पुणे : बहुमतासाठी आवश्यक असणारा ३८ हा आकडा एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी गाठेल की सत्तेसाठी कोणाचा टेकू घ्यावा लागेल? अपक्षांच्या मदतीने बहुमत सिद्ध करेल की मित्रपक्ष काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेईल? असे असंख्य प्रश्न जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानानंतर चर्चेत येत आहेत. या प्रश्नांवरचा पडदा गुरूवारी उठणार असून, जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे याचा फैसला होणार आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी व पंचायत समितीच्या १५0 जागांसाठी निवडणूक झाली. यात ग्रामीण मतदारांनी १ हजार ४ उमेदवारांचे भवितव्य ६९.८७ टक्के मतदान करून मतपेटीत बंद केले होते. २७ लाख ९२ हजार २२४ मतदारांपैैकी १९ लाख५0 हजार ९५२ मतदारांनी कुणाला कौल दिला? याचा फैैसला आज लागेल. यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ७५ पैैकी ४१ सदस्य असून एकहाती सत्ता आहे. राज्यात मिळत असलेल्या यश पाहता या निवडणुकीत जिल्हा परिषदेतही सत्ता मिळविण्याचे स्वप्न भाजपाने पाहिले आहे. मात्र रिंगणात उभे केलेले उमेदवार पाहता भाजपा आता तीन सदस्य असलेला आकडा वाढविण्यात किती यशस्वी होईल हा प्रश्न आहे. असे असले तरी शिवसेनेची घौैडदौड पाहता सध्या १३ सदस्य असलेली शिवसेना मात्र आपले दुसरे स्थान कायम ठेवत हा आकडा वाढवेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. ११ सदस्य असलेली काँग्रेसही काही जागा वाढवेल असे बोलले जात आहे. या शक्यता खऱ्या ठरल्या तर सत्ताधारी राष्ट्रवादीला जिल्ह्यात किमान ५ ते १0 जागांचा फटका बसून त्यांची सदस्य संख्या ३0 ते ३५ इतकी होवू शकते. असे झाले तर राष्ट्रवादी हा एक नंबरचा राहिल, मात्र सत्तेसाठीचा ३८ हा आकडा कसा गाठेल? यावर तर्कवितर्क सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादीची तिकीट न मिळाल्याने बंडखोरीकरून रिंगणात असलेल्या अपक्षांचा विचार केला तर किमान तीन जागा या निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे तीन सदस्य जरी राष्ट्रवादी मिळवू शकला, तरी त्यांना सत्तेसाठी मित्रपक्ष काँग्रेसशी वाटाघाटी कराव्या लागतील, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. निकालाच्या प्रतीक्षेतील उमेदवारांचे देव पाण्यात बारामतीमध्ये राष्ट्रवादीला भारतीय जनता पक्षाने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे नेहमीच यशाबाबत आत्मविश्वास असणारे राष्ट्रवादीचे उमेदवार यंदाच्या निवडणुकीत तणावात असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे निकालाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांनी पाण्यात ठेवले आहेत. विशेषत राष्ट्रवादीला कडवे आव्हान निर्माण करण्यात सुपे-मेडद, सांगवी-डोर्लेवाडी, माळेगाव-पणदरे गटाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यांच्या निकालाकडे लागले लक्ष विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मातोश्री रत्नप्रभा पाटील, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, शरद सोनावणे यांचे बंधू शशिकांत सोनावणे, अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांना रिंगणात उतरवले होते. त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आजी, माजी सदस्यांचे भवितव्य ठरणारमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, पांडूरंग पवार, अरूग गिरे, माजी सभापती शरद बुट्टे पाटील, अरूण चांभारे, दिनकर धरपाळे, रणजित शिवतरे, वैशाली पाटील यांच्यासह राणी शेळके, विश्वास देवकाते, ऋतुजा पाटील, राहूल पाचर्णे व सलग चौथ्यांदा रिंगणात असलेल्या आशा बुचके या पाच विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे भवितव्य आज उघडणार आहे. जयश्री पलांडे, राजेंद्र गुंजाळ, तुषार थोरात, राजश्री बोरकर, कैलासबुवा काळे, रामदास दाभाडे, जयश्री पोकळे, प्रज्ञा भोर, सुदाम इंगळे, वीरधवल जगदाळे, सुजता गावडे, भाऊ देवाडे, प्रमोद काकडे व वैैशाली हारपळे या माजी सदस्यांचाही जिल्हा परिषदेत फैसला होणार आहे. सध्याचे पक्षीय बलाबलजिल्हा परिषद व १0 पंचायत समित्यांत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. वेल्हे काँग्रेस, जुन्नर शिवसेना तर मावळ पंचायत समिती भाजपाकडे आहे.जिल्हा परिषदेच्या ७५ जागांमध्ये सध्या राष्ट्रवादीकडे ४१, शिवसेनेकडे १३, काँग्रेसकडे ११, भघजपकडे ३, नागरीहित आघाडीकडे ५, मनसे १ व १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. आज लागणाऱ्या निकालानंतर जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार, कोणती पंचायत समिती कोणाकडे जाणार याबाबत ग्रामीण मतदारांना उत्सुकता लागली आहे. ११ तालुक्यांत वाढला मतदानाचा टक्काजिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी ३६५ तर पंचायत समितीच्या १५0 जागांसाठी ६३९ अशा २२५ जागांसाठी मंगळवारी ६९.८७ टक्के मतदान झाले. २0१२ च्या निवडणुकीत ६५.६0 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ते ४.२७ टक्क्यांनी वाढले असून हा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पढणार अशीही चर्चा आज दिवसभर सुरू होती. मुळशी व दौैंड हे दोन तालुके वगळता उर्वरीत ११ तालुक्यांत या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे.यात शिरूर तालुक्यात सर्वाधिक ८.९८ टक्के, त्यानंतर मावळमध्ये ७.४२, हवेलीत ६.८३, आंबेगाव ५.८७, खेड ५.५६, बारामती ५.0९, इंदापूर४.२७, जुन्नर ३.९३, पुरंदर२.६९ तर वेल्हे तालुक्यात १.४३ टक्के मतदानात वाढ झाली.
जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे?
By admin | Updated: February 23, 2017 02:36 IST