शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जोशीमठची चर्चा देशभर असताना पुणे जिल्ह्यातील २३ गावे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:46 IST

जोशीमठ शहराजवळ खोदलेल्या बोगद्यामुळे भूगर्भातील जमीन हादरली गेली व त्याचा परिणाम शहरावर झाला...

- नीलेश काण्णव

भीमाशंकर (पुणे) : देशभर सध्या जोशीमठ शहराचे पुनर्वसन करण्याची चर्चा सुरू असताना माळीण दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडू शकतात. येथे लवकर योग्य त्या उपाययोजना करा, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी कळवूनही जिल्हा यंत्रणेकडून कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

जोशीमठ शहराजवळ खोदलेल्या बोगद्यामुळे भूगर्भातील जमीन हादरली गेली व त्याचा परिणाम शहरावर झाला. असाच काहिसा प्रकार पश्चिम घाटातील सह्याद्रीमध्ये आहे. या डोंगर रांगांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या विकासकामांमुळे बोगदे खोदले गेले आहेत, डोंगर तोडले आहेत, झाडे कमी झाली आहेत. सहयाद्रीमधील नद्या प्रदूषित झाल्या आहेत, पुणेसारख्या शहराची हवा दूषित झाली आहे.

याचा परिणाम सह्याद्रीमधील गावांवर होऊ लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या छोट्या- मोठ्या घटना घडत असतात. माळीण दुर्घटना याचे एक उदाहरण आहे. असे प्रकार भविष्यात घडत रहाणार आहेत. निसर्गाचे झालेले नुकसान एवढ्या लवकर भरून येणारे नाही. यासाठी धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण होऊन येथे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेटीप्रसंगी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी माळीणसारख्या दुर्घटना इतर गावांमध्ये घडू नयेत, यासाठी संपूर्ण राज्यातील डोंगरांमधील वसलेल्या गावांचे सर्वेक्षण करा, असे प्रशासनाला सांगितले होते. त्यावरून पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण केले होते.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये भूस्खलन होण्याच्या दृष्टिने धोकादायक असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी जिल्हाधिकऱ्यांना कळविले आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील फुलवडे अंतर्गत भागितवाडी, माळीण अंतर्गत पसारवाडी, आसाणे, जांभोरीअंतर्गत काळवाडी क्रं. १ व २, पोखरीअंतर्गत बेंढारवाडी या पाच गावांचा समावेश होता.

तसेच भोर तालुक्यातील धानवली, कोर्ले जांभवली, डेहणे, पांगरी सोनारवाडी, जुन्नर तालुक्यातील निमगिरीअंतर्गत तळमाचीवाडी, खेड तालुक्यातील भोमाळे, भोरगिरी अंतर्गत पदरवस्ती, मावळ तालुक्यातील माऊ मोरमाचीवाडी व गभालेवस्ती, सावळे कडकराई, लोहगड, मालेवाडी, ताजे, बोरज, तुंग श्री भैरवनाथ मंदिर परिसर, भुशी, मूळशी तालुक्यातील घुटके, वेल्हा तालुक्यातील आंबवणे व घोल या गावांचा समावेश आहे.

या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. यामध्ये गावांतील धोकादायक ठिकाणे, लोकसंख्या विषयी माहिती, निवारा, स्थानिक सामाजिक संस्था, आपत्ती दरम्यान संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचे संपर्क नंबर, हॉटेल, शेती विषयक माहिती, आपत्तीचा इतिहास, आपत्ती प्रवण भाग दर्शविणारा नकाशा, हॉस्पिटल, उपलब्ध असलेले साहित्य या गोष्टींचा अराखड्यात समावेश असावा. तसेच तालुका प्रशासनाने या गावांवर विशेष लक्ष ठेवावे असे सांगितले आहे.

या यागावांमध्ये योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, अथवा गरज पडल्यास या गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. या २३ गावांपैकी आंबेगाव तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन करण्याच्या हलचाली सुरू आहेत. बाकी ठिकाणी फारशी कारवाई होताना दिसत नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड