शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

जोशीमठची चर्चा देशभर असताना पुणे जिल्ह्यातील २३ गावे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:46 IST

जोशीमठ शहराजवळ खोदलेल्या बोगद्यामुळे भूगर्भातील जमीन हादरली गेली व त्याचा परिणाम शहरावर झाला...

- नीलेश काण्णव

भीमाशंकर (पुणे) : देशभर सध्या जोशीमठ शहराचे पुनर्वसन करण्याची चर्चा सुरू असताना माळीण दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडू शकतात. येथे लवकर योग्य त्या उपाययोजना करा, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी कळवूनही जिल्हा यंत्रणेकडून कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

जोशीमठ शहराजवळ खोदलेल्या बोगद्यामुळे भूगर्भातील जमीन हादरली गेली व त्याचा परिणाम शहरावर झाला. असाच काहिसा प्रकार पश्चिम घाटातील सह्याद्रीमध्ये आहे. या डोंगर रांगांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या विकासकामांमुळे बोगदे खोदले गेले आहेत, डोंगर तोडले आहेत, झाडे कमी झाली आहेत. सहयाद्रीमधील नद्या प्रदूषित झाल्या आहेत, पुणेसारख्या शहराची हवा दूषित झाली आहे.

याचा परिणाम सह्याद्रीमधील गावांवर होऊ लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या छोट्या- मोठ्या घटना घडत असतात. माळीण दुर्घटना याचे एक उदाहरण आहे. असे प्रकार भविष्यात घडत रहाणार आहेत. निसर्गाचे झालेले नुकसान एवढ्या लवकर भरून येणारे नाही. यासाठी धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण होऊन येथे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेटीप्रसंगी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी माळीणसारख्या दुर्घटना इतर गावांमध्ये घडू नयेत, यासाठी संपूर्ण राज्यातील डोंगरांमधील वसलेल्या गावांचे सर्वेक्षण करा, असे प्रशासनाला सांगितले होते. त्यावरून पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचे सर्वेक्षण केले होते.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये भूस्खलन होण्याच्या दृष्टिने धोकादायक असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी जिल्हाधिकऱ्यांना कळविले आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील फुलवडे अंतर्गत भागितवाडी, माळीण अंतर्गत पसारवाडी, आसाणे, जांभोरीअंतर्गत काळवाडी क्रं. १ व २, पोखरीअंतर्गत बेंढारवाडी या पाच गावांचा समावेश होता.

तसेच भोर तालुक्यातील धानवली, कोर्ले जांभवली, डेहणे, पांगरी सोनारवाडी, जुन्नर तालुक्यातील निमगिरीअंतर्गत तळमाचीवाडी, खेड तालुक्यातील भोमाळे, भोरगिरी अंतर्गत पदरवस्ती, मावळ तालुक्यातील माऊ मोरमाचीवाडी व गभालेवस्ती, सावळे कडकराई, लोहगड, मालेवाडी, ताजे, बोरज, तुंग श्री भैरवनाथ मंदिर परिसर, भुशी, मूळशी तालुक्यातील घुटके, वेल्हा तालुक्यातील आंबवणे व घोल या गावांचा समावेश आहे.

या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. यामध्ये गावांतील धोकादायक ठिकाणे, लोकसंख्या विषयी माहिती, निवारा, स्थानिक सामाजिक संस्था, आपत्ती दरम्यान संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचे संपर्क नंबर, हॉटेल, शेती विषयक माहिती, आपत्तीचा इतिहास, आपत्ती प्रवण भाग दर्शविणारा नकाशा, हॉस्पिटल, उपलब्ध असलेले साहित्य या गोष्टींचा अराखड्यात समावेश असावा. तसेच तालुका प्रशासनाने या गावांवर विशेष लक्ष ठेवावे असे सांगितले आहे.

या यागावांमध्ये योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, अथवा गरज पडल्यास या गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. या २३ गावांपैकी आंबेगाव तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन करण्याच्या हलचाली सुरू आहेत. बाकी ठिकाणी फारशी कारवाई होताना दिसत नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड