शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरकारी नोकर भरतीसाठी एमपीएससी का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST

शासकीय पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप झाला आहे. जिल्हा पातळीवरील पद भरतीसाठी जिल्हा दुय्यम परीक्षा मंडळ होते. ते बरखास्त ...

शासकीय पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप झाला आहे. जिल्हा पातळीवरील पद भरतीसाठी जिल्हा दुय्यम परीक्षा मंडळ होते. ते बरखास्त करून त्या जागी महापरीक्षा पोर्टल आणले गेले. ते देखील बंद करण्यात आले. आता त्याजागी काळ्या यादीत समाविष्ट असलेल्या खासगी कंपन्या यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने या परीक्षा घेण्यात येत आहे. या प्रत्येक टप्प्यात भ्रष्टाचार, गैरप्रकार, अनियमितता अशा विविध प्रक्रिया घडत आहेत. हे वारंवार घडत असल्याने याचा फटका हा स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसत आहे. त्यासाठी निवड प्रक्रिया ही खासगी कंपनीऐवजी एमपीएससीने करणे गरजेचे आहे.

या सर्व प्रक्रियेत ‘केरळ लोकसेवा आयोगाचा पॅटर्न’ राबविण्याची विनंती राज्य शासनाकडे वारंवार करण्यात आली. केरळ लोकसेवा आयोगाकडून केरळ राज्य शासनाची सर्व कार्यालये, वीज मंडळ, परिवहन महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, १५ शिखर सहकारी संस्था व जिल्हा सहकारी बँक, केरळ राज्य शासनाच्या सर्व कंपन्या आणि महामंडळे एवढ्या सर्व पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येते. गट-अ पासून गट-ड संवर्गातील सर्व पदांकरिता म्हणजे वर्षाला साधारणपणे १५ ते २० हजार पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाते. तर एमपीएससीद्वारे दर वर्षी सरासरी साडेतीन हजार ते चार हजार पदांची भरती होते. केरळ लोकसेवा आयोगाने अधिक सक्षमपणे आपली यंत्रणा राबविली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

गेल्या काही वर्षात विविध पद भरतीमध्ये झालेल्या गोंधळाची पार्श्वभूमी लक्षात घेता वारंवार खासगी कंपनीकडे परीक्षा देण्याचे यामागील प्रयोजन नक्की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. परीक्षा घेताना त्यात अत्यंत गंभीर चुका होतात. त्याचा फटका गरजू व होतकरू उमेदवारांना बसतो. एवढेच नाही तर सर्व अराजपत्रित ‘गट ब’ व ‘गट क ’ पदांच्या सर्व परीक्षा घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग तयार आहे. तसे पत्रही राज्य शासनाला देण्यात आले आहे. मात्र, राज्य शासन याबाबत वेळ काढूपणाची भूमिका घेत असल्याचे दिसून येते.

आयोगाच्या कार्यकक्षेत नसणाऱ्या गट-ब व गट -क दर्जाच्या अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया सन २०१७ पासून महापरीक्षा पोर्टलमार्फत राबविण्यात आली. पोर्टल बंद केल्यानंतर महाआयटीच्या अंतर्गत खासगी कंपनीद्वारे ही प्रक्रिया राबविली जात आहे. आरोग्य विभागातील परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी खासगी कंपनीद्वारे घेण्यात आली. त्या परीक्षेतील झालेला सर्व सावळागोंधळ राज्याने पाहिला आहे. तरी देखील या कंपनीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. उमेदवारांच्या भविष्याशी शासन खेळत आहे. भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून पुन्हा एमपीएससीद्वारे घेण्यात यावी, अशी अनेकांची मागणी आहे.

शासनाच्या सेवेमधील सर्व पदे, शासकीय सेवांमधील अराजपत्रित गट-ब व गट क सेवांना सक्षम असणाऱ्या वैधानिक पदांची तसेच निमशासकीय संस्थांमधील सेवांच्या पदांची भरती ही एमपीएससीमार्फत करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मान्यता आणि नियमांमध्ये सुधारणा करणे, सेवाप्रवेश नियम आधीसूचित करणे, धोरण ठरविणे, इत्यादी बाबत निर्णय घेण्याची आवश्यक आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत नियमितता येईल. उमेदवारांचा वेळ आणि पैसा वाचेल. उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व भरती प्रक्रियेची माहिती ही उपलब्ध होईल. परिणामी परीक्षेच्या अधिकाधिक संधी या माध्यमातून उपलब्ध होतील.

- महेश बडे (एमपीएससी स्टुडंट्स राईटस् )

--------------------