखील हजारो रूपये मागत आहेत. एवढे पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सलग तीन दिवस पाणी बंद असल्याने नागरिक अतिशय वैतागले आहेत. दरम्यान, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

महापौर, नगरसेवक नसल्याने विचारायचे कोणाला?

तीन दिवस पाणी पुरवठा नसल्यामुळे महापालिकेच्या वतीने पर्यायी उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे किमान टँकरद्वारे पाणीपुरवठा करता आली असती. पण त्याविषयी कोणाला विचारायचे हा प्रश्न नागरिकांना पडला. कारण स्थानिक नगरसेवक किंवा महापौर देखील सध्या कार्यरत नाहीत. केवळ महापालिका आयुक्त आहेत. त्यांच्यापर्यंत कोण जाणार ? असाही प्रश्न उपस्थित झाला.

पाण्यासाठी नागरिक रस्त्यावरतीन दिवसांपासून पाणी न मिळाल्यामुळे शनिवारी विमाननगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथील सोसायटीमधील नागरिक सीसीडी चौकात आली. तिथे त्यांनी रस्ता रोको केला. तेव्हा पाणीपुरवठाचे अधिकारी आले होते, त्यांना घेराव घातला. या वेळी पोलीस देखील हजर होते. पोलीसांनी दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर नागरिकांना त्यांनी समजावले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले.

आम्ही तीन दिवस झाले पाण्याविना त्रस्त आहोत. कुठेतरी पाइपलाइन फुटल्याने पाणी बंद असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण उपाययोजना मात्र काहीच केल्या नाहीत. पाणी हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार असतो. तो दिलाच पाहिजे. पालिकेने पाइपलाइन दुरूस्ती होत असेल तर इतर ठिकाणाहून सोय करायला हवी होती. खासगी टँकरवाले तीन-चार हजार रूपये मागत होते. आता पालिका आयुक्त व पालकमंत्र्यांना सर्व नागरिकांच्या वतीने पत्र पाठविले आहे.- कर्नल शशिकांत दळवी (निवृत्त), विमाननगर रहिवासी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड